शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

कांदे, टमाट्याला नीचांकी भाव

By admin | Updated: January 11, 2017 00:05 IST

बळीराजा हतबल : वाहतूक खर्चही निघत नसल्याने संकटात

बेलगाव कुऱ्हे : नोटाबंदी आणि कॅशलेसमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली असतानाच टमाटा व कांद्यानेही शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजाचे गणित बिघडले असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे.बळीराजा शेतीत घाम गाळून स्वकर्तृत्व व कौशल्याच्या बळावर मुबलक उत्पादन मिळवतो. मात्र त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने त्याच्या नशिबी वणवण येते. इगतपुरी तालुक्यात चक्क ४ रुपये किलोच्या भावाने शेतकऱ्यांना कांदे विकावे लागत आहेत. मातीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदे शेतातच सडत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत असणारे पीक म्हणजे कांदे. मात्र सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. इगतपुरीच्या घोटी बाजार समितीत विक्र ीसाठी आलेले कांद्याचे दोनशे पोते आणि जेमतेम चार रुपये किलो भावाने विकला गेला. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले असून, शासकीय धोरणांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. राज्य शासनाने आडतमुक्ती करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी संघटित होऊन भाव वाढणार नाहीत याची काळजी घेतली. यामध्ये सर्वाधिक झळ कांदा पिकाला बसली. सध्यपरिस्थितीत कांद्याच्या भावातील घसरणीत वाढ झाली आहे. सध्या एक किलो टमाट्याला चार रुपये भाव मिळत आहे. या भावात कांदा मार्केटला पाठवण्याचा वाहतूक खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. मागील चार ते पाच महिने कांद्याचे भाव कमी राहिल्याने पुढील काळात चांगला भाव मिळेल या अंदाजाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. सध्या मोठ्या प्रमाणावर कांदे विक्रीसाठी तयार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरातील घसरण सुरू असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. सध्या मिळत असलेल्या भावात वाहतूक खर्चही भागत नसल्याने शेतकऱ्यांना आहे त्या स्थितीत कांदा सोडून द्यावा लागत आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. त्यावरच बहुतांशी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र पंधरवड्यापासून भाजीपाला कवडीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. जेमतेम पाण्याच्या भरवशावर तालुक्यातील गोंदे दुमाला येथील शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने कांद्याचे पीक घेतले होते. भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. पूर्वी शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या शेतमालावर व्यापारी ६ टक्के आडत कापून घेत असत. तरीही शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडत होते. मात्र, आता खर्चही फिटत नाही त्यामुळे शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. कांदे उत्पादनासाठी घ्यावे लागणारे परिश्रम पाहिल्यास बाजारात मिळणारा भाव नगण्य आहे. प्रतिकिलो कांद्याला चार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे परिश्रम मातीमोल ठरत आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने खरेदीदारांकडून कमी भावाने कांद्याची उचल केली जात आहे. बहरात आलेले पीक अधिक दिवस शेतात ठेवल्यास त्याची नासाडी होत आहे. दुसरीकडे भाव मिळत नसल्याने तोडणीविना शेतकऱ्यांसमोर पर्याय दिसेनासा झाला आहे. अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कमी भावाने कांद्याची विक्री केल्याविना दुसरा पर्याय नाही. आधीच हतबल असलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे घसरलेले भाव आर्थिक संकटात लोटत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या दु:खाकडे कधी लक्ष देणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. भावात सतत घसरण सुरू असून शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा सडून चालला आहे. शेतात काबाडकष्ट करून सर्व जनतेची पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाने समजून घेऊन चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.