शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

प्रेम, सत्याद्वारेच विश्वबंधुत्व प्रत्यक्षात

By admin | Updated: October 5, 2015 00:01 IST

सुरुची पांडे : विवेकानंद केंद्राच्या वतीने व्याख्यान

नाशिक : स्वामी विवेकानंद यांची विश्वबंधुत्वाची संकल्पना अत्यंत व्यापक होती. प्रेम, सत्य, श्रद्धा, सामर्थ्य व राष्ट्रभक्ती या पाच गोष्टींद्वारेच ती प्रत्यक्षात साकारली जाऊ शकते, असे प्रतिपादन पुण्याच्या गरवारे महाविद्यालयाच्या प्रा. सुरुची पांडे यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या नाशिक शाखेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजीच्या विश्वबंधुत्व दिनाच्या पार्श्वभूमीवर शंकराचार्य संकुल येथे पांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी ‘स्वामीजींना अभिप्रेत असलेली विश्वबंधुत्वाची कल्पना आणि उद्याचा भारत’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील त्यांच्या गाजलेल्या भाषणात विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली होती. त्या भाषणाची सुरुवात त्यांनी ‘भगिनींनो आणि बंधूंनो’ अशी केली होती. भगिनींचा प्रथम उल्लेख करीत त्यांनी मातृशक्तीला नम्र अभिवादन केले होते. परदेशी स्त्रियांच्या कार्यसंस्कृतीमुळे स्वामीजी अत्यंत प्रभावित होते. भारतातील महिलांनाही या प्रकारचा वाव मिळावा, असे त्यांना वाटत असे. दुसरीकडे ते समुद्र ओलांडून अमेरिकेला गेल्याने त्यांच्यावर स्वदेशात मात्र टीका होत होती. त्या भाषणात स्वामीजींनी सर्व धर्म सत्य आहेत यावर आपला दृढ विश्वास असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यातूनच त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला होता. प्रारंभी केंद्राच्या वतीने ‘दर्शन ध्येयासक्तीचे’, ‘सामान्य माणसाची असामान्य संघटना’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. केंद्र कार्यकर्त्या विद्या सालेमठ यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक मुळे यांनी परिचय करून दिला. केंद्रप्रमुख जयंत दीक्षित यांनी स्वागत केले. निशिगंधा मुळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)