शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

गणपती बाप्पाला वाहतूक कोंडीतून वाचवू या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:15 IST

लोकमत इनिशिएटिव्ह नाशिक : सामान्य जनता सध्या ‘ट्रॅफिक जॅम’ने प्रचंड त्रस्त झालेली आहे. त्यातच होऊ घातलेल्या गणेशोत्सवात जर सार्वजनिक मंडळांनी ...

लोकमत इनिशिएटिव्हनाशिक : सामान्य जनता सध्या ‘ट्रॅफिक जॅम’ने प्रचंड त्रस्त झालेली आहे. त्यातच होऊ घातलेल्या गणेशोत्सवात जर सार्वजनिक मंडळांनी दरवर्षीप्रमाणे रस्त्यात विस्तृत मंडप टाकले तर शहराच्या मध्यवर्ती भागातील संपूर्ण वाहतूकच कोलमडून पडू शकते आणि मंडपालाच वाहनांचा गराडा पडू शकतो. त्यामुळे लाडक्या गणरायाला आणि सर्वसामान्य जनतेला कोंडीतून वाचविण्यासाठी मंडपांचा आकार कमी करण्याबाबत काही पुढाकार घेतला घेण्याची गरज आहे.जनसामान्यांच्या याच अपेक्षा असून, उच्च न्यायालयाचे तेच आदेश आहेत. त्यामुळे आता सेवाभावी मंडळांनीच याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरात दरवर्षी श्रींचा उत्सव सर्वांच्या सहकार्यामुळेच निर्विघ्नपणे पार पडतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्सवामुळे अडचणी वाढू लागल्या आहेत. सर्वाधिक रहदारीचे रस्ते असतानाही त्यावर मोठ मोठे मंडप टाकले जातात. त्यावर देखावे सादर केले जातात. सामान्य नागरिकांनादेखील या मंडळांचे देखावे पाहण्यात नेहमीच रस असतो. त्यामुळे या गणेश मंडळांचे देखावे पहायला नागरिकांची नेहमीच प्रचंड गर्दी उसळत असते.उत्सवाचे अखेरचे पाच दिवस तर महानगरातील मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी तर प्रशासनाच्या देखील हाताबाहेर जाते. त्यात यंदाच्या वर्षी आधीच सामान्य जनता वाहतुकीच्या चक्रव्यूहाने मेटाकुटीस आली आहे. त्यात जर गणेशोत्सवाचे दहा दिवस आणि त्यापूर्वी मंडप उभारणीसहदेखावे उभारणीचे १० ते १२ दिवस या संपूर्ण काळात जर रस्ते प्रचंड आक्र सले गेले तर संपूर्ण शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडणार आहे. त्यामुळे मोठ्या सार्वजनिक मंडळांनी यंदाच्या वर्षी तरी हा वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त केली आहे.पूरग्रस्तांना मदत करा !पश्चिम महाराष्टÑात कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे महापूराचे संकट ओढवले. नाशिककरांनाही पुराची झळ पोहोचली. त्यामुळे मंडपाचा आकार आणि उत्सवातील खर्चात काटकसर करून जरा पूरग्रस्तांना मदत केली, तर तेदेखील सकारात्मक पाऊल ठरेल.हेच ठरेल खरे सामाजिक कार्य !सार्वजनिक गणेश मंडळे ही नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. मग आपल्याच शहरात असलेले वाहतूक कोंडीचे संकट दूर करण्यासाठी या सार्वजनिक मंडळांनीच पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.मंडपाचा आकार कमी करून वाहतुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था करणे हे या सामाजिक कार्यातील पहिले पाऊल ठरू शकते. सार्वजनिक मंडळांनी तेच पाऊल उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीTrafficवाहतूक कोंडी