शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कळवणचा कांदा परदेशासह परराज्यातही खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

कळवण (मनोज देवरे) : जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन कळवण तालुक्यात होत असून उन्हाळी हंगामात २३७४४ हेक्टर क्षेत्रात कांदा ...

कळवण (मनोज देवरे) : जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन कळवण तालुक्यात होत असून उन्हाळी हंगामात २३७४४ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड होते. कांदा या नगदी पिकातून तालुक्यात बाजार समिती, कांदा उत्पादक अन् व्यापाऱ्यांची कोट्यधीश रुपयांची उलाढाल होते. रंग, आकार, चविष्ट, वजन आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला उच्च प्रतीच्या कांद्याला परराज्यात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे देशांतर्गत विक्रीबरोबर परदेशात निर्यातदेखील होतो. तालुक्यातील पश्चिम भाग हा नैसर्गिक व भौगोलिक दृष्टीने डोंगराचा, मध्यम हलक्या जमिनीचा व अधिक पर्जन्यमानाचा तर पूर्वभाग बहुतांशी कमी उताराच्या, मध्यम व चांगली जमीन असणारा भूभाग आहे. सरासरी पर्जन्यमान ७१९ मिमी इतके असून पश्चिम भागात ११०० ते १२०० मि.मी.पर्यंत पाऊस पडतो. गिरणा व पुनद या मुख्य नद्या असून त्यांच्यावर चणकापूर व अर्जुन सागर (पुनद ) धरण बांधले असून धरणाअंतर्गत कालव्यांना पाणी सोडल्यानंतर विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. स्व. ए. टी. पवारांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन योजना राबविल्याने पाण्याची सुबत्ता आहे. शेतीचे नवनवीन प्रयोग तालुक्यात होत असल्यामुळे शेती बहरू लागली आहे.

पावसाचे उशिरा होणारे आगमन, ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड, पावसाचे अनियमित वितरण या कारणाने खरीप हंगामातील मुख्य पिकांची उत्पादनात घट होत असून तालुक्यात सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. भात,ज्वारी, बाजरी, नागली,व मका ही तृणधान्य पिके तर तूर मूग, उडीद ही कडधान्य पिके घेतली जातात. गळीत धान्यात भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, खुरासणी व तीळ ही पिके घेतली जातात. गेल्या दहा वर्षातील खरीप पीक रचनेचा विचार केल्यास ज्वारी, बाजरी, खुरासणी, व तीळ या पिकांच्या क्षेत्रात मोठी घट होऊन त्याएवजी भात, मका, मूग, उडीद, तूर व सोयाबीन या पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मका व सोयाबीन हे नगदी पिके म्हणून पुढे आले असून उन्हाळी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते.

----------------------

पाच महिन्यात १३ लाख ५६ हजार क्विंटलची आवक -

कळवण बाजार समितीच्या कळवण, अभोणा व कनाशी आवारात कांदा विक्रीसाठी जवळच बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे पाच महिन्यात १३ लाख ५६ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. सध्या कांद्याला कमीतकमी हजार रुपये तर जास्तीत जास्त १७४० तर सरासरी १४०० भाव सुरू आहे. शेतकऱ्यांनी कांद्याचा उच्चाकी आणि निच्चाकी भाव अनुभवला असून कांदा पिकातून मोठ्या प्रमाणात अपेक्षा असल्यामुळे शेतकरी कांदा लागवड आणि साठवण करण्यावर भर देतो.

----------------------

कांदा चाळ एक वरदान

कांद्याला मिळणाऱ्या चांगल्या बाजार भावामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळींची उभारणी केली असून कृषी विभागाच्या वतीने अनुदान देण्यात येते. उन्हाळ कांद्याचे उत्पादन वाढत असल्याने व गेल्या काही दिवसात चांगल्या बाजारभावामुळे सन २०१६ ते २०२० या दरम्यान तालुक्यात ४८,८१५ मेट्रिक टन क्षमतेच्या २१३७ कांदा चाळीची उभारणी झाली. तालुक्यात अनुदान तत्त्वावरील २८५४ कांदा चाळी असून त्याद्वारे ६४२८५ मेट्रिक टन कांद्याची साठवणूक होते. उन्हाळी कांदा साठवून तो योग्य वेळी बाजारात आणणे केवळ कांदाचाळीमुळे शक्य होते.