शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाजगावचे जनता विद्यालय बंद होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:09 IST

तालुक्यातील वाजगाव येथील जनता विद्यालय संस्थेने दुर्लक्ष केल्यामुळे सातत्याने कमी होत चाललेल्या विद्यार्थीसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील जनता विद्यालय संस्थेने दुर्लक्ष केल्यामुळे सातत्याने कमी होत चाललेल्या विद्यार्थीसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाणा या संस्थेने सन २००९ मध्ये वाजगाव येथे जनता विद्यालय सुरू केले होते. गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतची शिक्षणाची सोय असल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना देवळा, खर्डा, रामेश्वर आदी गावांत पुढील शिक्षणासाठी जावे लागत होते. गावातील आदिवासी विद्यार्थ्यांना मात्र इतर गावात शिक्षणासाठी जाणे आर्थिकदृष्ट्या गैरसोयीचे ठरू लागले होते. त्यामुळे हे विद्यार्थी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे शाळा सोडून देत. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विधायक कार्य समितीने वाजगाव येथे जनता विद्यालय सुरू केल्यामुळे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत गावात शिक्षणाची सोय झाली. गावकºयांनी शाळेला वर्गखोल्यांसाठी गावातील समाजमंंिदर व ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची जागा उपलब्ध करून दिली. शाळेला पालकांनी चांगला प्रतिसाद देत आपले पाल्य शाळेत दाखल केले. सुरुवातीला तीन तुकड्यांची मिळून एकूण ८० च्या आसपास पटसंख्या होती. सन २०१०-११ मध्ये एसएससी बोर्डाने शाळेला सांख्येतांक दिला आहे. त्या वेळेस संस्था विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवेल व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल अशा अपेक्षेत पालक होते. परंतु कालांतराने पालकांचा भ्रमनिरास झाला. विधायक कार्य समितीने शाळेच्या सुधारणेच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. विना अनुदानित असलेल्या या शाळेत अवघे दोन शिक्षक आहेत. हे दोन शिक्षक तीनही इयत्तांना गणित, विज्ञान, मराठी व समाजशास्त्र हे विषय शिकवतात. पेसाअंतर्गत येणाºया या शाळेत पाच शिक्षकांची आवश्यकता आहे. संस्थेच्या खर्डा येथील शाळेतील शिक्षक हिंदी, इंग्रजी विषयांचे आठवडाभरात काही तास घेण्यापुरते तात्पुरती वाजगाव येथील शाळेत हजेरी लावत वेळ निभावून नेतात. शाळेला विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे मैदान, शाळेसाठी इमारत आदी कोणतीही सुविधा विधायक कार्यसमिती संस्था अद्यापपर्यंत देऊ शकलेली नाही. या गोष्टीचा विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत पाठवण्याऐवजी इतर शाळांत दाखल करण्यास सुरुवात केली. यामुळे शाळेतीत विद्यार्थीसंख्या रोडावू लागली व शाळा बंद पडण्याच्या मार्गाला लागली आहे. शाळेत सध्या आदिवासी, व इतर मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची पटसंख्या ५०च्या आत आहे, परंतु प्रत्यक्ष शाळेत अवघे १९ विद्यार्थी नियमितपणे येतात. इयत्ता आठवी - ५ विद्यार्थी, इयत्ता नववी - ३ विद्यार्थी, व इयत्ता दहावी - १३ विद्यार्थी नियमित शाळेत येतात. हे आदिवासी विद्यार्थी शाळा बंद पडली तर शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार आहेत.