शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

हुश्श... झाले बुवा एकदाचे!

By admin | Updated: October 16, 2015 00:02 IST

श्रमपरिहारासाठी निमित्त कुंभमेळ्याच्या तणावमुक्तीचे

नाशिक : कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वण्या निर्विघ्न पार पडल्या. साधू-महंतही आखाडे, खालशांसह मार्गस्थ झाले. पवित्र गोदावरी व कुशावर्तात स्रान करून लाखो भाविक पुण्यही पदरात पाडून आपापल्या घरी गेले. त्याचप्रमाणे या पर्वाच्या यशस्वीतेसाठी ज्या काही यंत्रणांनी बरे-वाईट कामे केली, त्याचा गाळही गोदावरीत वाहून गेला. त्यामुळे सर्वार्थाने कुंभ यशस्वी केल्याबद्दल राज्य सरकारच्या प्रमुखांकडून त्याचे कोडकौतुक एकदा नव्हे, तर दोनदा करून झाल्याने तसे म्हटले, तर तेरा महिने चालणारा सिंहस्थाचा पर्व महिना-दीड महिन्यात संपुष्टात आणल्याचा जल्लोष साजरा केला नाही, तर उत्सवाचा गोडवा निघून जाईल, असे बहुधा प्रशासकीय यंत्रणेला वाटले असावे म्हणून की काय ‘आटोपत्या सिंहस्थ’ भोजनाचे त्यांना आयोजन करावे लागले आहे. जिल्हा प्रशासन प्रमुखांच्या दरबारी पार पडलेल्या या सुग्रास भोजनाची दरवळ थेट मुख्यालयाच्या कचेरीत पोहोचल्यामुळे त्याची खुली चर्चा होऊ लागली. अर्थातच काही कुचकटांकडून या भोजनाबद्दलही नको त्या शंका वा संशय व्यक्त करून पाच दशक संख्येच्या भोजनासाठी किती खर्च आला, असा प्रश्न विचारला जात असला तरी, त्याचे उत्तर देण्याच्या भानगडीत कोणी पडले नाही हे बरे. अन्नदानासारखे पुण्यदान कोणतेच नसते हे साऱ्याच धर्मग्रंथात नमूद केलेले असल्यामुळे अन्नग्रहण करणाऱ्यांना त्या अन्नाचा वा त्याच्या दात्याचा शोध घेण्याची तशीही गरज नसते. त्यामुळे बुधवारी रात्री ज्या स्थळी हा उदरभरणाचा सोहळा आयोजित केला होता, त्याचा दाता कोण असेल, हे नव्याने सांगण्याची तशी गरजही नाही. रात्रीचे जेवण म्हटल्यावर ज्या काही अपेक्षा तत्पूर्वी बाळगल्या त्यांना पूर्णपणे फाटा देण्यात आल्याने अनेकांना जेवणाअगोदर ‘सुपा’वर भागवावे लागले, तर ‘सामीष’ भोजनाची अपेक्षा ठेवून आलेल्यांचे ‘वांगे भरीत’ झाले. वास्तू तीच, परंतु व्यक्ती बदलल्याने त्याच्या आवडी-निवडीही कशा बदलतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला व काहींना भूतकाळाच्या आठवणींनी गहिवरूनही आले. तर काहींना पोट भरलेले असूनही ते रिते-रितेच असल्याची वेळोवेळी जाणीवही झाली. अर्थातच कुंभमेळ्यात दिवस-रात्र राबलेल्या मोजक्याच हातांसाठी हा सोहळा होता, त्यातही पुन्हा कुंभमेळ्याच्या नावे कार्यक्रमाचे आयोजन केलेले असल्याने त्यात शाकाहारापेक्षा अन्य आहारांची चव लागणेही शक्य नव्हते. (प्रतिनिधी)