शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

आम्ही व्यवसाय कसा करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:10 IST

‘प्लॅस्टिकबंदी ठीक आहे, पण प्लॅस्टिकच्या पिशव्या नसल्याने कपडे मळताय, तांब्या-पितळेची भांडी काळी पडताय, खाद्यपदार्थ, दही-लोण्यासारखे पातळ पदार्थ ग्राहकांना कसे द्यायचे, ग्राहकांची समजूत कशी काढायची?’ असे संवाद आता शनिवारी बाजारात भाजीविक्रेते, कपडे व्यापारी, भांडी व्यापारी, बेकरी व्यावसायिकांकडून ऐकू येऊ लागले आहेत.

नाशिक : ‘प्लॅस्टिकबंदी ठीक आहे, पण प्लॅस्टिकच्या पिशव्या नसल्याने कपडे मळताय, तांब्या-पितळेची भांडी काळी पडताय, खाद्यपदार्थ, दही-लोण्यासारखे पातळ पदार्थ ग्राहकांना कसे द्यायचे, ग्राहकांची समजूत कशी काढायची?’ असे संवाद आता शनिवारी बाजारात भाजीविक्रेते, कपडे व्यापारी, भांडी व्यापारी, बेकरी व्यावसायिकांकडून ऐकू येऊ लागले आहेत. प्लॅस्टिकबंदीनंतरची ही अवस्था! राज्य शासनाने गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला. तीन महिने आहे ते प्लॅस्टिक जमा करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी मुदतही दिली. आता मात्र २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली असून, बंदी असणारे प्लॅस्टिक वापरताना दिसल्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.  पर्यावरणदृष्ट्या हा विषय महत्त्वाचा असून, त्याचे स्वागत झाले पाहिजे आणि समर्थनही मिळाले पाहिजे; परंतु हा निर्णय अंमलात आणताना असंख्य अडचणी समोर येत आहे. प्रत्यक्ष बाजारातील व्यवहारात काय? प्लॅस्टिकबंदी निर्णयानंतर पर्यायी साधन म्हणून कापडी बॅग, कागदी बॅग यांचा पर्याय दिला जात असला तरी सर्वच गोेष्टींना तो सोयीस्कर ठरत नसल्याचे अनेकांच्या बोलण्यातून समोर आले. त्यामुळे आता शासनाच्या हेतूला समर्थन दिले जात असले तरी अडचणी पाहता प्लॅस्टिकबंदी विषयावरून वाद सुरू आहेत. नवीन कपडे, बेकरी पदार्थ, दही, लोणी, खवा यांसारखे द्रव पदार्थ आदींच्या खरेदी-विक्रीत अडचणी वाढल्या आहेत. त्यातच पावसाळा येऊ घातल्याने मालाचे संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकचे आवरण सर्वत्र पहायला मिळत असताना ते पॅकिंग काढण्याची लगबग दिसून येत आहे. प्लॅस्टिकचे संरक्षण आता फार काळ मिळणार नसल्याने दुकानदार चिंतेत पडले आहे. अशा साऱ्या कोलाहलाचा बाजारातील हा आखो देखा हाल.परराज्यातून येणा-या प्लॅस्टिकचे काय?शहरात येणारा बहुतांशी माल (साड्या, ड्रेस, कापड) गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दक्षिण भारत आदी ठिकाणांहून येतो. त्या राज्यात प्लॅस्टिकला बंदी नाही. त्यामुळे सर्व माल प्लॅस्टिकमध्येच पॅकिंग करून येणार असल्याने त्याचे काय करायचे? त्यामुळे आमच्यावर कारवाई होणार का?, आता माल आल्यावर प्लॅस्टिक पिशव्या काढत बसण्याचे काम वाढणार का? असे असंख्य प्रश्न कपडे बाजारात व्यावसायिकांकडून उपस्थित केले जात आहेत.भाज्या, फळे, फुले, कपड्यांची साठवणूक प्लॅस्टिकमध्येचबाजारात फेरफटका मारल्यानंतर विक्रीसाठी दुकानात, रस्त्यावर, गाड्यांवर ठेवलेला माल हा मोठमोठ्या प्लॅस्टिक पिशवीतच साठवून ठेवलेला दिसला. पारदर्शकता या प्लॅस्टिकच्या गुणामुळे तो ग्राहकांना चटकन दिसतो. व्यापारी, विक्रेते यांना तो हाताळताना सोपे जाते. ऊन, वारा, पाऊस यात तो प्लॅस्टिकमुळे टिकून राहतो. यामुळे भाजीपाला, फळे, फुले, रस्त्यावरील कपडे आदी गोष्टींची साठवणूक प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये दिसून आली. शिवाय यामुळे माल धूळ, मातीपासून सुरक्षितही राहतो. आता प्लॅस्टिकबंदीची आणखी कडक कारवाई सुरू झाल्यावर या व्यापारी, विक्रेत्यांनाही पर्याय शोधावे लागणार आहेत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी