शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

घरकुलांचे काम पाच वर्षांपासून अर्धवटच

By admin | Updated: November 24, 2015 22:31 IST

गंजमाळ येथील प्रकार : ३४० कुटुंबे बेघर होणे निश्चित

घरकुलांचे काम पाच वर्षांपासून अर्धवटचनाशिक : गंजमाळ येथील भीमवाडी येथे महापालिकेने सुरू केलेल्या घरकुल योजनेचे काम करारानुसार पंधरा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना पाच वर्षे झाले तरी पूर्ण झालेले नाही. त्यातच ४८० कुटुंबांना स्थलांतरित करून येथे योजना साकारली जात असताना प्रत्यक्षात मात्र १४० कुटुंबांनाच घरे मिळणार असून, उर्वरित ३४० लाभार्थींना बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे योजनेची चौकशी करावी, अशी मागणी बी. आर. आंबेकर लाईफ मिशन मंचने केली आहे.यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. गंजमाळ येथील भीमवाडीत महापालिकेने नेहरू नागरी अभियानाअंतर्गत घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचे भूमिपूजन १५ सप्टेंबर २०१० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. केंद्र शासनाच्या आदेशानुसार वेळेत घरकुल बांधणे आवश्यक होते. त्यासाठी त्याची मुदत १५ महिने होती. परंतु पाच वर्षे झाले तरी अद्याप योजनेचे काम सुरूच आहे. विशेष म्हणजे ४८० घरकुले बांधण्यासाठी योजना आखण्यात आली. मात्र, आता १४० पात्र कुटुंबांनाच घरे देण्यात येणार असून, तसे आश्वासन पत्र देण्यात आले आहे. असे असेल तर उर्वरित ३४० कुटुंबांनी कोठे राहायचे? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. मुळात घरकुल योजनेचे कामही नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा संबंधित संघटनेचा आरोप आहे. त्यासाठी नित्कृष्ट बांधकाम साहित्य वापरण्यात आले असून, घरे केव्हाही कोसळू शकतात, असा आरोप संघटनेने केला आहे. या सर्व प्रकारची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर साळवे तसेच सतीश कापसे, रुक्मिणी भोंड, नसीम शेख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.