शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

घरकुलांचे काम पाच वर्षांपासून अर्धवटच

By admin | Updated: November 24, 2015 22:31 IST

गंजमाळ येथील प्रकार : ३४० कुटुंबे बेघर होणे निश्चित

घरकुलांचे काम पाच वर्षांपासून अर्धवटचनाशिक : गंजमाळ येथील भीमवाडी येथे महापालिकेने सुरू केलेल्या घरकुल योजनेचे काम करारानुसार पंधरा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना पाच वर्षे झाले तरी पूर्ण झालेले नाही. त्यातच ४८० कुटुंबांना स्थलांतरित करून येथे योजना साकारली जात असताना प्रत्यक्षात मात्र १४० कुटुंबांनाच घरे मिळणार असून, उर्वरित ३४० लाभार्थींना बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे योजनेची चौकशी करावी, अशी मागणी बी. आर. आंबेकर लाईफ मिशन मंचने केली आहे.यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. गंजमाळ येथील भीमवाडीत महापालिकेने नेहरू नागरी अभियानाअंतर्गत घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचे भूमिपूजन १५ सप्टेंबर २०१० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. केंद्र शासनाच्या आदेशानुसार वेळेत घरकुल बांधणे आवश्यक होते. त्यासाठी त्याची मुदत १५ महिने होती. परंतु पाच वर्षे झाले तरी अद्याप योजनेचे काम सुरूच आहे. विशेष म्हणजे ४८० घरकुले बांधण्यासाठी योजना आखण्यात आली. मात्र, आता १४० पात्र कुटुंबांनाच घरे देण्यात येणार असून, तसे आश्वासन पत्र देण्यात आले आहे. असे असेल तर उर्वरित ३४० कुटुंबांनी कोठे राहायचे? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. मुळात घरकुल योजनेचे कामही नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा संबंधित संघटनेचा आरोप आहे. त्यासाठी नित्कृष्ट बांधकाम साहित्य वापरण्यात आले असून, घरे केव्हाही कोसळू शकतात, असा आरोप संघटनेने केला आहे. या सर्व प्रकारची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर साळवे तसेच सतीश कापसे, रुक्मिणी भोंड, नसीम शेख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.