शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पाच नगरसेवकांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:22 IST

हापालिकेच्या निवडणुकीचा निकाल घोषित होण्यास येत्या २३ आॅगस्टला सहा महिने पूर्ण होत आहेत. परंतु, महापालिकेवर आरक्षित जागांवरून निवडून गेलेल्या पाच नगरसेवकांनी अद्याप आपले जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. पाच नगरसेवकांमध्ये दोन भाजपा तर राष्टÑवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षामधील प्रत्येकी एक नगरसेवकाचा समावेश आहे.

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल घोषित होण्यास येत्या २३ आॅगस्टला सहा महिने पूर्ण होत आहेत. परंतु, महापालिकेवर आरक्षित जागांवरून निवडून गेलेल्या पाच नगरसेवकांनी अद्याप आपले जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. पाच नगरसेवकांमध्ये दोन भाजपा तर राष्टÑवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षामधील प्रत्येकी एक नगरसेवकाचा समावेश आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २१ फेबु्रवारी २०१७ रोजी मतदान होऊन दि. २३ फेबु्रवारीला मतमोजणी झाली होती. या निवडणुकीत प्रभाग २ (क) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटात भाजपाचे उद्धव निमसे यांनी दुसºया क्रमांकावर राहिलेल्या सेनेच्या जे. टी. शिंदे यांचा पराभव केला होता. प्रभाग २३ (ब) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात भाजपाच्या शाहीन मिर्झा सलीम बेग यांनी दुसºया क्रमांकावर राहिलेल्या सेनेच्या निर्मल राजेश थेटे यांचा पराभव केला होता. तसेच प्रभाग १४ (ब) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात राष्ट्रवादीच्या समीना शोएब मेमन यांनी दुसºया क्रमांकावर राहिलेल्या अपक्ष उमेदवार नाजीया जाकीया अत्तार यांच्यावर विजय मिळविला होता. प्रभाग क्रमांक ११ (ब) मधून अनुसूचित जमाती गटात मनसेचे योगेश किरण शेवरे यांनी दुसºया क्रमांकावरील भाजपाचे विठ्ठल लहारे यांना पराभूत केले होते, तर प्रभाग २२ (ब) मधून शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटात निवडणूक लढवत दुसºया क्रमांकावरील भाजपाच्या दीपाली कोठुळे यांच्याविरुद्ध विजय संपादन केला होता. या पाचही नगरसेवकांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते मात्र, सहा महिन्यांच्या आत आपण ते निवडणूक शाखेला सादर करू, असे प्रतिज्ञापत्रही लिहून दिले होते. आता सहा महिन्यांचा कालावधी येत्या २३ आॅगस्टला संपत असून, अद्याप या पाचही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर झालेले नाही. मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.