शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

समाजात हवे मैत्रीपूर्ण वातावरण : संतोष गटकळ

By admin | Updated: March 18, 2017 20:45 IST

समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही

नाशिक : समाजातील विविध घटकांमध्ये मैत्री व सद्भावनेचे वातावरण निर्माण झाल्यास कायद्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन विधिज्ञ अ‍ॅड. संतोष गटकळ यांनी केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने ‘नागरी हक्क संरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अधिनियम’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब थोरात झालेल्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून गटकळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपआयुक्त काशीनाथ गवळे, डॉ. सचिन परब, राजयोग ध्यानधारणा केंद्राच्या वासंती दिदी, सहायक आयुक्त प्राची वाजे, ‘देशदूत’चे सहायक संचालक विश्वास देवकर आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी गटकळ म्हणाले, राज्य घटनेने समानतेचे तत्त्व लागू करण्यासाठी सर्वांना सार्वजनिक स्त्रोताचा निर्भयतेने वापर करत मार्गदर्शक तत्त्वे दाखविली आहेत; मात्र समाजात परस्पर विरोधी विचारसरणीमुळे आंदोलन, मोर्चे यांसारख्या माध्यमातून कायद्यांना विरोध होतो. न्याय तत्त्वांची अंमलबजावणी करताना योग्य विचारांची गरज निर्माण होते. यासाठी घटनेने नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ साली निर्माण केला. या कायद्यावर मर्यादा आल्याने अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ लागू करण्यात आला. २०१५ साली यामध्ये काही सुधारणा झाल्या. याचा मुख्य उद्देश समाजातील विविध स्तरांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरणाची निर्मिती होणे, असा आहे