शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

थंडीत विद्यार्थी स्वेटरविनाच

By admin | Updated: January 8, 2017 01:05 IST

आरोप : आदिवासी विकास विभागाचा गोंधळ सुरूच

नाशिक : आदिवासी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या हिवाळ्यातही स्वेटर मिळालेले नाहीत. यामुळे ऐन थंडीच्या कडाक्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थी थंडीत कुडकुडत असून, विद्यार्थ्यांना स्वेटर मिळावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे. रेनकोट निविदाचा घोळ झाल्याने विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात रेनकोटपासून वंचित रहावे लागले होते. इतकेच नव्हे तर सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना स्वेटर न मिळाल्याने थंडीतच कुडकुडत बसावे लागत आहे. आताही आदिवासी विकास विभागामार्फत थंडीत पुरविल्या जाणाऱ्या स्वेटरचा असाच सावळा गोंधळ झाला. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना हिवाळ्यात स्वेटर मिळालेले नाही. जिल्ह्णात थंडीचा कडाका वाढत आहे, गेल्या आठवडाभरात तर थंडीचा पारा खाली उतरलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढलेली आहे. या परिस्थितीत आश्रम-शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वेटर नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. स्वेटर नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे आजाराचे प्रमाणदेखील वाढले आहेत. यातच आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. थंड पाण्याने त्यांना आंघोळ करावी लागते. खुद्द आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांच्या जिल्ह्यात जव्हार आश्रमशाळेतदेखील विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे माध्यमांमधून दाखविण्यात आले. मंत्र्यांच्या जिल्ह्यात असे असेल, तर राज्यातील आश्रमशाळांमध्ये काय परिस्थिती असेल. यासाठी थंडीचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना तत्काळ स्वेटर मिळाली पाहिजेत, अशी मागणी डॉ. पवार यांनी केली. (प्रतिनिधी)