शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मातब्बरांची ‘सौभाग्यवतीं’साठी ‘फिल्डिंग’

By admin | Updated: January 14, 2017 00:14 IST

नायगाव : गट महिला राखीव, गणात इच्छुक वाढले; सभापतिपदाच्या आरक्षणामुळे माळेगाव गणाची चलती

दत्ता दिघोळे  नायगावमाजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण जिल्हाभर ओळखला जाणारा नायगाव गट आगामी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिला राखीव झाल्याने पुन्हा एकदा मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवणारा ठरला आहे. गेल्या निवडणुकीत नायगाव गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता व होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ओबीसी महिला राखीव आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयात प्रवेश करण्याची मातब्बरांची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार नाही. त्यामुळे अनेकांनी गटाऐवजी गणाला पसंती दिली, तर काही मातब्बरांनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.२००७ची निवडणूकवगळता आजपर्यंत नायगाव गटात दिघोळे यांचे वर्चस्व राहिले आहे. गटात आजपर्यंत लहान-मोठ्या सर्वच निवडणुका दिघोळेविरुद्ध कोकाटे गट अशाच झाल्या आहेत. त्यात दिघोळे यांचे वर्चस्व कायम राहिले असले तरी गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणांमुळे त्यांचे फिरणे कमी झाल्याने परिसरासह संपूर्ण गटात माणिकराव कोकाटे, आमदार राजाभाऊ वाजे व पंचायत समिती सदस्य उदय सांगळे यांच्याभोवती गटाचे राजकारण फिरत आहे. असे असले तरी दिघोळे यांना मानणारा निर्णायक मतप्रवाह आजही गटात टिकून आहे. २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेसमध्ये सरळ लढत होऊन अर्जुन बर्डे यांच्या रूपाने दिघोळे यांच्या राष्ट्रवादी पक्षाने विजय मिळवला होता. गेल्या काही दिवसांत तालुक्याच्या राजकारणात बदल झाल्याने सध्या शिवसेना व भाजपा यांच्यातच सरळ लढत होत असल्याने आगामी निवडणुकीत सेना व भाजपामध्येच सामना रंगण्याचे चित्र असले तरी इच्छुकांची संख्याही विशिष्ट भागातच असल्याने गटाचा समतोल राखत उमेदवारी देण्याचे कसबच कळीचा मुद्दा ठरणार आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे उमेदवारीसाठी मतप्रवाहही बदलत असल्याने सध्या दुरंगी वाटणारी ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आत्ताच नाकारणे धाडसाचे ठरणार आहे. असे झालेच तर गटाची निवडणूक स्त्री प्रधान असली तरी ती अधिकच रंजक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव असल्याने या निवडणुकीला २००७ सालच्या निवडणुकीसारखी महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीला चांगलाच राजकीय रंग चढणार हे नक्की. गेल्या निवडणुकीच्या वेळी या गटात मनसेचा अपवादवगळता कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली असली तरी प्रत्यक्षात ती निवडणूक दिघोळे विरुद्ध कोकाटे अशीच खरी लढत होती. त्यावेळी गटात सेना व भाजपाचा मागमूसही नव्हता. व्यक्तिकेंद्रित राजकारणात बदल होऊन गत पाच वर्षात ज्याप्रमाणे तालुक्याचे राजकारण बदलले तसेच गटातील राजकारणातही मोठे बदल झाल्याने या निवडणुकीत कोणाला विजयी व कोणाला पराभवाला सामोरे जावे लागते हे येणारी निवडणूकच ठरवणार आहे. होणारी निवडणूक जशी उमेदवारांच्या सामाजिक कार्याची पोहच पावती ठरणार आहे. तशीच ती गत पाच वर्षात गटातील गावागावात झालेल्या विकासकामां-बरोबर न झालेल्या कामांची पावतीच ठरणार आहे.