शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मातब्बरांची ‘सौभाग्यवतीं’साठी ‘फिल्डिंग’

By admin | Updated: January 14, 2017 00:14 IST

नायगाव : गट महिला राखीव, गणात इच्छुक वाढले; सभापतिपदाच्या आरक्षणामुळे माळेगाव गणाची चलती

दत्ता दिघोळे  नायगावमाजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण जिल्हाभर ओळखला जाणारा नायगाव गट आगामी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिला राखीव झाल्याने पुन्हा एकदा मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवणारा ठरला आहे. गेल्या निवडणुकीत नायगाव गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता व होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ओबीसी महिला राखीव आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयात प्रवेश करण्याची मातब्बरांची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार नाही. त्यामुळे अनेकांनी गटाऐवजी गणाला पसंती दिली, तर काही मातब्बरांनी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.२००७ची निवडणूकवगळता आजपर्यंत नायगाव गटात दिघोळे यांचे वर्चस्व राहिले आहे. गटात आजपर्यंत लहान-मोठ्या सर्वच निवडणुका दिघोळेविरुद्ध कोकाटे गट अशाच झाल्या आहेत. त्यात दिघोळे यांचे वर्चस्व कायम राहिले असले तरी गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणांमुळे त्यांचे फिरणे कमी झाल्याने परिसरासह संपूर्ण गटात माणिकराव कोकाटे, आमदार राजाभाऊ वाजे व पंचायत समिती सदस्य उदय सांगळे यांच्याभोवती गटाचे राजकारण फिरत आहे. असे असले तरी दिघोळे यांना मानणारा निर्णायक मतप्रवाह आजही गटात टिकून आहे. २०१२च्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेसमध्ये सरळ लढत होऊन अर्जुन बर्डे यांच्या रूपाने दिघोळे यांच्या राष्ट्रवादी पक्षाने विजय मिळवला होता. गेल्या काही दिवसांत तालुक्याच्या राजकारणात बदल झाल्याने सध्या शिवसेना व भाजपा यांच्यातच सरळ लढत होत असल्याने आगामी निवडणुकीत सेना व भाजपामध्येच सामना रंगण्याचे चित्र असले तरी इच्छुकांची संख्याही विशिष्ट भागातच असल्याने गटाचा समतोल राखत उमेदवारी देण्याचे कसबच कळीचा मुद्दा ठरणार आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे उमेदवारीसाठी मतप्रवाहही बदलत असल्याने सध्या दुरंगी वाटणारी ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आत्ताच नाकारणे धाडसाचे ठरणार आहे. असे झालेच तर गटाची निवडणूक स्त्री प्रधान असली तरी ती अधिकच रंजक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव असल्याने या निवडणुकीला २००७ सालच्या निवडणुकीसारखी महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीला चांगलाच राजकीय रंग चढणार हे नक्की. गेल्या निवडणुकीच्या वेळी या गटात मनसेचा अपवादवगळता कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली असली तरी प्रत्यक्षात ती निवडणूक दिघोळे विरुद्ध कोकाटे अशीच खरी लढत होती. त्यावेळी गटात सेना व भाजपाचा मागमूसही नव्हता. व्यक्तिकेंद्रित राजकारणात बदल होऊन गत पाच वर्षात ज्याप्रमाणे तालुक्याचे राजकारण बदलले तसेच गटातील राजकारणातही मोठे बदल झाल्याने या निवडणुकीत कोणाला विजयी व कोणाला पराभवाला सामोरे जावे लागते हे येणारी निवडणूकच ठरवणार आहे. होणारी निवडणूक जशी उमेदवारांच्या सामाजिक कार्याची पोहच पावती ठरणार आहे. तशीच ती गत पाच वर्षात गटातील गावागावात झालेल्या विकासकामां-बरोबर न झालेल्या कामांची पावतीच ठरणार आहे.