शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: April 3, 2017 00:41 IST

येवला : विक्र मी कांदा उत्पादन व कोसळलेले भाव यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यासंदर्भात कृषिमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला आहे.

 येवला : विक्र मी कांदा उत्पादन व कोसळलेले भाव यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला आहे. या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी जोरदार मागणी येवला बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी केली आहे. डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत येवला बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार आवारांवर पोळ (लाल) व रांगडा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. पोषक हवामान असल्याने उन्हाळ कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. कांदा हा नाशवंत व जास्त दिवस न टिकणारा शेतमाल आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. सद्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव किमान तीनशे रुपये ते कमाल सहाशे रुपये, तर सरासरी पाचशे रुपये प्रतिक्विंटल आहे. सदर बाजारभाव अत्यंत कमी असून, या बाजारभावाने उत्पादन खर्चदेखील भरून निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सध्या कांद्याची निर्यात चांगली सुरू आहे व परदेशात कांद्याला मागणीदेखील चांगली असल्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांना कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च, त्यासाठी सरकारी व सहकारी वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आदि खर्चसुद्धा भागणार नसल्याने पर्यायाने शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ कांद्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. कांदा निर्यातीवर निर्बंध लादू नये व कांदा निर्यात मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी योजनेस मुदतवाढ देणे गरजेचे आहे. कांदा या शेतमालाच्या उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळलेला असून कार्यक्षेत्रात कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, हरियाणा व पश्चिम बंगाल या प्रांतांतदेखील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. उत्पादन वाढले असतानादेखील थोडेसे भाव वाढले की कांद्याची निर्यात बंदी केली जाते. (वार्ताहर)