शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

संपूर्ण महाराष्टÑात एकच डीएसआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:01 IST

कोणत्याही कामासाठी जिल्हास्तरावरील उपलब्धता बघून दर निश्चित करण्यासाठी जिल्हा नियंत्रण दर म्हणजेच डीएसआर पद्धत अंमलात होती. परंतु आता ती रद्द करून महाराष्टÑ नियंत्रण दर म्हणजेच राज्यस्तरावरील दर असणार आहेत. परंतु सर्व ठिकाणी स्थानिक उपलब्धता आणि अंतर या सर्वांचा विचार करता हे कसे शक्य आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संजय पाठक ।नाशिक : कोणत्याही कामासाठी जिल्हास्तरावरील उपलब्धता बघून दर निश्चित करण्यासाठी जिल्हा नियंत्रण दर म्हणजेच डीएसआर पद्धत अंमलात होती. परंतु आता ती रद्द करून महाराष्टÑ नियंत्रण दर म्हणजेच राज्यस्तरावरील दर असणार आहेत. परंतु सर्व ठिकाणी स्थानिक उपलब्धता आणि अंतर या सर्वांचा विचार करता हे कसे शक्य आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रातील भाजपा सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू करताना अन्याय केल्याची भावना ठेकेदारांच्या विविध संघटना व्यक्त करीत आहेत. परंतु त्यापलीकडे जाऊन राज्य सरकारने कथित सुधारणांच्या नावाखाली जे निर्णय घेतले आहेत, ते अत्यंत अव्यवहार्य असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात राज्य सरकारने काढलेल्या एका आदेशात जिल्हा दर नियंत्रण सूची म्हणजेच डीएसआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यस्तरावर यापुढे सूची असेल असे जाहीर करण्यात आले.कोणतेही काम करण्यासाठी बाजारातील मजुराच्या दरापासून वाळू, खडी, मुरूम यांसारख्या सर्व साहित्यांचे तत्कालीन दर लक्षात घेतले जातात. त्यानुसार दर संकलित करून निविदा तयार केली जाते. स्थानिक पातळीवर शासनाच्या बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता सदरचे काम करीत असते आणि त्यांनी तयार केलेले दर आधार मानूनच विविध शासकीय आणि निमशासकीय खाते निविदा तयार करीत असतात. परंतु आता हे अधिकार शासनाने आपल्याकडे घेतले आहेत. त्यातून अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर नाशिकला सहा ते साडेसहा हजार रुपये ब्रास वाळू मिळते. परंतु मुंबईला हेच दर सुमारे आठ ते दहा हजार रुपयांच्या आसपास आहे, तर नागपूर भागात दीड हजार रुपये ब्रास वाळूचे दर आहेत. आता राज्य शासनाने यातील कोणताही एक दर आधार मानला तर नाशिकच्या ठेकेदाराला नागपूरला काम सोपे वाटेल, परंतु तेच नाशिक किंवा मुंबईमध्ये काम करणे परवडणारच नाही. परिणामी ही कामे कशी होणार याचा मोठा गोंधळ उडणार आहे. मुंबई परिसरात दगडांच्या खाणी नाहीत तसेच अन्य अनेक अडचणी आहेत. परंतु तेथे अन्य भागांतील सरासरी दर लावले तर काम करणे परवडू शकेल काय अशा अनेक अडचणी असून, राज्य शासन व्यावहारिक बाबींचा विचार करीत नसल्याच्या कंत्राटदारांच्या भावना झाल्या आहेत. म्हणजेच स्थानिक स्तरावर कुठे रेती तर कुठे दगड, मुरूम सहज उपलब्ध आहेत किंवा दूर अंतरावर आहेत, त्यावर आधारित पूर्वी असलेले दर आता संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखेच करण्यात येणार असून, अशावेळी शासकीय कामांवरच प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. (क्रमश:)‘तुमचे तुम्ही बघा’ धोरण...राज्य शासनाच्या एप्रिल महिन्यातील या सुधारणांविषयी अनेक अडचणी आहेत, परंतु कोणालाही विश्वासात न घेता अव्यहार्य पद्धतीने निर्णय घेतला जात असल्याने अनेक संघटनांनी शासकीय अधिकाºयांपर्यंत भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ही जणू शुद्धीकरण मोहीम सुरू असल्याच्या आविर्भावात अधिकारी बोलत असून, राज्य शासनाचा हा निर्णय आहे. त्यामुळे ‘तुमचे तुम्ही बघा’, असे सांगत आहेत.