शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

आठ तासानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

By admin | Updated: January 13, 2016 00:12 IST

नाकोडा : वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण; प्रशासनाची उडाली झोप

कळवण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृह नाकोडा येथील विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवण व शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आश्वासनंतर तब्बल आठ तासांनी आंदोलन मागे घेतले. प्रकल्प अधिकारी गंगाथारण यांनी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ व अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेचे लकी जाधव याच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना शक्य त्या सुविधा सात दिवसात देण्याचे आश्वासन दिले. इतर सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी सांगितले.मुलांना अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून, शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री प्रकल्पाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेण्यास यंत्रणा न आल्याने मोर्चा नाशिक आयुक्त कार्यालयाकडे वळविला. रात्री १० वाजता मानूर येथे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मनधरणी केल्यानंतर विद्यार्थी माघारी फिरले. मंगळवारी (दि.१२) सकाळी शाळेत जाण्याबाबत नकार दर्शवत मागण्यांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. प्रकल्पाधिकारी गंगाथरण चर्चा करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. प्रकल्पाधिकारी गंगाथरण हे बाहेरगावी आहे. विद्यार्थ्यांनी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर ठाण मांडल्याने प्रशासनाची झोप उडाली. रात्री उशीरापर्यंत आदिवासी प्रकल्प कार्यालय येथील जबाबदार अधिकारी येथे पोहचू न शकल्याने आंदोलन सुरूच होते. दबावामुळे ह्या प्रश्नाला वाचा फुटत नाही. नाशिकला मार्गस्थ झालेल्या विद्यार्थ्यांशी मानूरला पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी संवाद साधून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवा, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांनी प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन भाजपा जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिले. त्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थ्यांची मनधरणी करून त्यांना माघारी फिरविण्यात यश आल्यानंतर नगरसेवक जयेश पगार यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहावर रवाना केले. यावेळी सागर खैरनार, उमेश तेली, जितेंद्र वाघ, साहेबराव पगार, विनोद मालपुरे उपस्थित होते. (वार्ताहर)