शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

आठ तासानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

By admin | Updated: January 13, 2016 00:12 IST

नाकोडा : वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण; प्रशासनाची उडाली झोप

कळवण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृह नाकोडा येथील विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवण व शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आश्वासनंतर तब्बल आठ तासांनी आंदोलन मागे घेतले. प्रकल्प अधिकारी गंगाथारण यांनी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ व अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेचे लकी जाधव याच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना शक्य त्या सुविधा सात दिवसात देण्याचे आश्वासन दिले. इतर सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी सांगितले.मुलांना अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून, शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री प्रकल्पाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेण्यास यंत्रणा न आल्याने मोर्चा नाशिक आयुक्त कार्यालयाकडे वळविला. रात्री १० वाजता मानूर येथे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मनधरणी केल्यानंतर विद्यार्थी माघारी फिरले. मंगळवारी (दि.१२) सकाळी शाळेत जाण्याबाबत नकार दर्शवत मागण्यांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. प्रकल्पाधिकारी गंगाथरण चर्चा करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. प्रकल्पाधिकारी गंगाथरण हे बाहेरगावी आहे. विद्यार्थ्यांनी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर ठाण मांडल्याने प्रशासनाची झोप उडाली. रात्री उशीरापर्यंत आदिवासी प्रकल्प कार्यालय येथील जबाबदार अधिकारी येथे पोहचू न शकल्याने आंदोलन सुरूच होते. दबावामुळे ह्या प्रश्नाला वाचा फुटत नाही. नाशिकला मार्गस्थ झालेल्या विद्यार्थ्यांशी मानूरला पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी संवाद साधून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवा, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांनी प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन भाजपा जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिले. त्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थ्यांची मनधरणी करून त्यांना माघारी फिरविण्यात यश आल्यानंतर नगरसेवक जयेश पगार यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहावर रवाना केले. यावेळी सागर खैरनार, उमेश तेली, जितेंद्र वाघ, साहेबराव पगार, विनोद मालपुरे उपस्थित होते. (वार्ताहर)