शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

१९७२ पेक्षाही यंदा तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर

By admin | Updated: September 4, 2015 23:00 IST

१९७२ पेक्षाही यंदा तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर

पिळकोस : कळवण तालुक्यातील पूर्वभागातील पिळकोस, बेज, भादवण, विसापूर, बिजोरे, बगडू, भेंडी यांसह परिसरातील सर्व गावांतील पिके पावसाअभावी जळून खाक झाली असून, तेथील विहिरीसुद्धा कोरड्याठाक झालेल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी पिकांची आशा सोडून दिली आहे.पाऊस झाला नसल्यामुळे नदी- नाले, बंधारे हे कोरडे झाले असून, रानात चरणाऱ्या जनावरांना गवताची काडीदेखील नसल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक, शेतमजूर, मेंढपाळ, गुराखी हे पिकांचे व पशुधनाचे हाल होत असल्यामुळे हवालदिल झाले आहेत. पाऊस येईल असे कुठलेच चिन्ह दिसत नाही व प्रशासकीय यंत्रणाही दुष्काळी परिस्थितीबाबत उपयोजना आखत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेवर दुष्काळाचे सावट ओढवल्याने चारा, पाणी तसेच रोजंदारीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावू लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आजपर्यंत पिके वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते; परंतु आजपर्यंत पाऊस आलाच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सोडली असून, प्रशासन दुष्काळी परिस्थिती असूनदेखील तालुकापातळीवरून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा ग्रामस्थांकडून होत आहे.आज रोजी शासकीय यंत्रणेने परिस्थितीचा आढावा घेऊन पशुधनाला चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसतानादेखील महागडा चारा विकत घ्यावा लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चाऱ्याअभावी विकून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले असून, पाऊस येईल एवढी आशा अजूनही काहींनी बोलून दाखविली.एकंदरीत शेतकरी बांधवानी शेतीसाठी खरिपाला लावलेले सर्व भाग-भांडवल वाया गेले असून, परिसरातील शेतकरी परिस्थितीला तोंड देत देत हताश झाले आहेत. आजची दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला तर शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असून, पिके वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. (वार्ताहर)हातातोंडाशी आलेले पीकही पाऊस व विहिरीला पाणी नसल्याने सोडावे लागत आहे. १९७२चा दुष्काळ भोगला आहे, त्यावेळी खरीप पिके आली होती. जनावरांना मुबलक चारा होता. मात्र आज शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.