शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

१९७२ पेक्षाही यंदा तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर

By admin | Updated: September 4, 2015 23:00 IST

१९७२ पेक्षाही यंदा तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर

पिळकोस : कळवण तालुक्यातील पूर्वभागातील पिळकोस, बेज, भादवण, विसापूर, बिजोरे, बगडू, भेंडी यांसह परिसरातील सर्व गावांतील पिके पावसाअभावी जळून खाक झाली असून, तेथील विहिरीसुद्धा कोरड्याठाक झालेल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी पिकांची आशा सोडून दिली आहे.पाऊस झाला नसल्यामुळे नदी- नाले, बंधारे हे कोरडे झाले असून, रानात चरणाऱ्या जनावरांना गवताची काडीदेखील नसल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक, शेतमजूर, मेंढपाळ, गुराखी हे पिकांचे व पशुधनाचे हाल होत असल्यामुळे हवालदिल झाले आहेत. पाऊस येईल असे कुठलेच चिन्ह दिसत नाही व प्रशासकीय यंत्रणाही दुष्काळी परिस्थितीबाबत उपयोजना आखत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेवर दुष्काळाचे सावट ओढवल्याने चारा, पाणी तसेच रोजंदारीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावू लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आजपर्यंत पिके वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते; परंतु आजपर्यंत पाऊस आलाच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सोडली असून, प्रशासन दुष्काळी परिस्थिती असूनदेखील तालुकापातळीवरून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा ग्रामस्थांकडून होत आहे.आज रोजी शासकीय यंत्रणेने परिस्थितीचा आढावा घेऊन पशुधनाला चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसतानादेखील महागडा चारा विकत घ्यावा लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चाऱ्याअभावी विकून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले असून, पाऊस येईल एवढी आशा अजूनही काहींनी बोलून दाखविली.एकंदरीत शेतकरी बांधवानी शेतीसाठी खरिपाला लावलेले सर्व भाग-भांडवल वाया गेले असून, परिसरातील शेतकरी परिस्थितीला तोंड देत देत हताश झाले आहेत. आजची दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला तर शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असून, पिके वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. (वार्ताहर)हातातोंडाशी आलेले पीकही पाऊस व विहिरीला पाणी नसल्याने सोडावे लागत आहे. १९७२चा दुष्काळ भोगला आहे, त्यावेळी खरीप पिके आली होती. जनावरांना मुबलक चारा होता. मात्र आज शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.