शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१९७२ पेक्षाही यंदा तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर

By admin | Updated: September 4, 2015 23:00 IST

१९७२ पेक्षाही यंदा तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर

पिळकोस : कळवण तालुक्यातील पूर्वभागातील पिळकोस, बेज, भादवण, विसापूर, बिजोरे, बगडू, भेंडी यांसह परिसरातील सर्व गावांतील पिके पावसाअभावी जळून खाक झाली असून, तेथील विहिरीसुद्धा कोरड्याठाक झालेल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी पिकांची आशा सोडून दिली आहे.पाऊस झाला नसल्यामुळे नदी- नाले, बंधारे हे कोरडे झाले असून, रानात चरणाऱ्या जनावरांना गवताची काडीदेखील नसल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक, शेतमजूर, मेंढपाळ, गुराखी हे पिकांचे व पशुधनाचे हाल होत असल्यामुळे हवालदिल झाले आहेत. पाऊस येईल असे कुठलेच चिन्ह दिसत नाही व प्रशासकीय यंत्रणाही दुष्काळी परिस्थितीबाबत उपयोजना आखत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेवर दुष्काळाचे सावट ओढवल्याने चारा, पाणी तसेच रोजंदारीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावू लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आजपर्यंत पिके वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते; परंतु आजपर्यंत पाऊस आलाच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सोडली असून, प्रशासन दुष्काळी परिस्थिती असूनदेखील तालुकापातळीवरून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा ग्रामस्थांकडून होत आहे.आज रोजी शासकीय यंत्रणेने परिस्थितीचा आढावा घेऊन पशुधनाला चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसतानादेखील महागडा चारा विकत घ्यावा लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चाऱ्याअभावी विकून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले असून, पाऊस येईल एवढी आशा अजूनही काहींनी बोलून दाखविली.एकंदरीत शेतकरी बांधवानी शेतीसाठी खरिपाला लावलेले सर्व भाग-भांडवल वाया गेले असून, परिसरातील शेतकरी परिस्थितीला तोंड देत देत हताश झाले आहेत. आजची दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला तर शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असून, पिके वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. (वार्ताहर)हातातोंडाशी आलेले पीकही पाऊस व विहिरीला पाणी नसल्याने सोडावे लागत आहे. १९७२चा दुष्काळ भोगला आहे, त्यावेळी खरीप पिके आली होती. जनावरांना मुबलक चारा होता. मात्र आज शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.