शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर

By admin | Updated: July 16, 2016 00:44 IST

हमीभावाची खात्री, तरच शेतमाल नियमन विक्री

 गणेश धुरी नाशिककाही का होईना, शेतकरी हिताचा निर्णय गेल्या साठ वर्षांत होत नव्हता, तो आम्ही आल्या आल्या घेतला, असे म्हणण्यास थोडी जरी जागा राज्य सरकारने निर्माण केलेली असली तरी, हा निर्णय म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. म्हणजे सरकारला खरोखरच शेतकरी हिताची काळजी आहे, असे म्हणता येईल. आधी शेतकऱ्यांच्या शेतमालाला ‘हमीभाव’ देण्याचे निश्चित धोरण आखण्यापेक्षा नियमनमुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांच्या आणि व्यवस्थेच्या कितपत पचनी पडेल, यात शंका आहे. पायाच्या पंजाला खरूज झाली म्हणून संपूर्ण पायच तोडण्याचा हा प्रकार नियमनमुक्तीच्या बाबतीत घडत आहे. नाही तर आजमितीस व्यापाऱ्यांच्या संपामुळे भर पावसात शेतकऱ्यांना रस्त्यावर भाजीपाला विक्रीची वेळ आली नसती.उद्या उठून कोणी जर या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेच (नव्हे, कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने ती तयारी केलीच आहे) तर या निर्णयाच्या मागील सहकार विभागाच्या एका अध्यादेशासारखा हाही आदेश पालापाचोळ्यासारखीच स्थिती होण्याची अधिक शक्यता आहे. घोटाळेबाज नागरी आणि जिल्हा बॅँकेच्या संचालकांना पुढील दहा वर्षे निवडणूक लढविण्याची बंदी घालण्याच्या निर्णयाचे असेच काहीसे घोंगडे भिजते आहे. त्यात आता या निमयनमुक्तीचा निर्णय शेतकरी हिताचा ठरण्याची अपेक्षा ठेवणे कितपत संयुक्तिक आहे. या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश आता सहकार आणि पणन विभाग काढत आहे. आधी त्यांनीच व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीचे परवाने द्यायचे, मग त्यांनीच त्यांच्या परवान्यांवर टाच आणायची. यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व ते कशासाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मुळातच आजमितीस राज्यातील सहकार आणि पर्यायाने कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. ते मोडीत काढण्यासाठीच हा नियमनमुक्तीचा निर्णय झाला का? असा विचार आता विरोधी पक्षाकडून सुरू आहे. त्यात व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजार समित्यांचे ठप्प झालेले व्यवहार आणि त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्याच शेतमालाची थांबलेली विक्री पाहता, सरकारला हा आरोप खोडून काढण्यासाठी अनेक कारणे द्यावी लागतील. जी कारणे तूर्तास तरी सरकारकडे नाहीत, असे म्हणावे लागेल. बाजार समिती सोडून जर शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली तर काय दूधविक्रेत्यासारखे ‘दारोदार’ आम्ही फिरायचे की काय? आणि त्यासाठी मग संपूर्ण कुटुंबच शेतमाल विक्रीला जुपायचे काय? या शेतकऱ्यांच्या मार्मिक प्रश्नांवर उत्तर ते काय द्यायचे, याचीही तयारी यंत्रणेने केली पाहिजे. यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सरकारची मानसिकता असेल, तर त्यासाठी दूरगामी धोरण आखून त्याची अंमलबजावणी होणे तितकेच गरजेचे आहे. केवळ नियमनमुक्ती करून शेतकरी व्यापाऱ्यांच्या जोखडातून मुक्त होणार नाही. त्यासाठी समांतर पर्यायी व्यवस्था तयार करणेही तितकेच गरजेचे आहे. (समाप्त)