शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराचे ओझे; अंमलबजावणी डोईजडच!

By admin | Updated: July 24, 2015 00:25 IST

जिल्ह्यातील स्थिती : शिक्षण विभागाकडून केवळ सूचनांची सरबत्ती

नाशिक : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत आजवर अनेकदा घोषणा होऊनही जिल्ह्यात त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नसल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या नव्या घोषणेच्या अंमलबजावणीबाबतही प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी उद्या (दि.२४) कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलावली असून, त्यात याबाबत सूचना केल्या जाणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजतो आहे. त्या-त्या वेळच्या शिक्षणमंत्र्यांनी याबाबत घोषणा केल्या; मात्र अंमलबजावणीबाबत जिल्ह्यात तरी ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच परिस्थिती राहिली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल काल विधान परिषदेत सादर केला. त्यात शाळा, मुख्याध्यापक व पालकांसाठी अनेक सूचना देण्यात आल्या असून, त्यांची अंमलबजावणी पुढच्या वर्षीपासून केली जाणार आहे. तथापि, ज्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करता येणे शक्य आहे, त्या शाळांनी लगेच सुधारणा करावी, असे जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. त्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी हे मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन सूचना करणार आहेत. सध्या शाळांमध्ये जुनी पुस्तके उरली आहेत. विद्यार्थ्यांना ती घरी अभ्यासासाठी उपलब्ध करून द्यावीत व नवी पुस्तके शाळेत वापरण्यासाठी ठेवावीत, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र शाळांमध्ये स्वतंत्रपणे पुस्तके ठेवण्यासाठी कपाटे वा लॉकरच उपलब्ध नसल्याने शाळा याची अंमलबजावणी कशी करतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राचार्यांची आज बैठकमाध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने उद्या (दि.२४) सकाळी ११ वाजता पंचवटीतील आरपी विद्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. सदर बैठक अकरावी प्रवेशप्रक्रियेबाबत असली, तरी त्यात दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतच्या काही तातडीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले जाणार आहे. सूचना विचारात घ्याव्यातशिक्षणमंत्र्यांनी विधान परिषदेत अहवाल सादर केला असला, तरी याबाबत शासनाच्या निर्णयाबाबत स्पष्टता नाही. या अहवालावर शाळा, मुख्याध्यापक, पालक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घ्यायला हवी. अनेकदा शासन वरच्या स्तरावर तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे होते; मात्र अंमलबजावणी करताना अडचणी येतात. याबाबत इंदिरानगरच्या बोगद्याचे उदाहरण देता येईल. बालहक्क कायद्यातही मुलांना शारीरिक व मानसिक त्रास न होऊ देण्याच्या तरतुदी आहेत. दप्तराचे ओझे शारीरिक ओझ्यात मोडते; मात्र त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही, असे शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे प्रा. मिलिंद वाघ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)