शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: June 10, 2016 00:08 IST

दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदारांनी त्यांच्या कारखान्यातील रासायनिक केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले असून, या दूषित पाण्यामुुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील नापीक झाल्याने शेतकऱ्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाणी पावसाळी नाल्यांत सोडू नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिल्यानंतरही यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील जे व एफ सेक्टरसह इतर भागात पावडर कोटिंगचा वापर करून व प्लेटिंग तसेच रासायनिक केमिकल्सचा वापर करून जॉब तयार करण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांनी त्यांचे केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेच दूषित पाणी जमिनीत झिरपत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या विहिरींनादेखील हिरवळ व दूषित पाणी येत आहे. यामुळे शेतात पीकच येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. दूषित पाण्यामुळे पिके जळून जात असून, शेत नापिक झाले आहे. याबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याले चित्र बघावयास मिळत आहे. कारखान्यांचे केमिकलयुक्त दूषित पाणी पावसाळी नाल्याद्वारे थेट नासर्डी नदीत जात असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे केमिक लयुक्त पाणी पावसाळी नाल्यात सोडू देऊ नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिलेले असतानाही याबाबत अद्याप शासनाकहून कोणतीही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. अंबड येथील अल्फ इंजिनिअरिंग या कारखानदाराने लाखो रुपये खर्च करून या दूषित पाण्यासाठी स्वतंत्र एसटीपी प्लान्ट तयार केला आहे. कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)