शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: June 10, 2016 00:08 IST

दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदारांनी त्यांच्या कारखान्यातील रासायनिक केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले असून, या दूषित पाण्यामुुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील नापीक झाल्याने शेतकऱ्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाणी पावसाळी नाल्यांत सोडू नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिल्यानंतरही यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील जे व एफ सेक्टरसह इतर भागात पावडर कोटिंगचा वापर करून व प्लेटिंग तसेच रासायनिक केमिकल्सचा वापर करून जॉब तयार करण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांनी त्यांचे केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेच दूषित पाणी जमिनीत झिरपत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या विहिरींनादेखील हिरवळ व दूषित पाणी येत आहे. यामुळे शेतात पीकच येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. दूषित पाण्यामुळे पिके जळून जात असून, शेत नापिक झाले आहे. याबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याले चित्र बघावयास मिळत आहे. कारखान्यांचे केमिकलयुक्त दूषित पाणी पावसाळी नाल्याद्वारे थेट नासर्डी नदीत जात असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे केमिक लयुक्त पाणी पावसाळी नाल्यात सोडू देऊ नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिलेले असतानाही याबाबत अद्याप शासनाकहून कोणतीही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. अंबड येथील अल्फ इंजिनिअरिंग या कारखानदाराने लाखो रुपये खर्च करून या दूषित पाण्यासाठी स्वतंत्र एसटीपी प्लान्ट तयार केला आहे. कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)