शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: June 10, 2016 00:08 IST

दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदारांनी त्यांच्या कारखान्यातील रासायनिक केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले असून, या दूषित पाण्यामुुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील नापीक झाल्याने शेतकऱ्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाणी पावसाळी नाल्यांत सोडू नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिल्यानंतरही यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील जे व एफ सेक्टरसह इतर भागात पावडर कोटिंगचा वापर करून व प्लेटिंग तसेच रासायनिक केमिकल्सचा वापर करून जॉब तयार करण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांनी त्यांचे केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेच दूषित पाणी जमिनीत झिरपत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या विहिरींनादेखील हिरवळ व दूषित पाणी येत आहे. यामुळे शेतात पीकच येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. दूषित पाण्यामुळे पिके जळून जात असून, शेत नापिक झाले आहे. याबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याले चित्र बघावयास मिळत आहे. कारखान्यांचे केमिकलयुक्त दूषित पाणी पावसाळी नाल्याद्वारे थेट नासर्डी नदीत जात असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे केमिक लयुक्त पाणी पावसाळी नाल्यात सोडू देऊ नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिलेले असतानाही याबाबत अद्याप शासनाकहून कोणतीही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. अंबड येथील अल्फ इंजिनिअरिंग या कारखानदाराने लाखो रुपये खर्च करून या दूषित पाण्यासाठी स्वतंत्र एसटीपी प्लान्ट तयार केला आहे. कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)