शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकमध्ये कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला

By admin | Updated: February 25, 2017 00:13 IST

त्र्यंबकमध्ये कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला

वसंत तिवडे :त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रत्येक वेळेस सत्तेची समीकरणे बदलत असल्याचा इतिहास आहे. यंदा काँग्रेसला ‘ओव्हर कॉँफिडेन्स’मुळे पराभवाचे धनी व्हावे लागले आहे. तालुक्यातील तीन गट व सहा गणांमध्ये उमदवारांना संमिश्र अन् अनपेक्षित कौल मिळाला आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलणार असून आगामी राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हरसूल गटात राष्ट्रवादी पुरस्कृत (अपक्ष) उमेदवार रुपांगली माळेकर तर अंजनेरी गटात शंकुतला डगळे (काँग्रेस) ठाणापाडा गटातून माकपाच्या रमेश बरक विजयी झाले आहेत.  गेल्या मागच्या निवडणूकीत हरसूल गट ओबीसी राखीव होता. अंजनेरी गटात शिवसेनेचे कमळू कडाळी विजयी झाले होते. गणातदेखील सेनेचे मनोहर मेढे यांनी बाजी मारली होती. सन २००७ मध्ये माकपाने करिष्मा दाखवत ठाणापाडा गट ताब्यात घेतला होता. पेठ आणि सुरगाणा या भागावर जसे माकपाचे वर्चस्व आहे तसेच पूर्वीच्या पेठ तालुक्यात असलेल्या ठाणापाडा भागात आजही माकपाचे वर्चस्व आहे. वनहक्क कायद्याच्या जमिनी असो की, शिधापत्रिका असो किंवा अन्य प्रश्नांसाठी माकपाची  एकजूट पहावयास मिळते. या निवडणुकीत त्याच एकजुटीचा तसेच काँग्रेसच्या ‘ओव्हर कॉँफीडन्स’चा फायदा घेऊन माकपाने ठाणापाडा गट ताब्यात घेतला. त्यातल्या  त्यात घराणेशाहीचाही आरोप झाला. हरसूल गटातील उमेदवार देवीदास माळेकर (काँग्रेस) यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेतल्याने विनायक माळेकर यांचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेसच्या रणनीतीचा ठाणापाडा व हससूल गट व गणांवर परिणाम झाला. त्यांना पराभवाचा धक्का बसला.  विनायक माळेकर सारस्ते येथील रहिवासी असून सन २००२ मध्ये त्यांचे बंधू लक्ष्मण शंकर माळेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. शंकर माळेकर काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या रणनितीमुळे लक्ष्मण माळेकर विजयी झाले होते.  माळेकर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित होते मात्र त्यांचा अर्ज बाद झाला. त्यांच्या पत्नीने अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना पुरस्कृत म्हणून घोषित केले. त्यांना सहानुभूतीचा फायदा झाला. एवढेच नव्हे तर ठाणापाडा गट गण हरसूल गट गण येथेही याच लाटेचा फायदा होऊन आमदारपुत्र हर्षल गावित यांना पराभवाचे धनी व्हावे लागले.  ज्यांच्यामुळे सहानुभूती मिळाली त्या देवीदास माळेकर यांना तर पराभव पत्कारावा लागला. त्यांच्या बरोबर हरसूल गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र भोये विजयी झाले तर वाघेरा गणात स्थानिक उमेदवार असतांनाही अवघ्या ८ मतांनी काँग्रेसचे वाघेरा येथील सरपंच जयराम मोंढे यांनाही काठावर पराभव पत्कारावा लागला. ज्यांच्याकडून पराभव झाला ते मोतीराम दिवे वाघेरा गणातीलच दिव्याचा पाडा येथील रहिवासी असून ते या पूर्वी दोन वेळा एकदा काँग्रेस, एकदा राष्ट्रवादी आणि या वेळेस भाजपकडे ते उमेदवारी मागत होते. त्यांच्यासाठी सुरेश गंगापुत्र यांनी भाजपाकडे आग्रह केला होता. शेवटी ते अपेक्षरित्या निवडून आले. विशेष म्हणजे ही चौथी पंचवार्षिक निवडणूक असून वीस वर्षात भाजपला पंचायत समिती की जि.प.गटात साधे खाते देखील खोलता आलेले नाही. इतरत्र भाजपाचा बोलबोला असला तरी त्र्यंबक तालुका भाजपाला स्विकारण्यास तयार नाही. मोतीराम देशमुख सारखा उच्च शिक्षित प्राचार्य उमेदवार (हरसूल गटात) करीत असतांना स्थानिक असूनही लोकांनी स्विकारले नाही. याचे कारण भाजपामधील बेबनाव कारणीभूत ठरला. शहर-ग्रामीण कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धूसपूस पराभवास कारणीभूत ठरली. सन २०१२ च्या निवडणूकीत तालुक्यावर आमदार निर्मला गावित, संपतराव सकाळे यांचा पूर्ण प्रभाव तीन पैकी दोन जागा मिळवून तालुक्यावर एक हाती सत्ता प्रस्थापित केली. याबद्दल काँग्रेस नेत्यांना ओव्हर कॉन्फीडेंन्स वाढला. अंजनेरी गट व देवगाव गण वगळता बाकी सर्व ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार बसला. अंजनेरी गणातील माजी सभापती देवराम भुस्मा यांच्या सूनबाई यांनाही निसटता विजय मिळून त्या सेनेकडून (मनाबाई भुस्मा) विजयी झाल्या. सेनेला ही एकमेव जागा मिळाली. काँग्रेस अंजनेरी गट- अंजनेरी गण, काँग्रेस-१ व गण १, मार्क्सवादी- ठाणापाडा गट, ठाणापाडा गण व मूळवड गण, हरसूल गट व हरसूल गण- राष्ट्रवादी काँग्रेस, वाघेरा गण- अपक्ष अशी तालुक्यात त्रिशंकू अवस्था आहे.