शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

तोट्याची भरपाई द्या, अन्यथा शहर बस बंद

By admin | Updated: January 5, 2017 02:15 IST

एसटीकडून असमर्थता : महापालिकेला दिला इशारा

 नाशिक : तोट्यात चालणारी शहर बस वाहतूक सेवा देण्यास राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा असमर्थता व्यक्त केली असून, महापालिकेने गेल्या पाच वर्षांत महामंडळाला झालेल्या सुमारे १०८ कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई द्यावी, अन्यथा येत्या १ फेबु्रवारीपासून शहर बससेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना पाठविले आहे. पत्रात महामंडळाने म्हटले आहे, काही महापालिकांची हद्द वगळता संपूर्ण राज्यामध्ये टप्पानिहाय प्रवासी वाहतूक महामंडळामार्फत चालविली जाते. त्याचप्रमाणे महामंडळ काही महापालिका व नगरपालिकांच्या हद्दीमध्येही शहरी व ग्रामीण भागात सेवा देते. वास्तविक महापालिका हद्दीमध्ये प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असून, केवळ सामाजिक बांधिलकी या नात्याने एसटी महामंडळ महापालिका हद्दीत तोटा सहन करत शहरी बससेवा देत आहे. मागील पाच वर्षांत नाशिक शहर बस वाहतुकीसाठी महामंडळामार्फत दैनंदिन सरासरी २०८ नियते व एकूण ८९१.३२ कि. मी. (लाख) वाहतूक सेवा पुरविण्यात आली आहे. त्यातून महामंडळाला सुमारे १०८ कोटी ७१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. सदर शहर बससेवा सद्यस्थितीत चालविली जात असल्याने महामंडळाच्या तोट्यात दिवसेंदिवस भरच पडते आहे. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती खालावत आहे. अशा परिस्थितीत शहरी वाहतूक चालविणे महामंडळाच्या हिताचे नाही. त्यामुळे शहर वाहतुकीमुळे होणाऱ्या तोट्याची भरपाई महापालिकेने महामंडळास द्यावी अन्यथा तोट्यात चालणारी शहर बससेवा दि. १ फेबु्रवारी २०१७ पासून बंद करण्यात येणार असल्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.