शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला विहिरींनी गाठला तळ

By admin | Updated: March 2, 2016 22:46 IST

पाणीटंचाई : नागरिक हैराण; तालुक्यातील जलाशय कोरडेठाक

महेश गुजराथी  चांदवडसातत्याने दुष्काळ तालुक्याच्या पाचवीला पूजलेला. पाणीटंचाईवर मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाही. तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईपासून मुक्त करावयाचे असेल तर कायमस्वरूपी ४४ गाव नळयोजनेसारखी नळ योजना प्रभावीपणे राबविल्यास या तालुक्यातील टॅँकरमुक्ती खऱ्या अर्थाने होईल.तालुक्यातील अनेक गावांना पावसाळ्यात पाऊस न पडल्याने आज पाणीटंचाईचे संकट भासत आहे. तालुक्यातील बरीच जलाशये कोरडीठाक पडली आहेत. त्यातील खोकड तलाव, केद्राई, वागदडी धरणांची आता उन्ह वाढू लागल्याने दमछाक होत आहे. तर तालुक्यात खासगी व सार्वजनिक विहिरी या सुमारे ३००च्या आसपास असून, पावसाळ्यात पाणी न झाल्याने शेतीला काय तर पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. तालुक्यातील काही भागात चांगला तर काही भागात काहीच पाऊस न झाल्याने दरवर्षी टॅँकरची मागणी वाढत असते. गेल्यावर्षी २७ गावे, १९ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यासाठी दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये खर्च या टॅँकरद्वारे शासनाला करावा लागतो तर गेल्या वर्षी अगदी जून ते जुलै महिन्यापर्यंत पाणीटंचाई असल्याने टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याचे पाणीपुरवठा विभाग सांगत आहे.वडनेरभैरव व वडाळीभोई भागात बऱ्यापैकी पाणी असल्याने तेथील समस्या एवढी बिकट नाही मात्र पुर्वपट्टा त्यात दरेगाव , निमोण या गावांना गेल्या दोन वर्षीपर्यंत पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र या गावांना ४२ गाव नांदगावसह नळपाणीपुरवठा योजना झाल्याने या भागातील १७ गावांचा पाणीप्रश्न काही अंशी कमी झाला आहे. दरेगाव व निमोण भागातील पाणीटॅकर बंद झाले आहेत मात्र नाग्या साक्या धरणातील पाणीसाठा बेतात असल्याने येथेही या वर्षी टंचाई जाणवेल असा अंदाज आहे. तर चांदवड तालुक्यातील ४४ गाव नळपाणीपुरवठा योजनेतील गावाची संख्या वाढून ती संख्या आता ६० वर गेली आहे. यंदा मात्र पाऊस कमीच असल्याने ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल , मे, जुन मध्ये पाऊस पडेपर्यंत पाणी टंचाई जाणवेल तर चारा टंचाई जाणवेल असा अंदाज बळीराजा व्यक्त करीत आहेत तर काही भागातील विहीरी व बोअरवेलने आतापासूनच तळ गाठला आहे. सध्या चांदवड तालुक्यातील तळेगावरोहीच्या लक्ष्मीनगर, मेसनखेडे येथील जेजुरे वस्ती , मेसनखडे खुर्द येथील माळवी वस्ती तसेच पुर्वभागातील उसवाड, राहुड , तर तळेगावरोही गटातील बरीच गाव व दुगाव गटातील बरीच गावे पाणी टंचाईचा सामना करतील असा अंदाज आहे. चांदवड तालुक्याला वरदान ठरणारी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणांची ४४ गाव नळयोजनेचे आता ६० गावे अशी संख्या झाली असून ही पाईप लाईन धोंडबे ते चांदवड पर्यंत जुनी झाल्याने अनेक वेळा फुटते तर काही ठिकाणी पाणी चोरीच्या घटना घडत असल्याने बऱ्याच गावांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.अशी परिस्थिती आहे.