शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांची ज्ञानसंकल्पना विज्ञानावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:14 IST

नाशिक : तथागत गौतम बुद्धांची ज्ञानसंकल्पना विज्ञानावर अवलंबून असून, बुद्ध तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू हा माणूस असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील ...

नाशिक : तथागत गौतम बुद्धांची ज्ञानसंकल्पना विज्ञानावर अवलंबून असून, बुद्ध तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू हा माणूस असल्याचे प्रतिपादन भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्व. स्मिता चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी सव्विसावे पुष्प गुंफले. बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून वाघ यांनी सिद्धार्थाचा जन्म, तेव्हाची सामाजिक परिस्थिती, सिद्धार्थाचे वैभव, रोहिणी नदीचा वाद या घटनांचा आढावा घेतला. ज्ञान मिळविणे, दुःखावर उपाय शोधणे यातून स्वतःबद्दल प्रश्न निर्माण झाल्याने सिद्धार्थाने गृहत्याग केला. मानवी जीवनाचे दुःख काय आहे हे जाणून त्यांनी जगाच्या कल्याणाकरिता राजवाडा सोडला, असे वाघ यांनी स्पष्ट केले.

सात वर्षे तपश्चर्या करूनही जीवनाचे तत्त्वज्ञान प्राप्त झाले नाही, चार आठवडे पिंपळ वृक्षाखाली गौतमाने चिंतन केले, तेव्हा विश्वव्यवस्था ठराविक नियमांनी काम करते, असे त्यांच्या लक्षात आले. सर्व तत्त्वज्ञानात काल्पनिक गोष्टींवर भर असून, त्यात माणसाच्या जीवनाचा विचार केला गेलेला नाही. वेदात भौतिकतेचा विचार नाही. सत्य ठोस पाहिजे, इहवादी तत्त्वज्ञान बुद्धांना मान्य असल्याचे वाघ यांनी सांगितले.

स्वतःचा बौद्धिक, नैतिक विकास बुद्धांनी विकसित केला. त्यासाठी अष्टांग मार्ग त्यांनी आखून दिलेत. या मार्गांचा अवलंब केल्यास सामान्य माणूसही बुद्ध होईल, अशी बुद्धांची अपेक्षा होती. वेद, वर्णव्यवस्था, आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म या बाबी बुद्धांनी स्पष्ट नाकारल्या. तर्क, विवेक आणि कार्यकारणभाव ही विचारसरणी त्यांनी उभी केली, म्हणून बुद्ध बंडखोर असल्याचे वाघ म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रभाव येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर तसेच हिंदू धर्मावरही आहे. एकूणच बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रभाव जगावर, विचार व्यवस्थेवर आहे. हा मोठा ठेवा असल्याचे मत वाघ यांनी व्यक्त केले. बुद्ध उपदेशात, मी सांगतो ते खरे मानू नका. सत्याची पडताळणी करा. असे झाल्यास माणूस वस्तुस्थितीकडे पाहतो आणि मध्यावर येऊन ठेपतो आणि तोच अष्टांग मार्ग आहे. म्हणूनच प्रत्येकात बुद्ध होण्याची क्षमता असून अशी विचार व्यवस्था बुद्धांनी निर्माण केली. जगात बौद्ध धर्म वेगवेगळ्या प्रकारात सांगितला जातो आणि जग त्याचे अनुसरण करते, असेही बी. जी. वाघ यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. विक्रांत जाधव उपस्थित होते. अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते - ॲड. अविनाश भिडे

विषय - सुखांत जीवनाचा

फोटो

२६वाघ