शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

वीटभट्टीवरील मुले रमली शाळेत

By admin | Updated: December 4, 2015 22:13 IST

५६ मुले शाळाबाह्य : शासकीय यंत्रणा; सामाजिक संस्थेचा उपक्रम

नाशिक : सर्वांना शिक्षणाचा हक्क किंवा स्कूल चले हम अशा घोषणा आणि जाहिरातीचा वारंवार उल्लेख होत असला तरी समाजातील मागास व दुर्बल घटकात अशी हजारो मुले आहे की जी शिक्षणापासून अद्यापही वंचित आहेत. जिल्हा परिषदेने वीटभट्टीवरील अशाच ५६ मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. ही मुले आता शिक्षणात रमू लागली आहेत. मुंबई-आग्रा महामार्गालगत विल्होळी या छोट्याशा खेडेगावात वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणावर असून, मध्य प्रदेश व राज्यातील स्थलांतरित मोठ्या प्रमाणावर असून, येथे मध्य प्रदेश व राज्यातील स्थलांतरित मजुरांची मुले शाळेपासून वंचित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना मिळाली होती. त्यांनी वीटभट्टीवर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या अनेक मुलांनी शाळेचे तोंडही पाहिले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही मुले शाळेत जावीत यासाठी शहारे यांनी चाकं शिक्षणाची प्रकल्पाचे समन्वयक व शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या समवेत चर्चा केली. जोशी यांनी हेमंत भांबरे यांना पाठवून पुन्हा सर्वेक्षण केले. तसेच जिल्हा परिषद शिक्षक साधना पवार यांनीही सर्वेक्षण केले असता ६ ते १४ वयोगटातील ५६ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळले. परंतु या मुलांना आपल्यापासून दूर पाठविण्यास वीटभट्टीवरील मजूर तयार नव्हते. त्यावर उपाय म्हणून चाकं शिक्षणाची या फिरत्या शाळेत मुलांना शिकविण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर जवळ असलेल्या स्वर्गीय गोपाळराव गुळवे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संदीप गुळवे यांना विनंती करून वर्गखोली मिळविण्यात आली. आता ही मुले चाकं शिक्षणाची प्रकल्प गाडीतून शाळेत जातात. वास्तविक आता शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यासाठी फक्त चार महिने बाकी आहेत; मात्र या कालावधीत मुले निदान वाचायला तरी शिकतील असा जोशी आणि जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. या कार्यासाठी केंद्रप्रमुख रणदिवे, विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, मुख्याध्यापक गोसावी, महाले आदिंचे सहकार्य लाभत आहे.