शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

महान नाटककाराचा जन्मशताब्दी वर्षारंभ उपक्रमाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:40 IST

धनंजय रिसोडकर नाशिक : भावगर्भ, संदेश देतानाही रसिकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य असलेली डझनावारी नाटके वसंत कानेटकर यांनी रंगभूमीला ...

धनंजय रिसोडकर

नाशिक : भावगर्भ, संदेश देतानाही रसिकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य असलेली डझनावारी नाटके वसंत कानेटकर यांनी रंगभूमीला दिली. मात्र, नाशिकमधील त्यांच्या घराच्या स्मृती जशा नामशेष झाल्या, तसेच कानेटकरांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत असताना त्यांनी रंगभूमीला आणि साहित्याला दिलेल्या योगदानाचाही जणू विसर पडल्यासारखेच सर्वांना झाले आहे. त्यामुळेच नाशिकच्या कोणत्याही मोठ्या सांस्कृतिक संस्थेने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त एखादा नाट्यमहोत्सव, नाट्यछटा किंवा साहित्यजागर करण्याचा विचार किंवा त्याची अंमलबजावणी का केली नाही? सोयीस्कररित्या त्यासाठी कोरोनाचे कारण पुढे केले जात असेल तर अन्य स्पर्धा, महोत्सव ऑनलाईन भरवताना हा महोत्सवही निदान ऑनलाईन करण्याचा विचार कुणालाच का सुचला नाही? साहित्य संमेलनाचा उत्सव भरवणाऱ्या नाशिकसारख्या महानगरात या महान नाटककाराबाबत सांस्कृतिक उदासीनता का, हा प्रश्न रसिक मनाला अस्वस्थ करणारा आहे.

मध्यमवर्गीय पांढरपेशा मनाला भावणारी, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी, नाट्य रंगतदारपणे खुलवत नेणारी भाषा आणि नाटकातील भावनेचे अचूक मर्म उलगडून दाखवणारा नाट्याविष्कार या सर्व बाबींचा मिलाफ कुणा एकाच नाटककारातच दिसून आला असेल तर तो अर्थातच वसंत कानेटकर यांच्या नाटकांमध्येच. ज्या नाटकांनी मराठी रंगभूमीला अक्षरश: वैभवाचे दिवस दाखवले, त्यात अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, प्रेमा तुझा रंग कसा, रंग उमलत्या मनाचे ही सर्वाधिक गाजलेली नाटके होती. तसेच हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, वादळ माणसाळतंय ही चरित्रात्मक नाटके तर लेकुरे उदंड जाहली हे ऑपेराच्या धर्तीवरील संगीत नाटक, वेड्याचे घर उन्हात हे मनोविश्लेषणात्मक नाटक तसेच छत्रपती शिवराय आणि शिवकालीन संदर्भ असलेली रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, जिथे गवतास भाले फुटतात, तुझा तू वाढवी राजा ही नाटके मराठी रंगभूमीला वेगळे वळण देणारी ठरली होती. वडील आणि प्रख्यात कवी गिरीश यांच्यामुळे साहित्यिक वातावरणात वाढलेल्या कानेटकर यांनी लिहिलेली जन्माचे गुलाम ही त्यांची पहिली कथा वयाच्या अठराव्या वर्षी प्रसिद्ध झाली होती. कानेटकरांनी लिहिलेली बहुतांश नाटके ही सुशिक्षित समाजाचे भावविश्व उलगडून दाखवणारी होती. तसेच त्यांच्या नाटकातील संघर्ष हा व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-परिस्थिती, व्यक्ती आणि तिचे अंतर्मन, व्यक्ती आणि समाज यातून प्रबोधन करणारी होती. नाट्यमाध्यमावरील पकड, तसेच रसिकांच्या भावनेचे अचूक मर्म जाणून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात सदैव यशस्वी ठरली. त्यामुळे कानेटकरांचे नाटक म्हणजे हाऊसफुल्ल हे समीकरण चार दशकांहून अधिक काळ कायम होते.

इन्फो

‘नाही चिरा नाही पणती...’

कानेटकर यांचा ‘शिवाई’ नावाचा बंगला कालांतराने पाडून त्याजागी कॉम्प्लेक्स उभारण्यात आले असले तरी त्यांच्या स्मृती कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साठवून ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा नाट्य परिषदेच्या वतीने केवळ एक पुरस्कार कानेटकर यांच्या नावाने दिला जातो. त्याव्यतिरिक्त कानेटकर यांच्या कार्याची स्मृती जतन करण्यात आपण कमी पडलो का ? याबाबतचा विचार नाशिकच्याच साहित्य, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या संस्थांनी आणि त्यांच्या धुरीणांनी करणे आवश्यक आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यात कानेटकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाट्य महोत्सव भरवण्याचा विचार आहे. मात्र, तो केवळ जन्मशताब्दी वर्षापुरता न राहता तो दरवर्षाचा नियमित उपक्रम होणे आवश्यक आहे. अन्यथा कानेटकरांच्या स्मृती भविष्यात ‘नाही चिरा, नाही पणती...’ अशा झाल्यास नवल वाटू नये.

-------------------------------------------

वसंत कानेटकर जन्मशताब्दी वर्षारंभ विशेष

-----------------------

१९वसंत कानेटकर