शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

‘तुफानातील दिवा’ विझल्यानंतर कुटुंबही ‘अंधारा’त!

By admin | Updated: September 28, 2016 00:15 IST

कैफियत लोकशाहीर वामनदादांच्या परिवाराची : समाजबांधव नोकरी करू देईना अन् परिस्थिती जेवू घालेना

संजय वाघ  नाशिक आयुष्यभर आपल्या पहाडी आवाजाने वेदनामुक्तीचे गीत गाणाऱ्या आणि स्फूर्तिदायी कवनांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या चळवळीसाठी पोषक वातावरण निर्मिती करणाऱ्या लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या परिवारावरच आता उपासमारी आणि बेघर होण्याची वेळ आली आहे. कर्तृत्ववान पित्याचे प्रसिद्धीने वलयांकित नाव संबंधित कुटुंबासाठी वरदान ठरण्याचा अनुभव सर्वश्रुत असताना समाजातील चार-दोन लोकांच्या आडकाठीमुळे मात्र दादांची प्रतिष्ठा कर्डक कुटुंबासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे.सहजसोप्या शब्दात समाजातील आर्थिक विषमतेवर आसूड ओढणाऱ्या वामनदादांच्या निधनानंतर ७ जून २००५ रोजी दत्तक मुलगा रवींद्र कर्डक यांनी पत्नी ललिता, मुलगा वैभव व मुलगी कोमल यांच्यासह नाशिक सोडून राहाता तालुक्यातील चितळी ही सासूरवाडी गाठली. उदरनिर्वाहासाठी श्रीरामपूरला निलायम आणि राधिका लॉजवर सिक्युरिटी म्हणून साडेआठ वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात दादांचा मुलगा असल्याचे कळल्यावर समाजाची काही मंडळी लॉजवर आली. तुम्ही वामनदादांचे चिरंजीव असूच शकत नाही असे म्हणून शंका उपस्थित केली. पुरावे दाखवल्यावर सिक्युरिटीचे काम करून तुम्ही तर दादांचे नाव खराब करीत आहात असा मुद्दा उपस्थित केल्याने तेथून रवींद्र कर्डक यांना कामावरून कमी करण्यात आले. उत्पन्नाचे साधनच हिरावले गेल्याने कर्डक परिवार ३१ डिसेंबर २०१४ रोजी नाशिकला परतला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आणि मुलीच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न ‘आ’वासून उभा होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत तीन ठिकाणी त्यांनी दोन वर्षे सिक्युरिटीचे काम केले. तेथेही पुन्हा दादांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न पुढे करून एकीकडे त्यांना रोजीरोटीस मुकविण्यात आले तर दुसरीकडे कुटुंबाला हातभार लावणारा त्यांचा मुलगा वैभव सिडकोतील मर्चंट बॅँकेत सिक्युरिटी म्हणून काम करीत होता, त्यावरही सहा महिन्यांनंतर अशाच पद्धतीने बेरोजगार होण्याची वेळ आली. वारंवार येणाऱ्या या कटू अनुभवांमुळे कर्डक परिवार व्यथित झाला. ‘मोठ्या माणसाच्या उदरी जन्माला येणे हा गुन्हा आहे का? आम्हाला कामावरून कमी करण्यापेक्षा दादांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचणार नाही, असे काहीतरी काम अथवा उदरनिर्वाहासाठी एखादे साधन तरी उपलब्ध करून द्या’, असा प्रश्न रवींद्र्र कर्डक जेव्हा उपस्थित करतात तेव्हा तो रास्त वाटल्यावाचून राहत नाही.आज वामनदादा हयात नसताना त्यांच्या कुटुंबीयांची झालेली दैना पाहून त्यांच्याच ओळी सहज ओठावर येतात...पाणी वाढ गं, लयी नाही मागत भर माझं इवलंसं गाडगं, पाणी वाढ गं,काळानं केलं काळ... जातीचं विणलं जाळ पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं बाळ, पाज आम्हाला पाणी...वामनदादांना मंजूर झालेल्या सदनिकेचा ताबा मिळावा तसेच मुलांच्या नोकरीसाठी रवींद्र कर्डक यांनी रिपाइं नेते रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, औरंगाबादचे माजी पालकमंत्री गंगाधर गाडे, नगर येथील शिवाजीराव ढवळे यांचीही भेट घेऊन मदतीची मागणी केली, परंतु केवळ आश्वासनाव्यतिरिक्त त्यांच्या पदरी काहीच पडले नाही.

कर्डक पिता-पुत्र आज बेरोजगार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची तर वेळ आलीच आहे शिवाय दोन महिन्याचे घरभाडे थकल्याने तेथूनही बेघर होण्याचे संकट त्यांच्या माथ्यावर घोंगावू लागले आहे. एकट्या ललिता कर्डक यांच्या धुणे-भांड्यातून मिळणाऱ्या अल्पशा पुंजीवर एका महाकवीचे कुटुंब किती दिवस तग धरणार आहे?

आमच्या घराचा ताबा कुठाय हो...सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात वामनदादांना दोन लाख रुपयांची मदत आणि सदनिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाने पुण्यातील तोतलानी भागातील मोनिका गार्डनमध्ये सदनिका दिली. परंतु ती न स्वीकारता दादांनी नाशिकमध्येच सदनिकेची मागणी केली होती. तीही मागणी मान्य करीत शासनाने नाशिकमधील अनुजा हौसिंग सोसायटीच्या तळ मजल्यावर सदनिका देण्याची तयारी दर्शविली. २५ मे २००४ रोजी सदनिकेचा ताबा मिळण्याआधीच दुर्दैवाने १५ मे २००४ रोजी दादांचे निधन झाले आणि सदनिकेचा विषय तेव्हापासून दुर्लक्षितच आहे. रवींद्र कर्डक यांनी २००४ पासून आजपर्यंत पाठपुरावा केला, मात्र सदनिकेचा ताबा काही केल्या मिळत नाही. ‘सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठाय हो, सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो’ असा सवाल गीतातून पुसणाऱ्या वामनदादांच्याच मुलावर आता ‘आमच्या घराचा ताबा कुठाय हो’ असे विचारण्याची वेळ आली आहे.मी जरी महाकवीचा मुलगा असलो, तरी घरखर्च भागविण्यासाठी कोठेतरी मिळेल ते काम तर करावेच लागेल ना? समाज आणि दादांना मानणारे किती दिवस मदत करतील? आमच्याच समाजातील काही बांधव आर्थिक मदतीचे आणि सदनिकेसाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी मदतीचे नुसते आश्वासन देतात. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र कोणीच करीत नाही. पाच ठिकाणी नोकरी केली, त्या माझ्या सिक्युरिटीच्या नोकरीमुळे वामनदादांचे नाव खराब होते अशी सबब संबंधिताना सांगून आम्हाला नोकरीवरूनही हटविण्यात येते. मुलाच्या बाबतीतही तोच अनुभव आला. मग अशावेळी आम्ही जगायचे कसे? - रवींद्र कर्डक, स्वामी विवेकानंदनगर, राणेनगर, नाशिक