शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

शेतकरी पित्याचे छत्र हरपल्यावर दिवस ढकलण्याचेच वांधे

By admin | Updated: November 4, 2015 23:09 IST

चिमुकल्यांची व्यथा: आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची दिवाळी लोकांच्या दातृत्वावरच अवलंबून‘त्याचे’ नाव साहिल...

नाशिक : वय जेमतेम पाच-सहा वर्षांचे... शाळेत पहिलीत शिकतो. सहा महिन्यांपूर्वी साहिलच्या आई-वडिलांनी शेतीच्या कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केली. मूळ बुलडाणा जिल्ह्यातल्या साहिलला स्वत:चे पूर्ण नावही सांगता येत नाही आणि त्याच्या आई-वडिलांविषयी विचारण्याची आपली हिंमत होत नाही; पण ‘घरची आठवण येते का’ विचारल्यावर फक्त त्याचे डोळे बोलत राहतात... त्र्यंबकेश्वरजवळच्या आधारतीर्थ आधाराश्रमात साहिल सहा महिन्यांपूर्वी दाखल झाला. या आश्रमात राहणाऱ्या अनेक मुलांच्या कहाण्या साहिलप्रमाणेच काळजाला अक्षरश: घरे पाडणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा विषय सध्या सर्वदूर गाजत असला, तरी त्याची खरी भीषणता या मुलांकडे पाहिल्यावर जाणवते. त्र्यंबकेश्वरजवळच्या अंजनेरी भागात सन २००७ मध्ये त्र्यंबकराव गायकवाड यांनी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी या आधारतीर्थाची स्थापना केली. सध्या या आश्रमात विदर्भ, बीड, बुलडाणा, गडचिरोली, नंदुरबार, जालन्यासह राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची ११० निराधार मुले-मुली राहतात. त्यात ५० मुले आणि ६० मुलींचा समावेश आहे. वयोगट ६ ते १८ चा. आश्रमाच्या स्थापनेमागे बहुतांश वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत. गावोगावी कीर्तनासाठी गेल्यावर आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांविषयी आवाहन केले जाते. त्या गावातल्या मुला-मुलीला खरोखर कोणाचा आधार नसेल, तर आधारतीर्थात आणले जाते. मुलांच्या निवास-भोजनाचा सगळा खर्च आश्रमाच्या वतीने केला जातो. मुख्यत: देणग्या, दानशूरांच्या मदतीवर हा डोलारा सांभाळला जातो. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीच येथे स्वयंपाक व अन्य व्यवस्था पाहतात. काही मोठी मुले त्यांना मदत करतात. अडीच किलोमीटरच्या तळवाडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही मुले शिकतात. या मुलांची दिवाळी लोकांवर अवलंबून असते. कोणी ना कोणी फटाके, नवे-जुने कपडे, फराळ, मिठाई वगैरे आणून देते. त्यावर मुलांची दिवाळी साजरी होते.आधाराश्रमाचे व्यवस्थापक विशाल परुळेकर सांगतात, ‘एकदा दिवाळीत या रस्त्यावरून जात होतो. सण असूनही या आश्रमात सारे काही शांत-शांत होते. आपल्यासाठी कोणी येते का, याची वाट पाहत ही मुले दारात बसून होती. ते पाहून वाईट वाटले आणि बोरिवलीतला व्यवसाय सोडून बायको-मुलांसह येथे येऊन राहण्याचा निर्णय घेतला. या मुलांचे आई-वडील असते, तर यांची दिवाळी जोरात झाली असती; पण त्यांना दिलासा देण्यासाठी लोकांनी येथे येऊन दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आम्ही यंदा करीत आहोत... ’एरवी लोक जुने कपडे, वापरलेल्या शालेय वस्तू आधाराश्रमात आणून देतात. काही कंपन्या, काही व्यक्ती दरमहा किराणा वगैरेची मदत करतात. आश्रमातली मुले पहाटे पाच वाजता उठतात. साडेदहाला जेवण करून शाळेत जातात. सायंकाळी पाचला पुन्हा परत. मग प्रार्थना, अभ्यास. काही मुलांचे आई-वडील अशा दोघांचेही निधन झालेले आहे, तर काही मुले वडील गेल्याने आईसोबत राहत आहेत.असाच एक चिमुकला. त्याच्या वडिलांनी आत्महत्त्या केलेली. आईने दुसरा विवाह केल्यावर याची रवानगी आधाराश्रमात झालेली. आता हा सावत्र बाप या एवढ्याशा पोराला सांगतो, ‘इकडे पाय ठेवला तर मारून टाकील...’ त्याची आई बिचारी कधी चोरून-लपून एखादा फोन करते तेवढाच. अशा मन सुन्न करणाऱ्या अनेक कहाण्या इथे ऐकायला मिळतात. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचा विषय या मुलांकडे काढल्यावर त्यांचे काळवंडलेले चेहरे उजळतात खरे; पण तात्पुरतेच... कारण अंधारलेल्या भविष्याच्या काळजीने त्यांच्या चेहऱ्याचा लगेच ताबा घेतलेला असतो...