शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

शेतकरी पित्याचे छत्र हरपल्यावर दिवस ढकलण्याचेच वांधे

By admin | Updated: November 4, 2015 23:09 IST

चिमुकल्यांची व्यथा: आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची दिवाळी लोकांच्या दातृत्वावरच अवलंबून‘त्याचे’ नाव साहिल...

नाशिक : वय जेमतेम पाच-सहा वर्षांचे... शाळेत पहिलीत शिकतो. सहा महिन्यांपूर्वी साहिलच्या आई-वडिलांनी शेतीच्या कर्जाला कंटाळून आत्महत्त्या केली. मूळ बुलडाणा जिल्ह्यातल्या साहिलला स्वत:चे पूर्ण नावही सांगता येत नाही आणि त्याच्या आई-वडिलांविषयी विचारण्याची आपली हिंमत होत नाही; पण ‘घरची आठवण येते का’ विचारल्यावर फक्त त्याचे डोळे बोलत राहतात... त्र्यंबकेश्वरजवळच्या आधारतीर्थ आधाराश्रमात साहिल सहा महिन्यांपूर्वी दाखल झाला. या आश्रमात राहणाऱ्या अनेक मुलांच्या कहाण्या साहिलप्रमाणेच काळजाला अक्षरश: घरे पाडणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा विषय सध्या सर्वदूर गाजत असला, तरी त्याची खरी भीषणता या मुलांकडे पाहिल्यावर जाणवते. त्र्यंबकेश्वरजवळच्या अंजनेरी भागात सन २००७ मध्ये त्र्यंबकराव गायकवाड यांनी आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी या आधारतीर्थाची स्थापना केली. सध्या या आश्रमात विदर्भ, बीड, बुलडाणा, गडचिरोली, नंदुरबार, जालन्यासह राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची ११० निराधार मुले-मुली राहतात. त्यात ५० मुले आणि ६० मुलींचा समावेश आहे. वयोगट ६ ते १८ चा. आश्रमाच्या स्थापनेमागे बहुतांश वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत. गावोगावी कीर्तनासाठी गेल्यावर आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांविषयी आवाहन केले जाते. त्या गावातल्या मुला-मुलीला खरोखर कोणाचा आधार नसेल, तर आधारतीर्थात आणले जाते. मुलांच्या निवास-भोजनाचा सगळा खर्च आश्रमाच्या वतीने केला जातो. मुख्यत: देणग्या, दानशूरांच्या मदतीवर हा डोलारा सांभाळला जातो. आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीच येथे स्वयंपाक व अन्य व्यवस्था पाहतात. काही मोठी मुले त्यांना मदत करतात. अडीच किलोमीटरच्या तळवाडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही मुले शिकतात. या मुलांची दिवाळी लोकांवर अवलंबून असते. कोणी ना कोणी फटाके, नवे-जुने कपडे, फराळ, मिठाई वगैरे आणून देते. त्यावर मुलांची दिवाळी साजरी होते.आधाराश्रमाचे व्यवस्थापक विशाल परुळेकर सांगतात, ‘एकदा दिवाळीत या रस्त्यावरून जात होतो. सण असूनही या आश्रमात सारे काही शांत-शांत होते. आपल्यासाठी कोणी येते का, याची वाट पाहत ही मुले दारात बसून होती. ते पाहून वाईट वाटले आणि बोरिवलीतला व्यवसाय सोडून बायको-मुलांसह येथे येऊन राहण्याचा निर्णय घेतला. या मुलांचे आई-वडील असते, तर यांची दिवाळी जोरात झाली असती; पण त्यांना दिलासा देण्यासाठी लोकांनी येथे येऊन दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आम्ही यंदा करीत आहोत... ’एरवी लोक जुने कपडे, वापरलेल्या शालेय वस्तू आधाराश्रमात आणून देतात. काही कंपन्या, काही व्यक्ती दरमहा किराणा वगैरेची मदत करतात. आश्रमातली मुले पहाटे पाच वाजता उठतात. साडेदहाला जेवण करून शाळेत जातात. सायंकाळी पाचला पुन्हा परत. मग प्रार्थना, अभ्यास. काही मुलांचे आई-वडील अशा दोघांचेही निधन झालेले आहे, तर काही मुले वडील गेल्याने आईसोबत राहत आहेत.असाच एक चिमुकला. त्याच्या वडिलांनी आत्महत्त्या केलेली. आईने दुसरा विवाह केल्यावर याची रवानगी आधाराश्रमात झालेली. आता हा सावत्र बाप या एवढ्याशा पोराला सांगतो, ‘इकडे पाय ठेवला तर मारून टाकील...’ त्याची आई बिचारी कधी चोरून-लपून एखादा फोन करते तेवढाच. अशा मन सुन्न करणाऱ्या अनेक कहाण्या इथे ऐकायला मिळतात. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचा विषय या मुलांकडे काढल्यावर त्यांचे काळवंडलेले चेहरे उजळतात खरे; पण तात्पुरतेच... कारण अंधारलेल्या भविष्याच्या काळजीने त्यांच्या चेहऱ्याचा लगेच ताबा घेतलेला असतो...