शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

By admin | Updated: March 10, 2015 01:07 IST

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

  नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि द्राक्षमण्यांना जाणारे तडे यामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नाशिक-नगर सीमेवर राहणाऱ्या एका युवा शेतकऱ्याने एक समर्थ पर्याय शोधला असून, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. सुनील घुमरे (हंडेवाडी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून त्या शेतकऱ्याने द्राक्षघड कसे वाचवावे हा प्रश्न पडला होता. द्राक्षघडांवर संरक्षणासाठी कसा कागद लावावा असा विचार करता करता त्यांना जेवणाच्या पत्रावळींचा प्रयोग करावा, असे सुचले. त्यांनी तो कागद पेपर मीलमधून खरेदी केला आणि द्राक्षांच्या प्रत्येक घडाला टोपीच्या आकाराने तो बसवला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडण्याआधीच त्यांनी सव्वातीन एकर जागेवरील बागेत द्राक्षाच्या प्रत्येक घडाला तो कागद लावला. यासाठी त्यांनी सलग तीन दिवस मनुष्यबळाचा वापर करून घड वाचविले. त्यानंतर पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी घुमरे यांच्या बागेतील द्राक्षे मात्र वाचली होती. सुमारे ७२० किलो कागद वापरून घुमरे यांनी सव्वातीन एकर जागेवरील द्राक्षबाग उद््ध्वस्त होण्यापासून वाचवली, यासाठी त्यांना ३२ हजार रुपयांचा कागद, मनुष्यबळासाठी १८ हजार रुपये, ३ हजार रुपयांची स्टेशनरी असा खर्च आला. यासाठी ४५ रुपये किलोप्रमाणे ७२० किलो कागद वापरला. चौकोनी कागद कापून त्याची टोपी प्रत्येक घडावर लावल्यास या घडांचे पावसापासून आणि पक्ष्यांपासूनही संरक्षण होत असल्याचे दिसून आल्याचे घुमरे सांगतात. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी याप्रकारची खबरदारी घेतल्यास त्यांचे नुकसान टळू शकेल, असेही ते सांगतात.