शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

By admin | Updated: March 10, 2015 01:07 IST

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

  नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि द्राक्षमण्यांना जाणारे तडे यामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नाशिक-नगर सीमेवर राहणाऱ्या एका युवा शेतकऱ्याने एक समर्थ पर्याय शोधला असून, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. सुनील घुमरे (हंडेवाडी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून त्या शेतकऱ्याने द्राक्षघड कसे वाचवावे हा प्रश्न पडला होता. द्राक्षघडांवर संरक्षणासाठी कसा कागद लावावा असा विचार करता करता त्यांना जेवणाच्या पत्रावळींचा प्रयोग करावा, असे सुचले. त्यांनी तो कागद पेपर मीलमधून खरेदी केला आणि द्राक्षांच्या प्रत्येक घडाला टोपीच्या आकाराने तो बसवला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडण्याआधीच त्यांनी सव्वातीन एकर जागेवरील बागेत द्राक्षाच्या प्रत्येक घडाला तो कागद लावला. यासाठी त्यांनी सलग तीन दिवस मनुष्यबळाचा वापर करून घड वाचविले. त्यानंतर पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी घुमरे यांच्या बागेतील द्राक्षे मात्र वाचली होती. सुमारे ७२० किलो कागद वापरून घुमरे यांनी सव्वातीन एकर जागेवरील द्राक्षबाग उद््ध्वस्त होण्यापासून वाचवली, यासाठी त्यांना ३२ हजार रुपयांचा कागद, मनुष्यबळासाठी १८ हजार रुपये, ३ हजार रुपयांची स्टेशनरी असा खर्च आला. यासाठी ४५ रुपये किलोप्रमाणे ७२० किलो कागद वापरला. चौकोनी कागद कापून त्याची टोपी प्रत्येक घडावर लावल्यास या घडांचे पावसापासून आणि पक्ष्यांपासूनही संरक्षण होत असल्याचे दिसून आल्याचे घुमरे सांगतात. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी याप्रकारची खबरदारी घेतल्यास त्यांचे नुकसान टळू शकेल, असेही ते सांगतात.