शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

By admin | Updated: March 10, 2015 01:07 IST

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

  नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि द्राक्षमण्यांना जाणारे तडे यामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नाशिक-नगर सीमेवर राहणाऱ्या एका युवा शेतकऱ्याने एक समर्थ पर्याय शोधला असून, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. सुनील घुमरे (हंडेवाडी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून त्या शेतकऱ्याने द्राक्षघड कसे वाचवावे हा प्रश्न पडला होता. द्राक्षघडांवर संरक्षणासाठी कसा कागद लावावा असा विचार करता करता त्यांना जेवणाच्या पत्रावळींचा प्रयोग करावा, असे सुचले. त्यांनी तो कागद पेपर मीलमधून खरेदी केला आणि द्राक्षांच्या प्रत्येक घडाला टोपीच्या आकाराने तो बसवला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडण्याआधीच त्यांनी सव्वातीन एकर जागेवरील बागेत द्राक्षाच्या प्रत्येक घडाला तो कागद लावला. यासाठी त्यांनी सलग तीन दिवस मनुष्यबळाचा वापर करून घड वाचविले. त्यानंतर पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी घुमरे यांच्या बागेतील द्राक्षे मात्र वाचली होती. सुमारे ७२० किलो कागद वापरून घुमरे यांनी सव्वातीन एकर जागेवरील द्राक्षबाग उद््ध्वस्त होण्यापासून वाचवली, यासाठी त्यांना ३२ हजार रुपयांचा कागद, मनुष्यबळासाठी १८ हजार रुपये, ३ हजार रुपयांची स्टेशनरी असा खर्च आला. यासाठी ४५ रुपये किलोप्रमाणे ७२० किलो कागद वापरला. चौकोनी कागद कापून त्याची टोपी प्रत्येक घडावर लावल्यास या घडांचे पावसापासून आणि पक्ष्यांपासूनही संरक्षण होत असल्याचे दिसून आल्याचे घुमरे सांगतात. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी याप्रकारची खबरदारी घेतल्यास त्यांचे नुकसान टळू शकेल, असेही ते सांगतात.