शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

By admin | Updated: March 10, 2015 01:07 IST

द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती

  नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि द्राक्षमण्यांना जाणारे तडे यामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नाशिक-नगर सीमेवर राहणाऱ्या एका युवा शेतकऱ्याने एक समर्थ पर्याय शोधला असून, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. सुनील घुमरे (हंडेवाडी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून त्या शेतकऱ्याने द्राक्षघड कसे वाचवावे हा प्रश्न पडला होता. द्राक्षघडांवर संरक्षणासाठी कसा कागद लावावा असा विचार करता करता त्यांना जेवणाच्या पत्रावळींचा प्रयोग करावा, असे सुचले. त्यांनी तो कागद पेपर मीलमधून खरेदी केला आणि द्राक्षांच्या प्रत्येक घडाला टोपीच्या आकाराने तो बसवला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडण्याआधीच त्यांनी सव्वातीन एकर जागेवरील बागेत द्राक्षाच्या प्रत्येक घडाला तो कागद लावला. यासाठी त्यांनी सलग तीन दिवस मनुष्यबळाचा वापर करून घड वाचविले. त्यानंतर पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी घुमरे यांच्या बागेतील द्राक्षे मात्र वाचली होती. सुमारे ७२० किलो कागद वापरून घुमरे यांनी सव्वातीन एकर जागेवरील द्राक्षबाग उद््ध्वस्त होण्यापासून वाचवली, यासाठी त्यांना ३२ हजार रुपयांचा कागद, मनुष्यबळासाठी १८ हजार रुपये, ३ हजार रुपयांची स्टेशनरी असा खर्च आला. यासाठी ४५ रुपये किलोप्रमाणे ७२० किलो कागद वापरला. चौकोनी कागद कापून त्याची टोपी प्रत्येक घडावर लावल्यास या घडांचे पावसापासून आणि पक्ष्यांपासूनही संरक्षण होत असल्याचे दिसून आल्याचे घुमरे सांगतात. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी याप्रकारची खबरदारी घेतल्यास त्यांचे नुकसान टळू शकेल, असेही ते सांगतात.