शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

३५ टक्के नगरसेवक मौनी

By admin | Updated: January 17, 2017 00:53 IST

सभागृहातील कामगिरी : २४ टक्के नगरसेवकांचाच बोलबाला

नाशिक : महापालिकेत सन २०१२ ते १७ या पाचव्या पंचवार्षिक काळात झालेल्या महासभांच्या कामकाजात सुमारे ६५ टक्के नगरसेवकांनी सहभाग नोंदविला, तर ३५ टक्के नगरसेवकांनी एकदाही तोंड उघडले नाही. त्यामुळे मौनी नगरसेवक म्हणूनच त्यांची ओळख राहिली. सुमारे २५ टक्के नगरसेवकांनीच आजवर सभागृहाचे कामकाज चालविल्याचे दिसून आले. पाच वर्षांच्या काळात सभागृहाने मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा प्रकल्प, स्मार्ट सिटी योजना, खतप्रकल्पाचे खासगीकरण, नवीन घंटागाड्यांचा ठेका यांसह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना मंजुरी देत शहराच्या विकासात भर घातली.  फेबु्रवारीत महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाचव्या पंचवार्षिक काळात झालेल्या कामांची मांडणी सत्ताधाऱ्यांकडून केली जाईल तर न झालेल्या व फसलेल्या कामांचा पंचनामा विरोधकांकडून केला जाईल. याशिवाय, मावळत्या पाचव्या पंचवार्षिक काळात झालेल्या महासभांमध्ये नगरसेवकांच्या कामगिरीचाही गाजावाजा प्रचारात सर्वच पक्षांकडून आणि विद्यमान नगरसेवकांकडून केला जाईल. मात्र, पाच वर्षांचा सभागृहाच्या कामकाजाचा धांडोळा घेतला, तर सुमारे ६५ टक्के नगरसेवकांनी सभागृहात विविध प्रश्नांवर झालेल्या चर्चेत सहभाग नोंदविला आहे, तर सुमारे ३५ टक्के नगरसेवकांना पाच वर्षांत एकदाही सभागृहात तोंड उघडले नाही.एसपीव्हीला विरोध करणारे पहिले सभागृहकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात ९८ शहरांच्या यादीत नाशिकची निवड झाली. त्यावेळी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाशिक महापालिकेने प्रस्ताव पाठविण्याची वेळ आली. सदरचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी आला असता अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी एसपीव्ही अर्थात कंपनीकरणाचा मुद्दा उचलून धरला आणि त्याला विरोध दर्शविला. पुढे नाशिकनंतर एसपीव्हीला पुणे, मुंबई, नवी मुंबई या शहरांनीही विरोध दर्शविला. परिणामी, नंतर केंद्र सरकारला एसपीव्ही स्थापन करताना त्यात काही महत्त्वपूर्ण बदल करणे भाग पडले.लक्षवेधी आंदोलनेपाच वर्षांच्या काळात काही लक्षवेधी आंदोलनेही या सभागृहात झाली. त्यात प्रामुख्याने, आधी कॉँग्रेसचे नंतर भाजपाचे नगरसेवक बनलेले दिनकर पाटील व लता पाटील या दाम्पत्याने विविध मागण्यांसाठी सभागृहातच सहा दिवस केलेले ठिय्या आंदोलन चर्चेत राहिले तर भाजपाचे प्रा. कुणाल वाघ यांनी डासांचा वाढता उपद्रव लक्षात घेता मच्छरदाणीसह केलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. पाणीप्रश्नावरून काळे वस्त्र परिधान करत सेना-मनसेच्या नगरसेवकांनी निषेध नोंदविला, तर राष्ट्रवादीनेही डोक्याला काळ्या पट्ट्या बांधत निदर्शने केली.विकासकामातही मागेमौनी नगरसेवकांना प्रशासकीय स्तरावर त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करणेही जमले नाही. परिणामी, त्यांच्या प्रभागातील विकासकामांबाबत त्यांचा क्रमांक मागेच राहिला. त्यातही काही महिला नगरसेवकांनी तर सभागृहात केवळ उपस्थिती दर्शविली आहे. सभागृहात विषय अथवा प्रस्ताव कुठलाही असो, त्यासाठी झालेल्या चर्चेत सुमारे २५ टक्के नगरसेवकांनी कायम सहभाग नोंदवत आपले अस्तित्व दाखवून दिले. पाच वर्षांच्या काळात सभागृहाने सिंहस्थ कुंभमेळ्यासह काही महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले आहेत.