शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

यंदाही तीच कहाणी कांद्याने आणले शेतक-यांच्या डाेळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:28 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कांदा उत्पादकांना आलेले सुगीचे दिवस संपण्याची चिन्हे असून पुन्हा दर घसरून नुकसान होण्याची चिन्हे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  कांदा उत्पादकांना आलेले सुगीचे दिवस संपण्याची चिन्हे असून पुन्हा दर घसरून नुकसान होण्याची चिन्हे तयार झाली आहे. बाजार येणारा नवीन पावसाळी कांदा बाजारात सात ते दहा रुपये प्रतीक्विंटल दराने खरेदी होऊ लागल्याने शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळून पुन्हा आर्थिक नुकसानीची कहाणी सुरू झाली आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागासह शहादा व तळोदा तालुक्यात यंदा पावसाळी कांदा लागवड करण्यात आली होती. साधारण २ हजार हेक्टरवरचा हा कांदा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथील बाजारात विक्रीसाठी शेतकरी पाठवतात. सहा महिन्यांपासून बाजारातील कांदा टंचाईमुळे ९० रुपयांच्या पुढे प्रतिकिलो कांदा विक्री होत होती. यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळून गेल्या काही वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई झाली होती. यातून पावसाळी कांदा लागवड वाढवत शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन केले होते. या नियोजनाला पहिला तडा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने पहिला तडा दिल्याने शेतकऱ्यांचे २० ते ३०टक्के कांद्याचे नुकसान झाले होते. यातून शिल्लक असलेल्या कांद्याला जादा खर्च लावून शेतकरी त्याचे संगोपन करत होता. दरवाढ कायम असल्याने कांदा तारुन नेईल, अशी अपेक्षा असताना गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारपेठेत दरांची घसरण सुरू झाली असून शनिवारी बाजार बंद होत असताना हेथेट  १० रुपयांपर्यंत आले आहेत. नाशिक आणि इंदूरच्या बाजारात जाणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांनाही या दर घसरणीचा फटका बसला असून वाहतूक खर्च, मजुरी आणि इतर खर्चवजा जाता शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागण्याची चिन्हे आहेत. नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातू दर रोज किमान १ हजार क्विंटलपेक्षा अधिक माल बाजारात रवाना होत आहे. परंतु त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे खर्च भरून काढणारे नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. येत्या काळात हे नुकसान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

   शहरी व निमशहरी भाग नंदुरबार बाजार समितीत दोन दिवसांपासून दरांमध्ये घसरण झाल्याने ५० क्विंटलपर्यंत कांदा आवक झाली आहे. यात दर मिळतील या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी छोट्या आकाराचा कांदाही बाजारात आणला होता या कांद्याला प्रतिक्विंटल ७०० अर्थात किलोमागे सात रूपये दर मिळाला आहे. 

   ग्रामीण भागबाजाराची वाहतूक, बाजार समितीची फी, आडते, हमाली असे करून शेतक-यांना दोन हजारपेक्षा अधिक लाभ झालेला नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले. काही शेतकरी किरकोळ बाजारात कांदा विक्री करत असल्याचे रविवारी दिसून आले. सोमवारपासून दरात घसरण कायम असेल असा अंदाज आहे. 

शेतक-यांचे नुकसानच : याबाबत आसाणे ता. नंदुरबार येथील शेतकरी चंद्रकांत पाटील यांना संपर्क केला असता, दरघसरणीमुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.