शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

चिंताजनक : नंदुरबार जिल्ह्यातील हिंस्र प्राण्यांचा मृत्यू होतोय अन्न पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:02 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  धुळे वनवृत्तात समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील वनेक्षात संचार करणा-या हिंस्र प्राण्यांचा एकाच आठवड्यात मृत्यू ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  धुळे वनवृत्तात समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील वनेक्षात संचार करणा-या हिंस्र प्राण्यांचा एकाच आठवड्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसात सात आणि ११ वर्षीय मादी बिबट्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू हा अन्न पाण्याविना झाल्याचे शवविच्छेदन करणा-या पशुवैद्यकीय अधिका-यांनी सांगितले आहे. दिवसाला किमान तीन किलोपर्यंत मांसाहारी अन्नाची आवश्यकता असलेले हे वन्यजीव अन्नाच्या शोधात गावठाण हद्दीमध्ये येवूनही त्यांची भूक भागत नसल्याने पशुवैद्यकीय अधिका-यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान साक्री तालुक्यातील नंदुरबार हद्दीत ठाणेपाड्यात येणारा बिबट्या हा सहा वर्षीय तर बोरद येथे मयत झालेली मादी बिबट्या ही ११ वर्षाची असल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असताना वन्यप्राण्यांना एखाद्या रोगाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. यामुळे दोघी मयत बिबट्यांचा व्हिसेरा घेत नाशिक येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या व्हिसेराचा रिपोर्ट लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एकाच आठवड्यात दोन बिबट्यांचा भूकेने मृत्यू झाल्याने वनक्षेत्रातील त्यांच्या अन्न साखळीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  गेल्या दोन वर्षात अन्न पाण्याविना मृत्यू झालेल्या प्राण्यांची संख्या अधिक असून वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे तसेच अन्नपुरवठा करण्याच्या उपाययोजना थंडावल्याने हे हिंस्र प्राणी शेतशिवाराची वाट धरत आहेत. यात गावठाण शिवारात पाळीव जनवारांवर हल्ले करुनही योग्य तेवढे अन्न मिळत नसल्याने बिबट्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. नंदुरबार, तळोदा व तोरणमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक बिबटे असून याठिकाणी योग्य  उपाययोजना करण्याची अपेक्षा वन्यजीवप्रेमींकडून करण्यात आली आहे. 

  तळोदा तालुक्यात गेल्या चार वर्षात दोन बिबटे व एक तरस भूकबळी ठरला आहे.     नंदुरबा व नवापूर तालुक्यात प्रत्येकी एक बिबट्याचा अकस्मात मृत्यू झाला आहे.   या बिबट्यांना दिवसाला किमान अडीच ते पावणे तीन किलो मांस आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

  नंदुरबार येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त के.टी.पाटील यांच्यासोबत चर्चा केली असता, बिबट्यांचा मृत्यू हा अन्न व पाणी न मिळाल्याने झाला असावा. हे वन्यप्राणी भूकबळी ठरू शकतात.  दरम्यान वनविभागाकडे वृद्ध बिबट्यांचा सांभाळ करण्याचा कोणताही कार्यक्रम नाही.

तळोदा तालुक्यात किमान आठ, शहादा चार, तोरणमाळ ५, नंदुरबार ३ तर नवापूर तालुक्यात दोन बिबटे सध्या संचार करत असल्याची माहिती  आहे. यातील वृद्धांची माहिती मिळालेली नाही.