शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

तीन वर्षापासून पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील लोहारा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तिधारे गावाजवळील लाखो रूपये खर्चाच्या मोठ्या पुलाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील लोहारा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तिधारे गावाजवळील लाखो रूपये खर्चाच्या मोठ्या पुलाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. तसेच शेजारच असलेल्या नाल्यावरील पुलदेखील गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्याने तिधारे गावाचा परिसराशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थ वाऱ्यावर आहेत. पुलाचे अपुरे बांधकाम व नदीतील मोठ-मोठे ढिगारे ‘जैसे थे’ असल्याने गावाला पुराचा धोका निर्माण झाल्याने आदिवासी ग्रामस्थ भयभित अवस्थेत आहेत. तिधारे गावाचा हा गंभीर प्रश्न असताना लोक प्रतिनिधी व प्रशासन कमालीचे सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान तिधारे पुलाचे निकृष्ट बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी होवून ठेकेदारासह संबंधित बांधकाम अधिकाºयावर कठोर कारवाई करावी, अन्यथा गावात पाणी शिरल्यास पुरातच उड्या मारून आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे.याबाबत असे की, शहादा तालुक्याच्या पूर्वेकडील ४०० ते ५०० आदिवासी लोकवसाहतीचे तिधारे हे गाव लोहारा गृप ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. तिधारे येथे ये-जा करण्यासाठी लोहारा, असलोद, गोगापूर व दामळदा या चारही गावाकडून स्वतंत्र रस्ते आहेत. मात्र या चारही मार्गावर दोन मोठे नाले व मंदाणे कडून गोमाई नदीला जावून मिळणारी मंदाकिनी नदी आहे. नाल्यांवरील पुलाचे काम गेल्या वर्षी झाले. मात्र या पुलाचे काम गेल्या वर्षाच्या पहिल्याच पावसात वाहून गेले. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने निकृष्ट काम झाल्याने पुलाचे तीन तेरा वाजले.पावसाळा वगळता अन्यवेळी नदीला पाणी कमी राहते. त्यामुळे नदीतून दुचाकी वाहनेही जावू शकत नाही. शुक्रवारी रात्री मंदाणे परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. या वेळी तिधारे पुलाजवळ पाणी पुढे जाण्यास दगड व मातीच्या ढीगाचा अडथळा ठरत असल्याने या नदीतील पाणी काठांवरील घरांमध्ये शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नदी जवळच असलेल्या शेतात बांधलेल्या घोड्याचेही पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.पिंपर्डे, लोहारा, तिधारे, दामळदा व खेतियाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, तिधारे गावाला लागूनच असलेल्या मंदाकिनी नदीवर लाखो रूपये खर्चाच्या पुलाचे काम मंजूर होवून ते प्रत्यक्षात सुरू झाले. पिलरही उभे राहिले. मात्र पुढील काम कशामुळे रखडले? यास जबाबदार कोण? याचीही चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असून, नदीच्या मुख्य पात्रातच मोठ-मोठे दगड व मुरूमाचे ढीग असल्?याने पाणी पुढे प्रवाहीत होण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून पुराचे पाणी पुढे प्रवाहीत न होता गावात शिरते. रात्रींबेरात्री पाणी गावात व घरात शिरून संसारोपयोगी साहित्यासह इतरही नुकसान होत असते. यंदाच्या वर्षी तर काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अपेक्षा फोल ठरली.