शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

तीव्र चढ-उताराच्या रस्त्यावरुन पायपीट करीत आणावे लागते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:16 IST

हंसराज महाले । लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धजापाणी हे गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षांनंतरही वंचित आहे. गावात ...

हंसराज महाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील धजापाणी हे गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षांनंतरही वंचित आहे. गावात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसून त्या मिळविण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे.सातपुड्याच्या कुशीत वसलेले धजापाणी हे गाव मालदा ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत येते. गावात सुमारे १०० हून अधिक कुटूंब राहत असून येथे पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत सोयींचा अभाव आहे. मालदापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धजापाणी गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.  धजापाणी गावात पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा हातपंप किंवा कुपनलिका नसून नदीतील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उन्हाळ्यात नदीचे पाणी आटत असल्याने झरा खोदून नागरिकांना पाणी उपलब्ध करून घ्यावे लागते. पाण्यासाठी महिलांना खोल उत्तरावे लागत असून पाण्याचा हंडा भरून उंच टेकड्यावर महिलांना चढावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळते. एक-दोन विहीर असून दीड ते दोन किलोमीटरचे अंतर तीव्र चढ-उताराच्या टेकड्या पार करत पाणी आणावे लागते. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात पाण्यासाठी एवढी तारेवरची कसरत करावी लागत असल्याची येथील ग्रामस्थांची शोकांतिका आहे.वीज असून नसल्यासारखीधजापाणी येथे निम्म्याहून अधिक गावात वीज नसल्याचे चित्र आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी तर गावात वीजच नव्हती. ग्रामस्थांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने गावात वीज पोहचविण्यात आली. परंतु त्याठिकाणी असणाऱ्या विविध पाड्यांवरील घरात वीज पोहोचली नसल्याने त्यांच्यासाठी वीज असून नसल्यासारखी आहे. काहींनी स्वतःचा खर्च करून लांब अंतरापर्यंत वायर टाकून वीज घरात आणली. परंतु ती अत्यंत खर्चिक बाब असल्याने प्रत्येकालाच ती परवडणारी नाही. केवळ गावात वीज पोहचविण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले असल्याची ग्रामस्थांची व्यथा आहे. 

प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीचा अभावसातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अनेक दुर्गम-अतिदुर्गम भागात थेट नर्मदा काठापर्यंत अपवाद वगळता अनेक गावात रस्ते, वीज व आरोग्य पोहोचवण्यात आली आहे. मात्र बोरदपासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर वसलेल्या धजापाणी गावात अद्याप मूलभूत सोयीसुविधा पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचे चित्र आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे तर या गावात विकासाची गंगा पोहचू शकाला नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागात सर्व प्रकारच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शक्य   असून धजापाणी गावात पायाभूत सुविधांचा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

गावात रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध नाहीत. ग्रामस्थांना केवळ आतापर्यंत आश्वासनेच देण्यात आली. मात्र ती पूर्ण करण्यासाठी कोणाकडून प्रयत्न झाले नाहीत. गावात सोयीसुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामस्थांच्या विकासाला चालना मिळेल.-गोरख पावरा, ग्रामस्थ, धजापाणी, ता.तळोदा.गावात सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींच्या पूर्तता करून गावाचा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याचे काम रखडले आहे.-करुणा पावरा, सरपंच, धजापाणी, ता.तळोदा.