शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

चोरट्यांच्या मोर्चा आता पांढऱ्या सोन्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. उत्पन्न निम्म्यावर आले आहे. असे असतांना आता शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. वेचनीवर आलेला कापूस शेतातूनच रात्रीच्या वेळी चोरून नेण्याचा प्रकार नंदुरबार व शहादा तालुक्यात वाढला आहे. सहा ते सात घटनांमध्ये दीड ते दोन लाखांचा कापूस आतापर्यंत चोरीस गेला आहे.यंदा कापूस आणि कांद्याला बºयापैकी भाव मिळत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा या दोन्ही पिकांची उत्पादकता निम्म्यावर घटली आहे. त्याचा परिणाम भाववाढीत झाला आहे. ज्या शेतकºयांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना बºयापैकी भाव मिळत आहे. असे असतांना आता चोरट्यांच्या धुमाकुळमुळे शेतकºयांच्या हाती येणारे उत्पन्न देखील हिरावले जात असल्याचे चित्र सध्या नंदुरबार व शहादा तालुक्यात दिसून येत आहे.खरीपाचे सर्वाधीक क्षेत्रयंदाही खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे होते. एक लाखापेक्षा अधीक हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु अती पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे कापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला, सततच्या पावसामुळे पीक पिवळे पडले. यामुळे उत्पादकता निम्म्यावर घसरली. वेचणीची वेळ आल्यावर अवकाळी पाऊस झाल्याने त्यामुळेही कापूस खराब झाला.भाव चांगला असल्यानेसध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला ५३०० ते ५५०० रुपये प्रतीक्विंटल भाव मिळत आहे. यापुढे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस चोरीकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी किमान चार ते पाच क्विंटल कापूस चोरून नेला तरी ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागत आहे. त्यामुळे पांढºया सोन्याच्या संरक्षणासाठी आता शेतकºयांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. काही शेतकरी भितीपोटी पोलिसात तक्रार देत नाहीत. रात्रीच्या वेळी कापूस वेचणी करून ती रातोरात लंपास करण्याचा हा प्रकार आहे. त्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर पाच ते सहा संख्येने चोरटे रात्री कापूस वेचनी करीत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.दहशतीचे वातावरणपाच ते सहाच्या संख्येने चोरटे कापूस वेचणीसाठी येत असल्याचा अंदाजाने एकटा शेतकरी किंवा रखवालदार त्यांचा सामना करू शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांनी शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे काही शेतकरी आता स्वत: गटागटाने शेत शिवारात गस्त घालण्यासाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.भाव समाधानकारकसध्या कापसाला भाव समाधानकारक मिळत आहे. खेडा खरेदीत शेतकºयांना घरबसल्या ४८०० ते ५१०० रुपये भाव मिळत आहे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर प्रतवारीनुसार थेट ५५०० रुपये भाव मिळू लागला आहे. ही बाब पहाता कापूस यंदा भाव खात असला तरी चोरीच्या घटनांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.