शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

अधिकारी म्हणे नाही पडली गार पण नुकसानीने शेतकरी मात्र बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली यात केळी व ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली यात केळी व पपई पिकांसह घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. यावेळी गारपीट झाल्याचा शेतकर्यांचा दावा होता. परंतू गार पडलीच नसल्याचे अधिकारी सांगू लागल्यानंतर शेतकर्यांनी नुकसान दाखवत त्यांची बोलती बंद केली. बोरदसह न्यू बन, वेळवद, करडे  परीसरात मंगळवारी दुपारी १ वाजेपासून वादळी वार्यासह पावसाला सुरूवात झाली होती. यात केळी, पपई, सोयाबीन, ज्वारी, कापूस तसेच इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. सुमारे दीड तास झालेल्या पावसादरम्यान गारपीट झाल्याचे शेतकर्यांचे म्हणणे होते. वादळामुळे बोरद येथील कालुसिंग पवार व श्रीराम पाटील यांच्यासह इतर घरांचे पत्रे उडाले. तर चंदू जीवन मराठे, नारायण मराठे, गुलाबसिंग राजपूत, राहुल पाटील, संदीप पाटील, अरुण पाटील यांच्या केळी, पपईसह विविध पिकांचे नुकसान झाले. नुकसानीची माहिती मिळाल्यानंतर बोरदचे तलाठी विलास चाैरे, मंडळाधिकारी मायाबाई मराठे, कृषी सहायक चंद्रप्रकाश पावरा यांनी या भागात भेटी देत पाहणी करुन पंचनामे केले. दरम्यान परीसरातील १४ शेतकरी आणि दोन घरांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यांच्या अहवालात म्हटले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गारपीट झाल्याच्या माहितीचे मात्र त्यांनी खंडन केले आहे. शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार मात्र गारपीट झाल्याने नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.