शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पपई पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांच्या ना ना क्लृप्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 12:59 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :  तळोदा तालुक्यातील बदलत्या हवामानाचा धसका घेत शेतकऱ्यांनी पपई पिकाचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर ...

 लोकमत न्यूज नेटवर्ककोठार :  तळोदा तालुक्यातील बदलत्या हवामानाचा धसका घेत शेतकऱ्यांनी पपई पिकाचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. सद्य:स्थितीत दिवसा काही प्रमाणात उन्हाळा तर रात्री थंडी जाणवत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.तळोदा तालुक्यातील नवागाव, चिनोदा, प्रतापपूर, रांझणी, मोड, बोरद परिसरात पपईचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु असमतोल वातावरणामुळे पपई पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पपई लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यात पपई रोपे, लागवड खर्च, विविध खते, महागडी फवारणी आदी खर्च होत असतो. त्यामुळे पपईवर लागवडीपासून ते काढणीपर्यत लक्ष देणे आवश्यक असते. पपईला   उष्ण व दमट हवामान चांगले  मानवते. पपईला कडाक्याची थंडी मानवत नाही. तर ज्या भागात  भरपूर पाऊस पडतो अशा भागात पपईची लागवड यशस्वी होत नाही. जोरदार वारे तसेच कडाक्याची थंडी, दव, धुके या पिकास हानीकारक असते. म्हणून या पिकावर थंडीचा व जास्त उन्हाचा प्रादुर्भाव होऊ नये  म्हणून सद्य:स्थितीत रांझणी परिसरातील शेतकऱ्यांकडून क्राँप कव्हरचा उपयोग करण्यात येत  आहे.क्राँप कव्हर हे उन्हाळा व हिवाळ्यात शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे रासायनिक फवारणी कमी लागते. शिवाय सनबर्न म्हणजे जास्त उन्हापासून फळांचे संरक्षण होते. तर यामुळे पपई पिकांच्या फळांचा रंग व आकार   +चांगला येण्यासाठी मदत होते. तसेच थंडीपासून पपईला संरक्षण मिळते व जास्त उन्हापासून होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे पपई फळांचा दर्जा टिकून ठेवत उत्पन्न चांगले येत असल्यामुळे तालुक्यातील शेत शिवारात पपई उत्पादक शेतकऱ्यांकडून  पपईसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत    आहे.