शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

बालकांसाठी पूर्णवेळ न्यायाधीश नेमण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:30 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 साली मुलांच्या हक्काच्या संहितेला मान्यता दिली. ही संहिता ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 साली मुलांच्या हक्काच्या संहितेला मान्यता दिली. ही संहिता 196 देशांनी मान्य केली असून भारताने देखील ती 1992 साली मान्य केली आहे. त्यानुसार मुलांना त्यांच्या जगण्याचे अधिकार, संरक्षणाचे, विकासाच्या आणि सहभागीतेचा अधिकार  मिळवून देणे भारतासह सर्व राष्ट्र बांधील आहेत. पण दुर्दैवाने त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत बालहक्क संरक्षण समितीचे राज्य सदस्य संतोष शिंदे यांनी व्यक्त केली.   बालकांसाठी कुठले कायदे आहेत, बालगुन्हेगारांसाठी न्यायालयाची अवस्था काय?बाल कायद्याअंतर्गत जवळपास 14 महत्त्वाचे कायदे असून त्यात बालविवाह प्रतिबंध, बालकांचे संरक्षण, बालमजुरी, शिक्षण, लैंगिक शोषण आणि वाहतूक यासंदर्भातील कायदे महत्त्वाचे आहेत. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. जर बालकांकडून गुन्हा झाल्यास त्याच्या निपटा:यासाठी स्वतंत्र न्यायालय आहे. परंतु दुर्दैवाने या न्यायालयातील न्यायाधीशांकडे बालहक्क कायद्याच्या प्रकरणापेक्षा इतर केसेस अधिक असल्याने बालकांच्या संबंधित केसेसचा वेळीच निपटारा होत नाही. त्यामुळे बालकांच्या संदर्भातील केसेससाठी स्वतंत्र पूर्णवेळ न्यायाधीश सर्व न्यायालयांमध्ये नेमणे आवश्यक आहे.बालसंरक्षण कायद्यात काही सुधारणा आहेत का?   सन 1986 च्या बाल न्याय अधिनियमात सन 2000, 2006 आणि 2008 मध्ये महत्त्वाचे संशोधन करण्यात आले. त्यात मुलांच्या शिक्षा करण्याच्या भूमिकेत बदल करण्यात आला आहे.

मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा   2012 साली दिल्लीतील निर्भया केसनंतर दोषी मुलांना शिक्षा झालीच पाहिजे, असा सूर उमटला. कायद्याचा धाक गुन्ह्याचे कृत्य करणा:या मुलांना रहावा यासाठी 31 डिसेंबर 2015 रोजी पूर्वीच्या बाल न्याय कायदा 2000 बरखास्त करून नव्याने बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 संसदेने पारित केला.  या कायद्याची अंमलबजावणी देशात 2016 पासून सुरू झाली असल्याचेही संतोष शिंदे यांनी सांगितले.