शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा साखर हंगाम ‘गोडवा’ निर्माण करणारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:15 IST

नंदुरबार वार्तापत्र मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या वर्षी झालेला सरासरीपेक्षा अधीक पाऊस, सिंचनाच्या वाढलेल्या सुविधा यामुळे ...

नंदुरबार वार्तापत्र

मनोज शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या वर्षी झालेला सरासरीपेक्षा अधीक पाऊस, सिंचनाच्या वाढलेल्या सुविधा यामुळे यंदाचा ऊस गळीत हंगाम तिन्ही साखर कारखान्यांसाठी गोड होणार आहे. खान्देशात सर्वाधिक साखर कारखाने सुरू होणारा नंदुरबार हा एकमेव जिल्हा आहे. यंदा मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध असल्यामुळे पळवापळवी होणार नाही. बाहेरील कारखाने ऊस घेण्यासाठी येणार नाहीत. त्यामुळे यंदा तिन्ही साखर कारखाने आपल्या उद्दीष्टानुसार गाळप करतील हे स्पष्ट आहे. गेल्या अनेक वर्षानंतर अशी समाधानकारक परिस्थिती आली आहे. असे  असले तरी ऊस उत्पादकांना वेळेवर पेमेंट होणे आणि वेळेवर ऊसाची तोड होणे याकडे या कारखान्यांच्या व्यवस्थापनांना पहावे लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. सातपुडा साखर कारखाना  पाच हजार मे.टन दैनंदिन गाळप क्षमतेचा, खाजगी तत्वावरील आयान शुगर कारखाना आता आठ हजार मे.टन दैनंदिन गाळप क्षमता असलेला होणार आहे. तर नवापूरचा आदिवासी साखर कारखाना साडेबाराशे मे.टन गाळप क्षमतेचा आहे. याशिवाय जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरातमधील दोन तर मध्यप्रदेशातील एक खांडसरी आहे. खान्देशात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच अस्तित्वात असलेले सर्वच कारखाने सुरू होणार आहेत. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ऊसाचे क्षेत्र कमी झाले होते. त्याला कारण पाण्याची कमतरता, विविध रोगांचा, किडीचा प्रार्दुर्भाव, दराबाबत नाराजी ही कारणे होती. परंतु गेल्या काही वर्षात ऊसाला चांगला दर मिळू लागला आहे. पाण्याची उपलब्धताही वाढल्याने शेतकरी पुन्हा ऊसाकडे वळला आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या विहिरी, कुपनलिका आटल्या नाहीत. त्यामुळे ऊस लागवड वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात जवळपास ४० ते ४२ हजार एकर ऊस आहे. तिन्ही साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात नोंदणी केली आहे. त्यामुळे उद्दीष्टाइतके गाळप तिन्ही साखर कारखाने करणार हे निश्चित आहे. गेल्या काही वर्षात कमी ऊसामुळे ऊसाची पळवापळवी होत होती. शेतकरी जिल्हाबाहेरील कारखान्यांच्या जादा दराच्या अमिषाला बळी पडत होते. अनेक शेतकऱ्यांचे पेमेंट अशा कारखान्यांकडे अडकले होते. त्यासाठी आंदोलन करावे लागले, शासन दरबारी चकरा माराव्या लागल्या. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आता बाहेरील कारखान्यांना ऊस देण्याबाबत कानावर हात ठेवले असल्याचे गेल्या दोन ते तीन वर्षातील चित्र आहे. यंदा सातपुडा साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू करण्यात आघाडी घेतली. गेल्या आठवड्यात कारखान्याचा गाळप शुभारंभ झाला. आयान शुगरही लवकरच सुरू होत आहे. दोन दिवसात आदिवासी कारखाना सुरू होणार आहे. तिन्ही साखर कारखाने सुरू झाल्याने या कारखान्यांमध्ये आलेले ऊसतोड मजूर, तेथील कामगार, व्यावसायिक, ऊसतोड वाहतूक करणारे वाहने व त्यातील कर्मचारी या सर्वांमुळे परिसरात रौनक आली आहे. त्याचा परिणाम शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा येथील बाजारपेठेत देखीेल उलाढाल वाढली आहे. चार ते पाच महिने ही रौनक कायम राहणार असल्यामुळे व्यापारी वर्ग देखील समाधानी असतो. सातपुडा साखर कारखान्याने २,३६५ रुपये ऊसाला दर जाहीर केला आहे. आयान शुगर कारखान्याचा दर घोषीत होणे बाकी आहे. आदिवासी साखर कारखान्याच्या दराकडेही लक्ष लागून आहे. यंदा जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. सर्वच शेतकऱ्यांची ऊसाची तोड वेळेवर होईल, जवळचे व लांबचे असा भेद न करता सर्वांना समान न्यायाने तोडसाठी मदत होईल याकडे साखर कारखाना व्यवस्थापनांनी पहाणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा मार्च, एप्रिलनंतर शेतकरी ऊस तोडीसाठी विविध पर्यायांचा वापर करतात ते होऊ नये अशी अपेक्षा आहेच. एकुणच यंदा साखर हंगाम तिन्ही कारखान्यांसाठी ‘गोड’ राहणार यात शंका नाही.