शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

एक मीटर भूजल वाढीने यंदा सुकाळ शहरे व खेड्यातून बाद होणार दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 12:52 IST

 भूषण रामराजे   लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल ...

 भूषण रामराजे  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षभर कोरोनाच्या भीतीत जगणाऱ्या जिल्हावासीयांना यंदा पाणीटंचाई भोगावी लागणार नसल्याचा निर्वाळा भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे.  विभागाने ऑक्टोबर अखेरीस केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी ३ मीटरवर स्थिर असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भूजल पातळी एक मीटरने वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पाऊस पडूनही जिल्ह्यातील भूजल पातळीत घट येत असल्याने २०१८ पर्यंत जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील विविध भागात गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होत होती. परंतु गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात पावसाने दिलेली १०० टक्के हजेरी व जलसंधारणाची कामे यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत एक मीटर भूजल स्थिर असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. विभागाने नंदुरबार तालुक्यातील १३, नवापूर १५, तळोदा ३, शहादा ९, अक्कलकुवा ६ तर धडगाव तालुक्यातील ४ ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करून त्यांचे सर्वेक्षण केले होते. यातून सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात ३.०७ मीटर, नवापूर २.१३, तळोदा ५.५७, शहादा ५.०७, अक्कलकुवा ३.५७ तर धडगाव तालुक्यात १.८० मीटरवर भूजल पातळी स्थिर असल्याचे समोर आले आहे. विभागाने निर्धारित केलेल्या ५० पैकी केवळ १४ विहिरींच्या पाणी पातळीत सर्वेक्षणादरम्यान घट आल्याचे, तर विहिरींची पातळी वाढल्याचे समोर आले होते. आजअखेरीस जिल्ह्यात  भूजल पातळी ही १.१६ मीटरने वाढली असल्याची माहिती आहे.

जिल्ह्याची भूजल पातळी एकमीटरने वाढली असल्याने चांगले संकेत मिळाले आहेत. जिल्ह्यात उदरात मुबलक पाणीसाठा आहे. परंतू या पाण्याचा योग्य पद्धतीने उपसा करणे गरजेचे आहे. यामुळे हे पाणी येत्या काळात टिकेल. जिल्ह्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि पावसाचे पाणी जमिनीत गेल्याने पाणी पातळी वाढली आहे. नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जिल्ह्यात यंदा पाणीटंचाई राहणार नाही. -आर.ओ.भगमार, उपसंचालक, भूजल सर्वेक्षण विभाग, नंदुरबार.