शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

करंजवेलला अवैध वाळू उत्खननावर धाड

By admin | Updated: April 6, 2017 00:47 IST

प्रांताधिकाºयांची कारवाई : लाखोंचे साहित्य जप्त, संशयित पसार

नवापूर : उकाई धरणाच्या फुगवट्यातील पाणी व तालुक्यातील करंजवेल शिवारातील सरपणी नदीच्या संगमावर अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणारे केंद्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात महसूल प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत एक ते दीड कोटी रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.उपविभागीय अधिकारी निमा अरोरा, तहसीलदार प्रमोद वसावे यांनी महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी स्थानिक पोलीस यांच्यासह तापी जिल्हा पोलिसांचे सहकार्य घेत आज दुपारी एक वाजेच्या सुमारास करंजवेल शिवाराजवळ ही कारवाई केल्याची माहिती तहसीलदार प्रमोद वसावे यांनी दिली. सरमणी नदीचे पाणी तथा उकाई धरणाचे नारायणपूर-काकरघाट जवळील फुगवट्याचे पाण्याचे संगमस्थान असलेल्या ठिकाणी अवैधरित्या वाळूचे उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी पाण्याची खोली जास्त असल्याने बोटीच्या साह्याने स्वच्छ धुतलेल्या वाळूचा उपसा करण्यात येत होता. ही वाळू दर्जेदार असल्याने सुरत, मुंबईसह अनेक ठिकाणी या वाळूचा पुरवठा होत होता. उपविभागीय अधिकारी निमा अरोरा यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आज ही कारवाई करण्यात आली.तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी पाण्याच्या प्रवाहातून आठ ते दहा कि.मी. अंतर बोटीने प्रवास करून वाळू उत्खनन करणाºयांना पकडण्यासाठी पाठलाग केला. मात्र सर्व संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरले.  प्रशासनाकडून एकूण सात बोटी जप्त करण्यात आल्या. गुजरात पोलिसांनी दोन बोटी ताब्यात घेतल्या. वाळूचा प्रत्यक्ष उपसा करण्यासाठी कार्यान्वित केलेली यंत्रणा     जागेवरून काढण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यात साहित्य लोखंडी पाईप, गाळणी, विद्युत  जनित्र, होडी व इतर साधनांचा समावेश आहे. या कारवाईत एक ते दीड कोटी रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला जात असल्याचे तहसीलदार प्रमोद वसावे यांनी सांगितले. या कारवाईत पुरवठा निरीक्षक मिलिंद निकम, वळवी, साळुंखे, मंडळ अधिकारी व तलाठी सहभागी झाले. निमा अरोरा यादेखील सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होत्या.यापूर्वीदेखील या भागात दोन वर्षांपूर्वी मोठी कारवाई करण्यात आली होती. त्या वेळीदेखील मोठमोठ्या व अवजड मशीनरी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या भागात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी कुणाचा कृपाशीर्वाद आहे. कुणाचे पाठबळ आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या वाळू व्यवसायावर कडक निर्बंध लावावे, येथील अवैध वाळू उत्खनन कायमस्वरूपी थांबवावे, अशी मागणी होत आहे.                                   (वार्ताहर)अनेकांची नजर४१९६१ साली मुंबई प्रदेश विभाजित झाल्यानंतर महाराष्टÑ गुजरात राज्यांची स्वतंत्र निर्मिती झाली. नदी व धरणातील फुगवट्याचे पाणी या दोन राज्यांच्या सीमेसाठी अडथळा ठरत आले आहे. वर्षानुवर्षे पाण्याखाली हा भाग राहिल्याने वाळूचा मुबलक साठा उपलब्ध होत असल्याने अवैध वाळू वाहतुकीसाठी हा भाग उपयुक्त ठरत आला आहे. पाण्याच्या याच पट्ट्यावर यापूर्वीही प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.