शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

कोरोनाकाळात चार बालविवाह थांबवून ‘ती’ला जगण्याची उमेद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकविध समस्या सतावत आहेत. बालविवाहासारख्या गंभीर समस्येने या काळात पुन्हा डोके वर काढल्याचे ...

नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकविध समस्या सतावत आहेत. बालविवाहासारख्या गंभीर समस्येने या काळात पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले होते; परंतु महिला बालविकास विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने चार बालविवाहांना चाप बसून मुलींना जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे.

कोरोनाकाळात चाइल्डलाइन, बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती यांनी कारवाईचा धडाका लावल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा, मध्यप्रदेशातील खेतिया परिसर, तळोदा व प्रकाशा, ता. शहादा येथे होऊ घातलेले बालविवाह रोखले गेले आहेत. कोरोनाकाळातील बेरोजगारी, तसेच आर्थिक चणचण यातून पालकांनी कमी खर्चात विवाह होतो या सबबीखाली हे विवाह नियोजित केले होते; परंतु मुलींचे वयच कमी असल्याचे समोर आल्यानंतर ते विवाह रद्द करून पालकांना समज देण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात सातत्याने जाणीवजागृती सुरू असते. बालविवाह होत असेल तर नागरिकांनी चाइल्डलाइनशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे.

जुन्या चालीरीतींमुळे काही समाजांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर चाइल्डलाइनकडे तक्रारी दाखल होतात. त्यानंतर चाइल्डलाइन, बालसंरक्षण कक्ष आणि पोलिसांचे पथक बालविवाह रोखतात. त्यानंतर बालकल्याण समितीमार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती चाइल्डलाइनचे समन्वयक आशिष शेवाळे यांनी दिली. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील अमलीपाडा येथे गेल्या १५ दिवसांपूर्वीच एक विवाह थांबविण्यात आला. यात मुलगी १४ वर्षांची, तर मुलगा अवघा १६ वर्षांचा होता. जिल्हा महिला समुपदेशन कक्षाच्या सुमित्रा वसावे यांनी हा विवाह थांबविला होता. यातील मुलीला खापर येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातही प्रवेश मिळवून देण्यात आला आहे.

मुलींची संख्या कमी

जिल्ह्यात माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांच्या तुलनेत मुलींची पटसंख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. पटसंख्या कमी होण्यास इतरही अनेक कारणे आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याच मुलींची शाळा सुटली आहे. या मुलींचे शिक्षण सुरू होण्याची आवश्यकता आहे.

विवाह रोखण्यासाठी सेविकांची मदत

कोरोनाकाळात बालविवाह करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असले तरी पुन्हा ते होऊ नयेत यासाठी महिला बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका व सरपंच यांच्या दर महिन्याला बैठका घेऊन गावातील विवाहांची माहिती घेतली जाणार आहे.

मुलगी म्हणजे चिंता म्हणून...

जिल्ह्यात यापूर्वी झालेले बालविवाह हे केवळ पालकांची मुलींप्रती असलेली चिंता यातून झालेले आहेत. चांगले स्थळ मिळत नाही, म्हणून जे आले ते चांगले असा विचार करून मुलींचा अल्पवयात विवाह करण्याचा घाट घातला जातो.

बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सर्व स्तरावर सूचना केल्या आहेत. विभागाकडून वारंवार सामाजिक संस्थांच्या संपर्कात राहून बालविवाहांचा आढावा घेतला जातो.

- उमेश पाडवी

जिल्हा समन्वयक, नंदुरबार

काही समाजातील जुन्या चालीरीतींमुळे बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. मुलगी मोठी झाली तर मुलगा भेटणार नाही अशी भीती असते; परंतु पालकांनी लहान वयात मुलींचे लग्न करू नये.

-राहुल जगताप

जिल्हा महिला समुपदेशन कक्ष