शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
3
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
5
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
6
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
7
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
8
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
9
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
10
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर
11
काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल
12
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
13
Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
14
निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
15
Mutual Fund असावा तर असा! कोणताही गाजावाजा नाही, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला जबरदस्त रिटर्न
16
नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
17
'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
18
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
19
'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
20
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?

झोपडीतील गरिबांचे पक्क्या घरांचे स्वप्न संथ गतीने होतंय साकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार खासदार डाॅ. हीना गावित यांनी केंद्र शासनाकडे केली होती. यानंतर याप्रकरणी ...

नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार खासदार डाॅ. हीना गावित यांनी केंद्र शासनाकडे केली होती. यानंतर याप्रकरणी प्राथमिक स्तरावर चाैकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने जिल्ह्यातील एकूण २८ हजार घरांची तपासणी करून त्यातून ३ हजार १९३ लाभार्थी हे बोगस असल्याचे आणले आहे. एकीकडे हा प्रकार उघडकीस आला असताना दुसरीकडे मात्र घरकुलांचा लाभ मिळणाऱ्या कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, हक्काचे घर मिळाल्याने अनेकांना आधार मिळाला आहे.

जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ९१. ५३ टक्के घरकुले पूर्ण करून लाभार्थींना लाभ देण्यात आला होता. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत चालवल्या गेलेल्या या योजनेंतर्गत दरवर्षी घरकुलांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यावरच भर देण्यात आला असून, २०२०-२१ या वर्षात घरकुलांची कामे गतीने केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु यात निधीअभावी अद्यापही १९ हजार घरे अपूर्ण आहेत.

१९ हजार घरकुलांचे थकले अनुदान

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान थकल्याने १९ हजार ९६२ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. निधी वितरित करण्याचे काम आता थेट मंत्रालयातून होत आहे. जिल्हा परिषदेत सध्या डीआरडीएच्या प्रकल्प संचालक पदावर प्रभारी अधिकारी नियुक्त असल्याने यंदाच्या वर्षाची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.

मोफत वाळू मिळेना, साहित्यही महागले!

या योजनेसाठी मोफत वाळू देण्याची घोषणा आहे; परंतु मोफत वाळूच मिळत नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय साहित्यही महागले आहे. मिळालेल्या पैशातून घर पूर्ण होत नाही. यामुळे अनेक जण उसनवारीने पैसे घेऊन घराचे काम पूर्ण करतात.

पूर्णवेळ अधिकारी हवा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून जिल्ह्यात आवास योजना राबवल्या जातात. यासाठी प्रकल्प संचालक हे स्वतंत्र पद आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी स्वतंत्र अधिकारीच नसल्याने कामांना खोडा बसत असल्याची माहिती आहे.

अनुदान मिळण्यास विलंब होतो. अनुदान बँकेत जमा करण्याची कोणतीही एक अशी वेळ नाही, आधी बँकांमध्ये खूप गर्दी असते. गावाकडून तळोद्याला जाण्यासाठीच पैसे खर्च होतात. पंचायत समितीकडून हप्ते वेळेवर मिळाल्यास घरकुलाचे काम नियमित सुरू राहील.

-रतन मोचडा पावरा, जीवननगर (पु)

घरकुलांसाठी अनुदान पुरेसे सोडा, पण ते वेळेवरही मिळत नाही. तालुका आणि ग्रामस्तरावर कर्मचारी नाहक कागदपत्रांची मागणी करतात. पहिला हप्ता मिळाल्यावर झालेले काम दुसरा हप्ता मिळेपर्यंत थांबलेले असते. हे प्रकार थांबवले गेले पाहिजेत.

- अरविंद वसावे, धडगाव.