शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नवापूर व तळोद्यात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:35 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर/कोठार :  केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूर व ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर/कोठार :  केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूर व तळोदा येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. या वेळी घोषणाबाजी करीत तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही काँग्रेसतर्फे पाठींबा दर्शविण्यात आला आहे.नवापुरात घोषणाबाजीकेंद्र शासनाने कृषी व शेतकऱ्यांसंदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळया कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी पंजाब, हरियाणा, राज्यस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व इतर राज्यात निदर्शने व आंदोलन करीत आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हा व नवापूर तालुका काँग्रेस पक्षाने घेतला व  त्याबाबतचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना नवापूर तालुका काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले. नवापूर तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कृषी व शेतकरीसंदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी निदर्शने व आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय नंदुरबार जिल्हा व नवापूर तालुका काँग्रेस पक्षाने घेतला आहे. पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी, आमदार  शिरीषकुमार नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा उपाध्यक्ष रतनजी गावीत, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, पं.स. सभापती  रतिलाल कोकणी, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरीया, गटनेता आशिष मावची, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांविषयी त्यांच्या व्यथा समजून न घेता व त्यांना विश्वासात न घेता तयार केलेल्या शेतकरीविरोधी तीन विधेयके मंजूर करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊ असे म्हणणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज, थंड पाण्याचे फवारे,अश्रुधूर यासारखे अमानुष कृत्य करून शेतकऱ्यांना थांबवण्याचे षडयंत्र केले आहे. काळ्या मातीत राबणारा अन्नदाता रस्त्यावर थंडीवाऱ्यात पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या अवहेलना करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध केला आहे. पंजाब, हरियाणा व राजस्थान या तीनही राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा देत नवापूर तालुका काँग्रेस पक्ष, शेतकरी व शेतमजुरांनी निषेध केला आहे. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूर तालुका कॉग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, पं.स. सभापती रतिलाल कोकणी, पं.स. सदस्या ललीता वसावे, प्रियंका गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया, गटनेता आशिष मावची, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे, माजी नगरसेवक अजय पाटील, हारूण खाटीक, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरिया, फारुक शहा, सुभाष कुंभार, पराग नाईक, संजय वसावे, जयंत पाडवी, यशोदा वळवी, राजेश गावीत, विजय गावीत, मोहंमद मुल्ला, फेजल शेख, इरफान मुल्ला, रहेमत खान, तुराब पठाण, विलास वसावे, राम कोकणी आदी उपस्थित होते. निवेदनावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.तळोदा शहर काँग्रेस कमिटीतर्फे  धरणे आंदोलनकेंद्र सरकारच्या कृषी व शेतकरीसंदर्भात पारित केलेले तीन काळे कायदे रद्द करण्याच्या शेतकर्‍यांच्या दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तळोदा तहसील कार्यालय येथे तळोदा शहर काँग्रेस कमिटीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी मंत्री ॲड.पद्‌माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, तळोदा शहराध्यक्ष गौरव वाणी, उपाध्यक्ष बापू कलाल, नगरसेवक सुभाष चौधरी, सत्यवान पाडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, अर्जुन वळवी,       राणापूर येथील सरपंच दिनेश       वसावे, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश इंद्रजित, जिल्हा युवा उपाध्यक्ष संदीप परदेशी, पंचायत समिती सदस्य सोनी पाडवी, जि.प.चे माजी सदस्य नरहर ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, माजी उपनगराध्यक्ष अनिल माळी, सरपंच मंगलसिंग पाटील, राजीव गांधी मुख्य समन्वयक प्रवीण वळवी, योगेश पाडवी याच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच शेतकरीविरोधी कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.