शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

नगरपंचायत निर्मितीसाठी संसदेने स्वतंत्र कायदा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

निवेदनात, अनुसूचित क्षेत्रासाठी राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ (य),(ग) नुसार नगर परिषदसंबंधी राज्यघटनेच्या ...

निवेदनात, अनुसूचित क्षेत्रासाठी राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ (य),(ग) नुसार नगर परिषदसंबंधी राज्यघटनेच्या भाग नऊ-(क) मधील अनुच्छेद २४३ (थ) ते अनुच्छेद २४३(य),(ख)मधील तरतुदी पाचव्या अनुसूचित येणाऱ्या अनुसूचित क्षेत्रांना लागू होत नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या नगरपंचायती, नगरपरिषद कायदेशीर ठरू शकत नाही. गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्यशासनाने अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला. मात्र पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या १८ नगरपंचायती व चार नगर परिषदेबाबत संसदेने स्वतंत्र कायदा न केल्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग कायम आहे. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती, नगर परिषदा कायदेशीर ठरू शकत नाही. परिणामी या क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या वाट्याला उपेक्षाच आहेत. नगरपरिषदसंबंधी २००१ साली तयार केलेल्या कायद्याचा मसुदा २० वर्ष होऊनही संसदेने पारित केलेला नाही. तरीही राज्य सरकारने अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती गठीत केलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेऊन कारभार सुरू केला आहे. संसदेत अनुसूचित क्षेत्रातील नगर परिषद, नगरपंचायतीसाठी स्वतंत्र कायदा करीत नाही तोपर्यंत अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायत गठित करता येत नाही, अशी नियमावली आहे. अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना २००१ च्या प्रस्तावित नगरपरिषद मसुद्यात अनेक सुविधा, प्रतिनिधित्व आहे ते प्रस्तावित बिल अद्यापपर्यंत संसदेत मंजूर झाले नाही. या गावांना पुन्हा अनुसूचित क्षेत्र गावाचा दर्जा देऊन त्यांना पेसा कक्षेत आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता गणपत पाडवी,सचिव फत्तेसिंग नाईक, मनोज वळवी, महेंद्र पाडवी,संदीप ठाकरे, अरुण पाडवी आदी उपस्थित होते.