शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निर्मितीसाठी संसदेने स्वतंत्र कायदा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST

निवेदनात, अनुसूचित क्षेत्रासाठी राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ (य),(ग) नुसार नगर परिषदसंबंधी राज्यघटनेच्या ...

निवेदनात, अनुसूचित क्षेत्रासाठी राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे राज्यघटनेच्या अनुच्छेद २४३ (य),(ग) नुसार नगर परिषदसंबंधी राज्यघटनेच्या भाग नऊ-(क) मधील अनुच्छेद २४३ (थ) ते अनुच्छेद २४३(य),(ख)मधील तरतुदी पाचव्या अनुसूचित येणाऱ्या अनुसूचित क्षेत्रांना लागू होत नाही. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या नगरपंचायती, नगरपरिषद कायदेशीर ठरू शकत नाही. गावांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्यशासनाने अस्तित्वात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला. मात्र पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या १८ नगरपंचायती व चार नगर परिषदेबाबत संसदेने स्वतंत्र कायदा न केल्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग कायम आहे. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती, नगर परिषदा कायदेशीर ठरू शकत नाही. परिणामी या क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या वाट्याला उपेक्षाच आहेत. नगरपरिषदसंबंधी २००१ साली तयार केलेल्या कायद्याचा मसुदा २० वर्ष होऊनही संसदेने पारित केलेला नाही. तरीही राज्य सरकारने अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायती गठीत केलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेऊन कारभार सुरू केला आहे. संसदेत अनुसूचित क्षेत्रातील नगर परिषद, नगरपंचायतीसाठी स्वतंत्र कायदा करीत नाही तोपर्यंत अनुसूचित क्षेत्रात नगरपंचायत गठित करता येत नाही, अशी नियमावली आहे. अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना २००१ च्या प्रस्तावित नगरपरिषद मसुद्यात अनेक सुविधा, प्रतिनिधित्व आहे ते प्रस्तावित बिल अद्यापपर्यंत संसदेत मंजूर झाले नाही. या गावांना पुन्हा अनुसूचित क्षेत्र गावाचा दर्जा देऊन त्यांना पेसा कक्षेत आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता गणपत पाडवी,सचिव फत्तेसिंग नाईक, मनोज वळवी, महेंद्र पाडवी,संदीप ठाकरे, अरुण पाडवी आदी उपस्थित होते.