शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

खरीप हंगामात १९०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना, त्यापाठोपाठ निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना, त्यापाठोपाठ निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले, महागाईमुळे खर्च मात्र वाढला. यंदाच्या खरीप हंगामात शहादा तालुक्यात गेल्या चार महिन्यात सुमारे दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्‍टरवरील विविध पिकांचे  नुकसान झाले आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरीवर्ग पुरता अडचणीतच आहे. अल्प उत्पादन, शेती पिकांना हमीभाव मिळत नाही. पिकांसाठी गुंतविलेले लाखो रुपयांचे भांडवल बाजारभाव न मिळाल्याने वाया गेले आहे. निसर्गानेही या काळात शेतकऱ्यांना आणखी खाईत लोटले आहे. अवकाळी पाऊस, विविध कीडजन्य आजार याचा फटका शेती पिकांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सुरुवातीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठा बंद केल्या होत्या. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद होती. परिणामी  एप्रिल, मे, जून व जुलै महिन्यापर्यंत रब्बीतील शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेता आला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी शहरातील गल्लीबोळात जाऊन उत्पादीत माल विकला. काहींनी तर फुकटात वाटप केले होते.खरीपातही नुकसानयंदाच्या खरीपात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसाने जुलैअखेर दांडी मारली. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले मूग व उडदाचे पीक हिरावून नेले. यंदा जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांचे सर्वाधिक नुकसान ऑगस्टमध्ये झाले. त्यात बहुतांश शेतकऱ्यांचे क्विंटलचे उत्पादन किलोवर आले. त्यामुळे खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात जवळपास दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे झालेत, आता मदतीची प्रतीक्षा लागून आहे.शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरजदरम्यान, परतीच्या पावसानेही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात कापूस ओला झाला, ऊस आडवा झाला. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. पपई, केळीचे  नुकसान आहेच. सर्वच बाजूंनी शेतकरी कात्रीत सापडला असून शासन स्तरावरून मदतीची गरज आहे. या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होऊन रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. मात्र आज खरीप पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे पंचनामे होऊन त्याची तातडीने मदत मिळण्याची नितांत गरज आहे.