शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
8
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
9
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
10
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
11
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
12
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
13
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
14
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
15
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
16
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
17
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
18
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
19
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
20
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?

खरीप हंगामात १९०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना, त्यापाठोपाठ निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना, त्यापाठोपाठ निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले, महागाईमुळे खर्च मात्र वाढला. यंदाच्या खरीप हंगामात शहादा तालुक्यात गेल्या चार महिन्यात सुमारे दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्‍टरवरील विविध पिकांचे  नुकसान झाले आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरीवर्ग पुरता अडचणीतच आहे. अल्प उत्पादन, शेती पिकांना हमीभाव मिळत नाही. पिकांसाठी गुंतविलेले लाखो रुपयांचे भांडवल बाजारभाव न मिळाल्याने वाया गेले आहे. निसर्गानेही या काळात शेतकऱ्यांना आणखी खाईत लोटले आहे. अवकाळी पाऊस, विविध कीडजन्य आजार याचा फटका शेती पिकांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सुरुवातीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठा बंद केल्या होत्या. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद होती. परिणामी  एप्रिल, मे, जून व जुलै महिन्यापर्यंत रब्बीतील शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेता आला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी शहरातील गल्लीबोळात जाऊन उत्पादीत माल विकला. काहींनी तर फुकटात वाटप केले होते.खरीपातही नुकसानयंदाच्या खरीपात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसाने जुलैअखेर दांडी मारली. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले मूग व उडदाचे पीक हिरावून नेले. यंदा जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांचे सर्वाधिक नुकसान ऑगस्टमध्ये झाले. त्यात बहुतांश शेतकऱ्यांचे क्विंटलचे उत्पादन किलोवर आले. त्यामुळे खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात जवळपास दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे झालेत, आता मदतीची प्रतीक्षा लागून आहे.शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरजदरम्यान, परतीच्या पावसानेही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात कापूस ओला झाला, ऊस आडवा झाला. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. पपई, केळीचे  नुकसान आहेच. सर्वच बाजूंनी शेतकरी कात्रीत सापडला असून शासन स्तरावरून मदतीची गरज आहे. या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होऊन रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. मात्र आज खरीप पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे पंचनामे होऊन त्याची तातडीने मदत मिळण्याची नितांत गरज आहे.