शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात १९०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना, त्यापाठोपाठ निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना, त्यापाठोपाठ निसर्गाचा लहरीपणा, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले, महागाईमुळे खर्च मात्र वाढला. यंदाच्या खरीप हंगामात शहादा तालुक्यात गेल्या चार महिन्यात सुमारे दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्‍टरवरील विविध पिकांचे  नुकसान झाले आहे. मागील काही वर्षांपासून शेतकरीवर्ग पुरता अडचणीतच आहे. अल्प उत्पादन, शेती पिकांना हमीभाव मिळत नाही. पिकांसाठी गुंतविलेले लाखो रुपयांचे भांडवल बाजारभाव न मिळाल्याने वाया गेले आहे. निसर्गानेही या काळात शेतकऱ्यांना आणखी खाईत लोटले आहे. अवकाळी पाऊस, विविध कीडजन्य आजार याचा फटका शेती पिकांना बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूचे संकट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सुरुवातीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून बाजारपेठा बंद केल्या होत्या. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद होती. परिणामी  एप्रिल, मे, जून व जुलै महिन्यापर्यंत रब्बीतील शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेता आला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी शहरातील गल्लीबोळात जाऊन उत्पादीत माल विकला. काहींनी तर फुकटात वाटप केले होते.खरीपातही नुकसानयंदाच्या खरीपात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिकांची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसाने जुलैअखेर दांडी मारली. परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले मूग व उडदाचे पीक हिरावून नेले. यंदा जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांचे सर्वाधिक नुकसान ऑगस्टमध्ये झाले. त्यात बहुतांश शेतकऱ्यांचे क्विंटलचे उत्पादन किलोवर आले. त्यामुळे खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात जवळपास दोन हजार ५०० शेतकऱ्यांचे एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे झालेत, आता मदतीची प्रतीक्षा लागून आहे.शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरजदरम्यान, परतीच्या पावसानेही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात कापूस ओला झाला, ऊस आडवा झाला. बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे गेले. पपई, केळीचे  नुकसान आहेच. सर्वच बाजूंनी शेतकरी कात्रीत सापडला असून शासन स्तरावरून मदतीची गरज आहे. या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होऊन रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. मात्र आज खरीप पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचे पंचनामे होऊन त्याची तातडीने मदत मिळण्याची नितांत गरज आहे.