शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

मुंबई येथे कर्तव्य बजावून आलेल्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:09 IST

 हर्षल साळुंखे लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली ...

 हर्षल साळुंखेलोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल सेवेला पर्याय म्हणून बेस्ट बसच्या माध्यमातून बसफेऱ्याद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विविध आगारातून कर्मचारी मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी जात आहेत. शहादा येथून सेवा देण्यासाठी गेलेले यशवंत तुकाराम सोनवणे या वाहकाचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.संपूर्ण राज्यात कोरोनाची वाढती संख्या बघता शासनाने लॉकडाऊन लावला. मुंबईसारख्या महानगरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता शासनाने संपूर्ण मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद केले. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वेची लोकल सेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी बेस्ट बसच्या सेवेकडे वळल्याने अतिरिक्त भार पडत असल्यामुळे एस.टी. महामंडळातील विविध आगारातील कर्मचाऱ्यांना मुंबई येथे बेस्ट बसमध्ये सेवा देण्यासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार शहादा आगारातूनदेखील टप्प्याटप्प्याने चालक व वाहक कर्मचाऱ्यांना आठ ते १५ दिवसांसाठी सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र यात कर्मचाऱ्यांचे काही न ऐकता आधीच विविध आजारांनी त्रस्त असलेले व ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांनाही मुंबईला सेवा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.शहादा आगारातील वाहक यशवंत तुकाराम सोनवणे (५२) हे २८ वर्षापासून शहादा आगारात सेवा देत होते. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बेस्ट बसेसमध्ये सेवा देण्यासाठी ते गेले होते. आठ दिवस सेवा दिल्यानंतर शहादा येथे परत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी कोविड चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णवाहिकेने नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कोविड नियमानुसार नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत यशवंत सोनवणे यांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानुसार त्यांची ऍन्जिओग्राफी करण्यात आली आहे. त्यांचे वय  ५२ असल्यामुळे मला मुंबई येथे न पाठवता येथे ड्युटी लावण्याची विनंती त्यांनी करूनही अधिकाऱ्यांनी काही न ऐकता भाऊ यशवंत यांना मुंबई येथे पाठवले. आधीच ते आजाराने त्रस्त असूनही त्यांना मुंबईला पाठवल्यामुळे सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथे ते जाण्यास तयार नसतानाही जबरदस्तीने त्यांना पाठविण्यात आले, असा आरोप करीत पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनवणे यांचे भाऊ व कुटुंबाने केली आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.