शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुंबई येथे कर्तव्य बजावून आलेल्या वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:09 IST

 हर्षल साळुंखे लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली ...

 हर्षल साळुंखेलोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून मुंबईतील रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल सेवेला पर्याय म्हणून बेस्ट बसच्या माध्यमातून बसफेऱ्याद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विविध आगारातून कर्मचारी मुंबई येथे सेवा बजावण्यासाठी जात आहेत. शहादा येथून सेवा देण्यासाठी गेलेले यशवंत तुकाराम सोनवणे या वाहकाचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.संपूर्ण राज्यात कोरोनाची वाढती संख्या बघता शासनाने लॉकडाऊन लावला. मुंबईसारख्या महानगरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता शासनाने संपूर्ण मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद केले. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी रेल्वेची लोकल सेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी बेस्ट बसच्या सेवेकडे वळल्याने अतिरिक्त भार पडत असल्यामुळे एस.टी. महामंडळातील विविध आगारातील कर्मचाऱ्यांना मुंबई येथे बेस्ट बसमध्ये सेवा देण्यासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार शहादा आगारातूनदेखील टप्प्याटप्प्याने चालक व वाहक कर्मचाऱ्यांना आठ ते १५ दिवसांसाठी सेवा बजावण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र यात कर्मचाऱ्यांचे काही न ऐकता आधीच विविध आजारांनी त्रस्त असलेले व ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांनाही मुंबईला सेवा देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.शहादा आगारातील वाहक यशवंत तुकाराम सोनवणे (५२) हे २८ वर्षापासून शहादा आगारात सेवा देत होते. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे बेस्ट बसेसमध्ये सेवा देण्यासाठी ते गेले होते. आठ दिवस सेवा दिल्यानंतर शहादा येथे परत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी कोविड चाचणी करून घेतली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णवाहिकेने नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कोविड नियमानुसार नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत यशवंत सोनवणे यांना आधीच हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानुसार त्यांची ऍन्जिओग्राफी करण्यात आली आहे. त्यांचे वय  ५२ असल्यामुळे मला मुंबई येथे न पाठवता येथे ड्युटी लावण्याची विनंती त्यांनी करूनही अधिकाऱ्यांनी काही न ऐकता भाऊ यशवंत यांना मुंबई येथे पाठवले. आधीच ते आजाराने त्रस्त असूनही त्यांना मुंबईला पाठवल्यामुळे सेवा देत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई येथे ते जाण्यास तयार नसतानाही जबरदस्तीने त्यांना पाठविण्यात आले, असा आरोप करीत पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनवणे यांचे भाऊ व कुटुंबाने केली आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषाचा मृत्यू झाल्याने सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.