शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक हजेरीच्या निर्णयाला नंदुरबारात ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 10:50 IST

जिल्ह्याची स्थिती : निंम्याहून अधिक महाविद्यालयांची मशिन खरेदीही नाही, कारवाईची मागणी

नंदुरबार : खाजगी कोचिंग क्लासेसवरील विद्याथ्र्याचे अवलंबन कमी व्हावे, महाविद्यालयातील दांडी बहाद्दरांची संख्या नियंत्रणात राहून महाविद्यालयीन गुणवत्ता वाढावी यासाठी शासनाकडून विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्याथ्र्यासाठी बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी घेण्याचा निर्णय  घेण्यात आला़  परंतु जिल्ह्यात या शासन निर्णयाला ‘खो’ मिळाला आह़े निम्म्याहून अधिक महाविद्यालयांनी बायोमेट्रिक मशिनचीही खरेदी केलेली नाही़जिल्ह्यात एकूण 76 विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालये आहेत़ पैकी, 53 अनुदानित, 17 विनाअनुदानित तर 6 महाविद्यालये स्वयंअर्थसहाय्यित आहेत़ त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच महाविद्यालयांनी बायोमेट्रिक मशिन्स्ची खरेदी केलेली आह़े परंतु त्या माध्यमातून खरोखर विद्याथ्र्याची हजेरी घेण्यात येतेय की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आह़े संबंधित विद्याथ्र्याची खरोखर बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी घेण्यात येतेय की नाही? याबाबत जिल्ह्यात चार भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आह़े या भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, दोन प्राचार्य, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी आदींचा समावेश करण्यात आलेला आह़े सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतार्पयत 8 ते 9 महाविद्यालयांची तपासणी करण्यात आलेली असून त्यांच्याव्दारे बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतु अद्यापही बहुतेक विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्याची बायोमेट्रिक हजेरी घेण्याबाबत उदासिनता दिसून येत आह़े पावती पुस्तकांची तपासणी करण्याची आवश्यकताअनेक महाविद्यालयांकडून केवळ बायोमेट्रिक मशिनची खरेदी करण्यात आलेली आह़े परंतु प्रत्यक्षात त्याचा वापर होत असल्याचे दिसून येत नाही़ त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाकडून संबंधित सर्वच महाविद्यालयांकडून बायोमेट्रिक मशिन खरेदी केल्याची पावती तसेच दररोज हजेरी घेण्यात येणा:या नोंदीचे रेकॉर्ड मागविण्यात आलेले आह़े त्यानुसार महाविद्यालये किती प्रामाणिकपणे बायोमेट्रिक पध्दतीने विद्याथ्र्याची हजेरी घेणार याचा उलगडा यातून होणार आह़े विज्ञान शाखेतील कनिष्ठ महानिद्यालयातील विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित राहत नाहीत़ ब:याच वेळा केवळ प्रात्याक्षिकांनाच उपस्थिती देऊन वेळ मारुन नेली जात असत़े महाविद्यालयांपेक्षा विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्येच अधिक उपस्थित राहत असल्याने परिणामी महाविद्यालयातील परिसर ओस पडत आह़े त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवरही होताना दिसून येत आह़े सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी याकरीता खाजगी कोचिंग क्लासेसशी सामंजस्य करारसुध्दा केला असल्याची माहिती आह़े त्यामुळे यामुळे शिक्षण व्यवस्था पोखरली जाण्याचा धोका नाकारता येत नाही़ त्यामुळे शासनाकडून विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्याथ्र्याची बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी घेण्याबाबत आदेश काढण्यात आले होत़े परंतु याला संबंधित महाविद्यालये प्रतिसाद देत नसल्याचे ओरड सुरु झालेली आह़े80 दिवस उलटूनही कार्यवाहीत गती नाहीराज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 15 जून 2018 रोजी बायोमेट्रिक हजेरीव्दारे विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्र्याची हजेरी घेण्यात यावी असा शासन निर्णय घेण्यात आला़ यासाठी संबंधित महाविद्यालयांना एक  महिन्याची मुदत देत त्या कालावधीत महाविद्यालयांनी स्वता बायोमेट्रिक मशिन्स् उपलब्ध करुन घेत विद्याथ्र्याची हजेरी घ्यावी असे आदेश दिले होत़े  परंतु आता या निर्णयाला 80 दिवस उलटून गेल्यावरही महाविद्यालये या पध्दतीबद्दल उदासिन असल्याचे दिसून येत आह़े हीच स्थिती राज्यभरातील महाविद्यालयांची असल्याने शासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आह़े शासन निर्णयाला अडीच महिन्याहून अधिकचा काळ लोटला गेला आह़े तरीसुध्दा निंम्याहून अधिक महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने अशा हेकेखोर महाविद्यालयांविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आह़े प्रत्यक्षात शासन निर्णयातसुध्दा निर्णयाची अंमलबजावणी न करणा:या महाविद्यालयांविरोधात कारवाई करण्याचा स्पष्ट उल्लेख आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने आपल्या अधिकारांचा वापर करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े दररोज विद्यार्थी येताय की नाही याबाबत अनेक महाविद्यालयांना काहीही देणेघेणे नसत़े उलटपक्षी विद्याथ्र्याना खाजगी कोचिंग क्लासला जाण्याचे उपदेश देण्यात येत असतात़ त्यामुळे याचा गुणवत्तेवर परिणाम होत असतो़ अनेक महाविद्यालयांचे खाजगी कोचिंग क्लासशी संगमत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरु आह़े असे लागेबांधे असल्यानेच शासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आल़े