शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

आठवडाभरात उपस्थितीत झाली 45 टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 12:37 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. ५५ ते ६० टक्के विद्यार्थी उपस्थित राहू लागले असून आतापर्यंत जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे अजूनही ७२ शाळा बंद असल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच शाळा गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भितीमुळे शाळांमधील उपस्थिती १० ते १५ टक्केच्या आत राहिली होती. नंतर शाळा भरण्याचे प्रमाण नियमित झाले आही विद्यार्थी व पालकांच्या मनातील भिती देखील कमी झाल्याने आता विद्यार्थी संख्या वाढली आहे. सद्य स्थितीत जवळपास ५५ ते ६० टक्केपर्यंत वाढली आहे. येत्या आठवड्यात उपस्थिती संख्या ही ८० टक्केच्या आसपास जाण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. शाळांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत.माध्यमिक शाळांऐवजी कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती वाढत आहे. शाळांमधील अर्थात नववी व दहावीच्य वर्गात उपस्थिती ३५ ते ४५ टक्केच्या घरात आहे तर अकरावी व बारावी वर्गातील उपस्थिती ही ६५ ते ७० टक्केपर्यंत जात आहे. 

कोरोना पॅाझिटिव्हमुळे काही शाळा बंद...सुरू झालेल्या शाळांमधील काही शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आल्याने अशा शाळांना सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील सहा शाळांचा समावेश आहे. सर्वच शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून पालकांनी विद्यार्थ्यांंना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील दुर्गम भागात ॲानलाईन शिक्षणाला अनेक अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे शाळांमध्ये उपस्थित राहावे.-एम.व्ही.कदम, शिक्षणाधिकारी

अशी आहे उपस्थिती...बुधवार, २ डिसेंबर रोजी एकुण विद्यार्थी  १४,१७८ पैकी ७,१०९ विद्यार्थी उपस्थित होते. एकुण ४,१४१  शिक्षकांपैकी २,३८६ शिक्षक उपस्थित. १,१५८ शिक्षकेतरांपैकी १,१५५ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित.