शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आठवडाभरात उपस्थितीत झाली 45 टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 12:37 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. ५५ ते ६० टक्के विद्यार्थी उपस्थित राहू लागले असून आतापर्यंत जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे अजूनही ७२ शाळा बंद असल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच शाळा गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भितीमुळे शाळांमधील उपस्थिती १० ते १५ टक्केच्या आत राहिली होती. नंतर शाळा भरण्याचे प्रमाण नियमित झाले आही विद्यार्थी व पालकांच्या मनातील भिती देखील कमी झाल्याने आता विद्यार्थी संख्या वाढली आहे. सद्य स्थितीत जवळपास ५५ ते ६० टक्केपर्यंत वाढली आहे. येत्या आठवड्यात उपस्थिती संख्या ही ८० टक्केच्या आसपास जाण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. शाळांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत.माध्यमिक शाळांऐवजी कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती वाढत आहे. शाळांमधील अर्थात नववी व दहावीच्य वर्गात उपस्थिती ३५ ते ४५ टक्केच्या घरात आहे तर अकरावी व बारावी वर्गातील उपस्थिती ही ६५ ते ७० टक्केपर्यंत जात आहे. 

कोरोना पॅाझिटिव्हमुळे काही शाळा बंद...सुरू झालेल्या शाळांमधील काही शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आल्याने अशा शाळांना सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील सहा शाळांचा समावेश आहे. सर्वच शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून पालकांनी विद्यार्थ्यांंना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील दुर्गम भागात ॲानलाईन शिक्षणाला अनेक अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे शाळांमध्ये उपस्थित राहावे.-एम.व्ही.कदम, शिक्षणाधिकारी

अशी आहे उपस्थिती...बुधवार, २ डिसेंबर रोजी एकुण विद्यार्थी  १४,१७८ पैकी ७,१०९ विद्यार्थी उपस्थित होते. एकुण ४,१४१  शिक्षकांपैकी २,३८६ शिक्षक उपस्थित. १,१५८ शिक्षकेतरांपैकी १,१५५ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित.