शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

तळोदा तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार ...

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात अजून ५० टक्केही पेरण्या झाल्या नसल्याचे चित्र आहे.

तळोदा तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढवली व धनपूर, असे पाच लघु सिंचन प्रकल्प आहेत. तथापि, हे सर्व प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. यंदाचा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड- दोन महिने होत आहेत. तरीही अजून जोरदार पाऊस न झाल्याने धरणांमध्ये पाणी साठलेले नाही. पूर्वी जुलै महिन्यात जोरदार पाऊस होत असे. मात्र, हा महिनादेखील संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने अजूनपावेतो पाहिजे तशी धूमधडाक्यात हजेरी लावलेली नाही. साहजिकच सिंचन प्रकल्पांनादेखील मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत साधारण ३० ते ३५ टक्के जलसाठा पाचही प्रकल्पांमध्ये उपलब्ध झाला होता. यंदा तेवढे तर जाऊ द्या, पाच टक्केदेखील पाणी जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आतापासूनच भर पडली आहे. कारण सर्वच प्रकल्पांना ७० टक्के कोरडवाहू आदिवासी शेतकऱ्यांची जमीन येत असते. सध्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान घटत चालले आहे. शिवाय अर्धा पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत सिंचन प्रकल्प कसे भरतील, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. आधीच पावसाअभावी शेतकऱ्यांचा पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे उधार, उसनवारीने आणून घरात ठेवले आहे. तळोदा तालुक्यात अजूनपावेतो ५० टक्के पेरणीदेखील झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांनी पेरणी उरकली आहे त्यांच्यासमोरही वेळेवर पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले आहे. वास्तविक यंदा १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता राज्य शासनाच्या वेधशाळेने अंदाज वर्तविला होता. साहजिकच शेतकऱ्यांमध्येसुद्धा समाधानाचे वातावरण होते. मात्र, जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

यंदाही दुरुस्ती रखडली

तालुक्यातील पाच सिंचन प्रकल्पांपैकी रोझवा, सिंगसपूर, पाडळपूर व गढावली, असे चार सिंचन प्रकल्प अतिशय जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. आजतागायात त्यांची संबंधित यंत्रणेने एकदाही दुरुस्ती केलेली नाही. कुठे सांडव्याला मोठमोठे तडे गेले आहेत, तर कुठे पिचिंग लीक झाली आहे. प्रकल्पांच्या अशा दुरवस्थेमुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असते. उपलब्ध पाण्यात शेतकऱ्यांचा रबी हंगामदेखील पूर्ण होऊ शकत नसल्याचे शेतकरी सांगतात. वास्तविक सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असताना संबंधित यंत्रणा गांभीर्याने लक्ष घालायाला तयार नाही. शेतकरी सातत्याने ओरड करीत असतात. याकडे लोकप्रतिनिधींनीही साफ दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.