शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार ...

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात अजून ५० टक्केही पेरण्या झाल्या नसल्याचे चित्र आहे.

तळोदा तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढवली व धनपूर, असे पाच लघु सिंचन प्रकल्प आहेत. तथापि, हे सर्व प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. यंदाचा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड- दोन महिने होत आहेत. तरीही अजून जोरदार पाऊस न झाल्याने धरणांमध्ये पाणी साठलेले नाही. पूर्वी जुलै महिन्यात जोरदार पाऊस होत असे. मात्र, हा महिनादेखील संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने अजूनपावेतो पाहिजे तशी धूमधडाक्यात हजेरी लावलेली नाही. साहजिकच सिंचन प्रकल्पांनादेखील मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत साधारण ३० ते ३५ टक्के जलसाठा पाचही प्रकल्पांमध्ये उपलब्ध झाला होता. यंदा तेवढे तर जाऊ द्या, पाच टक्केदेखील पाणी जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आतापासूनच भर पडली आहे. कारण सर्वच प्रकल्पांना ७० टक्के कोरडवाहू आदिवासी शेतकऱ्यांची जमीन येत असते. सध्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान घटत चालले आहे. शिवाय अर्धा पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत सिंचन प्रकल्प कसे भरतील, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. आधीच पावसाअभावी शेतकऱ्यांचा पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे उधार, उसनवारीने आणून घरात ठेवले आहे. तळोदा तालुक्यात अजूनपावेतो ५० टक्के पेरणीदेखील झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांनी पेरणी उरकली आहे त्यांच्यासमोरही वेळेवर पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले आहे. वास्तविक यंदा १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता राज्य शासनाच्या वेधशाळेने अंदाज वर्तविला होता. साहजिकच शेतकऱ्यांमध्येसुद्धा समाधानाचे वातावरण होते. मात्र, जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

यंदाही दुरुस्ती रखडली

तालुक्यातील पाच सिंचन प्रकल्पांपैकी रोझवा, सिंगसपूर, पाडळपूर व गढावली, असे चार सिंचन प्रकल्प अतिशय जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. आजतागायात त्यांची संबंधित यंत्रणेने एकदाही दुरुस्ती केलेली नाही. कुठे सांडव्याला मोठमोठे तडे गेले आहेत, तर कुठे पिचिंग लीक झाली आहे. प्रकल्पांच्या अशा दुरवस्थेमुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असते. उपलब्ध पाण्यात शेतकऱ्यांचा रबी हंगामदेखील पूर्ण होऊ शकत नसल्याचे शेतकरी सांगतात. वास्तविक सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असताना संबंधित यंत्रणा गांभीर्याने लक्ष घालायाला तयार नाही. शेतकरी सातत्याने ओरड करीत असतात. याकडे लोकप्रतिनिधींनीही साफ दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.