शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार ...

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात अजून ५० टक्केही पेरण्या झाल्या नसल्याचे चित्र आहे.

तळोदा तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढवली व धनपूर, असे पाच लघु सिंचन प्रकल्प आहेत. तथापि, हे सर्व प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. यंदाचा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड- दोन महिने होत आहेत. तरीही अजून जोरदार पाऊस न झाल्याने धरणांमध्ये पाणी साठलेले नाही. पूर्वी जुलै महिन्यात जोरदार पाऊस होत असे. मात्र, हा महिनादेखील संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने अजूनपावेतो पाहिजे तशी धूमधडाक्यात हजेरी लावलेली नाही. साहजिकच सिंचन प्रकल्पांनादेखील मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत साधारण ३० ते ३५ टक्के जलसाठा पाचही प्रकल्पांमध्ये उपलब्ध झाला होता. यंदा तेवढे तर जाऊ द्या, पाच टक्केदेखील पाणी जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आतापासूनच भर पडली आहे. कारण सर्वच प्रकल्पांना ७० टक्के कोरडवाहू आदिवासी शेतकऱ्यांची जमीन येत असते. सध्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान घटत चालले आहे. शिवाय अर्धा पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत सिंचन प्रकल्प कसे भरतील, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. आधीच पावसाअभावी शेतकऱ्यांचा पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे उधार, उसनवारीने आणून घरात ठेवले आहे. तळोदा तालुक्यात अजूनपावेतो ५० टक्के पेरणीदेखील झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांनी पेरणी उरकली आहे त्यांच्यासमोरही वेळेवर पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले आहे. वास्तविक यंदा १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता राज्य शासनाच्या वेधशाळेने अंदाज वर्तविला होता. साहजिकच शेतकऱ्यांमध्येसुद्धा समाधानाचे वातावरण होते. मात्र, जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

यंदाही दुरुस्ती रखडली

तालुक्यातील पाच सिंचन प्रकल्पांपैकी रोझवा, सिंगसपूर, पाडळपूर व गढावली, असे चार सिंचन प्रकल्प अतिशय जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. आजतागायात त्यांची संबंधित यंत्रणेने एकदाही दुरुस्ती केलेली नाही. कुठे सांडव्याला मोठमोठे तडे गेले आहेत, तर कुठे पिचिंग लीक झाली आहे. प्रकल्पांच्या अशा दुरवस्थेमुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असते. उपलब्ध पाण्यात शेतकऱ्यांचा रबी हंगामदेखील पूर्ण होऊ शकत नसल्याचे शेतकरी सांगतात. वास्तविक सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असताना संबंधित यंत्रणा गांभीर्याने लक्ष घालायाला तयार नाही. शेतकरी सातत्याने ओरड करीत असतात. याकडे लोकप्रतिनिधींनीही साफ दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.