शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कुढावद गावातील २५ शेतकर्यांची ७५ लाख रूपयांमध्ये फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद येथील २५ शेतकर्यांची फळ व्यापार्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून फसवणूक होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद येथील २५ शेतकर्यांची फळ व्यापार्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून फसवणूक होत आहे. शेतकर्यांनी दिलेल्या मालाचे पैसे संबधित व्यापारी परत करत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कुढावद येथील २५ पेक्षा अधिक शेतकर्यांनी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, सावद आणि रावेर येथील काही व्यापार्यांना २०१९ मध्ये फळ उत्पादन दिले होते. त्यानंतर या उत्पादनाचे पैसे संबधितांकडून येणे अपेक्षित होते. परंतु संबधित व्यापारी पैसे देण्याऐवजी व्यापार्यांची बोळवण करत असल्याचे प्रकार सुरू आहे. याच दरम्यान शेतकर्यांनी केळी, पपई, टरबूज, डांगर आदी उत्पादने राजस्थान  आणि उत्तर प्रदेशातील व्यापार्यांना विक्री केला होता. परंतु या व्यापार्यांनीही शेतकर्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकरी वारंवार तगादा लावूनही व्यापारी पैसे देत नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान माल खरेदी करताना हे व्यापारी त्यांची वाहने घेत सरळ शेत बांधावर येतात. शेतकर्याला भूलथापा देत मालाच्या रकमेचे अथवा कोरे धनादेश देणे तसेच आपल्या नावाच्या लेटर हेडवर लिहून देत पैसे बुडवणार नसल्याचे सांगतात. परंतु गावी परत गेल्यावर मात्र शेतकर्यांचे फोनच उचलत नसल्याचे प्रकार समोर होत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. नुकतेच विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नाशिक जिल्ह्यात शेतकर्यांच्या थकीत पैश्याच्या वसुलीसाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही मोहिम सुरू करण्याची अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. 

प्रशासनाने सहकार्य करावेनंदुरबार जिल्ह्यात शेतकर्यांच्या फसवणूकीचे प्रकार गेल्या काही वर्षात सातत्याने होत आहेत. या प्रकारांना आळा बसण्याची गरज आहे. शहादा तालुक्यातील कुढावद येथील ७५ लाख रूपयांची फसवणूक असताना दुसरीकडे तालुक्यातील इतर गावातील शेतकरीही व्यापार्यांकडून याच प्रकारे फसवले जात आहेत. त्यांच्या गावी जाणे किंवा कायदेशीर कारवाई शेतकर्यांना नुकसानदायक असल्याने पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. केळी आणि पपई उत्पादक शेतकर्यांचे सर्वाधिक पैसे अडकून पडले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

व्यापारी माल घेऊन गेल्यानंतर संपर्क करत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकरी यंदा अडचणीत आहेत. प्रशासनाने शेतकर्यांच्या समस्येचे निराकरण करुन थकीत रकमेची वसुली करून द्यावी.-भरत पाटील, शेतकरी, कुढावद ता. शहादा.