शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कुढावद गावातील २५ शेतकर्यांची ७५ लाख रूपयांमध्ये फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद येथील २५ शेतकर्यांची फळ व्यापार्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून फसवणूक होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील कुढावद येथील २५ शेतकर्यांची फळ व्यापार्यांकडून गेल्या तीन वर्षांपासून फसवणूक होत आहे. शेतकर्यांनी दिलेल्या मालाचे पैसे संबधित व्यापारी परत करत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कुढावद येथील २५ पेक्षा अधिक शेतकर्यांनी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, सावद आणि रावेर येथील काही व्यापार्यांना २०१९ मध्ये फळ उत्पादन दिले होते. त्यानंतर या उत्पादनाचे पैसे संबधितांकडून येणे अपेक्षित होते. परंतु संबधित व्यापारी पैसे देण्याऐवजी व्यापार्यांची बोळवण करत असल्याचे प्रकार सुरू आहे. याच दरम्यान शेतकर्यांनी केळी, पपई, टरबूज, डांगर आदी उत्पादने राजस्थान  आणि उत्तर प्रदेशातील व्यापार्यांना विक्री केला होता. परंतु या व्यापार्यांनीही शेतकर्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकरी वारंवार तगादा लावूनही व्यापारी पैसे देत नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान माल खरेदी करताना हे व्यापारी त्यांची वाहने घेत सरळ शेत बांधावर येतात. शेतकर्याला भूलथापा देत मालाच्या रकमेचे अथवा कोरे धनादेश देणे तसेच आपल्या नावाच्या लेटर हेडवर लिहून देत पैसे बुडवणार नसल्याचे सांगतात. परंतु गावी परत गेल्यावर मात्र शेतकर्यांचे फोनच उचलत नसल्याचे प्रकार समोर होत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. नुकतेच विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नाशिक जिल्ह्यात शेतकर्यांच्या थकीत पैश्याच्या वसुलीसाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही मोहिम सुरू करण्याची अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. 

प्रशासनाने सहकार्य करावेनंदुरबार जिल्ह्यात शेतकर्यांच्या फसवणूकीचे प्रकार गेल्या काही वर्षात सातत्याने होत आहेत. या प्रकारांना आळा बसण्याची गरज आहे. शहादा तालुक्यातील कुढावद येथील ७५ लाख रूपयांची फसवणूक असताना दुसरीकडे तालुक्यातील इतर गावातील शेतकरीही व्यापार्यांकडून याच प्रकारे फसवले जात आहेत. त्यांच्या गावी जाणे किंवा कायदेशीर कारवाई शेतकर्यांना नुकसानदायक असल्याने पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. केळी आणि पपई उत्पादक शेतकर्यांचे सर्वाधिक पैसे अडकून पडले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

व्यापारी माल घेऊन गेल्यानंतर संपर्क करत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकरी यंदा अडचणीत आहेत. प्रशासनाने शेतकर्यांच्या समस्येचे निराकरण करुन थकीत रकमेची वसुली करून द्यावी.-भरत पाटील, शेतकरी, कुढावद ता. शहादा.